शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मीटरला बगल देत रिक्षाचालकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:35 IST

वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.

विरार : वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.वसई विरार मध्ये पश्चिम भागात पर्यटक स्थळे असल्याने बाहेरून मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. बाहेरच्या नागरिकांची ज्याप्रकारे फसवणूक केली जाते त्याचं प्रकारे स्थानिक रहिवाशांना देखील फसवले जात आहे. शहरात सर्वत्र मीटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, रिक्षा चालक त्याचे पालन करत नाही. त्यांच्याकडून ठराविक भाडं ठरवले जाते व त्या ठिकाणी तितकेच भाडं घेतलं जातं. अंतर कमी व भाडं जास्त अशी पद्धत सुरु असल्याने नागरिक हैराण आहेत.इतकेच नाही तर रिक्षा चालकांना मीटर वापरण्यास सांगितले की, ते करणे देतात. मीटरची वायर उंदराने खाल्ली, मीटर मध्ये पाणी गेले, मीटर खराब आहे. यासारखे करणे देऊन विषय टाळला जातो. ‘‘ पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी ४० रु पये घेतले जातात. अंबाडी रोड येथे शेअरिंग घेत नाहीत आणि कोणी शेरिंगमध्ये जायचं प्रयत्न केला तर रिक्षा चालक त्याला उतरवतात. ७० ते ८० रु पये मागू लागतात.येथील स्थानिक जगदीश केळशीकर यांनी असे म्हणतात की, एखाद्या नागरिकाने या विरोधात आवाज उठवला तर त्याचाशी भांडायला रिक्षा चालक गॅँगकरुन येतात. अनेकदा शेअरिंगच्या पद्धतीत देखील अशा प्रकारची अरेरावी केली जाते. १० रु पयाच्या शेअरिंग मध्ये ३५ रु पये मागितले जातात व नागरिकांची लुट होते. ‘‘ वसई स्थानक ते ओम नगर स्पेशल भाडे ३५ रु पये घेतले जाते. हे अंतर एक किलोमीटर देखील नाही. मीटर कधीच चालू नसतो आणि असल्यास २० रु पये भाडं आकारले जाते. त्याठिकाणी रिक्षा चालक ४० रु पये घेतात. रिक्षा चालक त्यांच्या होशोबाने भाडं ठरवत असल्याने नागरीकांना प्रवास म्हणजे भुर्दंड ठरत आहे.रिक्षा चालाकंची लुट थांबावी यासाठी आर.टी.ओ यांनी मीटरची सुविधा सुरु केली मात्र, रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरूच आहे. या विरोधात तक्र ार नोंदवण्यास नागरिक गेल्या नंतर त्यांना राजकीय पक्षांची भीती घातली जाते. आरटीओने याविरोधात मोहीम सुरु केली आहे. याचे गांभिर्य देखिल मस्तवाल रिक्षा चालकांना नाही. नागरिकांची लुट होत असली तरी रिक्षा चालक न सुधारण्याची भाषा करत असल्याने हा पेच अधिक वाढला आहे.मीटरची सुविधा सगळीकडे देण्यात आली आहे. हे असे प्रकार थांबावे यासाठीचे हे मीटर देण्यात आले आहेत. जर कोणीही रिक्षा चालक त्याच्या वापर करत नसेल किंवा मनमानी करत असेल तर त्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू. दांडतात्मक कारवाई करण्यात येईल व त्याचं बरोबर त्याचा परवाना देखील काही नियमित काळासाठी रद्द करण्यात येईल.- अनिल पाटील,आरटीओ अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार