शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

मीटरला बगल देत रिक्षाचालकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:35 IST

वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.

विरार : वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.वसई विरार मध्ये पश्चिम भागात पर्यटक स्थळे असल्याने बाहेरून मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. बाहेरच्या नागरिकांची ज्याप्रकारे फसवणूक केली जाते त्याचं प्रकारे स्थानिक रहिवाशांना देखील फसवले जात आहे. शहरात सर्वत्र मीटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, रिक्षा चालक त्याचे पालन करत नाही. त्यांच्याकडून ठराविक भाडं ठरवले जाते व त्या ठिकाणी तितकेच भाडं घेतलं जातं. अंतर कमी व भाडं जास्त अशी पद्धत सुरु असल्याने नागरिक हैराण आहेत.इतकेच नाही तर रिक्षा चालकांना मीटर वापरण्यास सांगितले की, ते करणे देतात. मीटरची वायर उंदराने खाल्ली, मीटर मध्ये पाणी गेले, मीटर खराब आहे. यासारखे करणे देऊन विषय टाळला जातो. ‘‘ पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी ४० रु पये घेतले जातात. अंबाडी रोड येथे शेअरिंग घेत नाहीत आणि कोणी शेरिंगमध्ये जायचं प्रयत्न केला तर रिक्षा चालक त्याला उतरवतात. ७० ते ८० रु पये मागू लागतात.येथील स्थानिक जगदीश केळशीकर यांनी असे म्हणतात की, एखाद्या नागरिकाने या विरोधात आवाज उठवला तर त्याचाशी भांडायला रिक्षा चालक गॅँगकरुन येतात. अनेकदा शेअरिंगच्या पद्धतीत देखील अशा प्रकारची अरेरावी केली जाते. १० रु पयाच्या शेअरिंग मध्ये ३५ रु पये मागितले जातात व नागरिकांची लुट होते. ‘‘ वसई स्थानक ते ओम नगर स्पेशल भाडे ३५ रु पये घेतले जाते. हे अंतर एक किलोमीटर देखील नाही. मीटर कधीच चालू नसतो आणि असल्यास २० रु पये भाडं आकारले जाते. त्याठिकाणी रिक्षा चालक ४० रु पये घेतात. रिक्षा चालक त्यांच्या होशोबाने भाडं ठरवत असल्याने नागरीकांना प्रवास म्हणजे भुर्दंड ठरत आहे.रिक्षा चालाकंची लुट थांबावी यासाठी आर.टी.ओ यांनी मीटरची सुविधा सुरु केली मात्र, रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरूच आहे. या विरोधात तक्र ार नोंदवण्यास नागरिक गेल्या नंतर त्यांना राजकीय पक्षांची भीती घातली जाते. आरटीओने याविरोधात मोहीम सुरु केली आहे. याचे गांभिर्य देखिल मस्तवाल रिक्षा चालकांना नाही. नागरिकांची लुट होत असली तरी रिक्षा चालक न सुधारण्याची भाषा करत असल्याने हा पेच अधिक वाढला आहे.मीटरची सुविधा सगळीकडे देण्यात आली आहे. हे असे प्रकार थांबावे यासाठीचे हे मीटर देण्यात आले आहेत. जर कोणीही रिक्षा चालक त्याच्या वापर करत नसेल किंवा मनमानी करत असेल तर त्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू. दांडतात्मक कारवाई करण्यात येईल व त्याचं बरोबर त्याचा परवाना देखील काही नियमित काळासाठी रद्द करण्यात येईल.- अनिल पाटील,आरटीओ अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार