शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मीटरला बगल देत रिक्षाचालकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:35 IST

वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.

विरार : वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.वसई विरार मध्ये पश्चिम भागात पर्यटक स्थळे असल्याने बाहेरून मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. बाहेरच्या नागरिकांची ज्याप्रकारे फसवणूक केली जाते त्याचं प्रकारे स्थानिक रहिवाशांना देखील फसवले जात आहे. शहरात सर्वत्र मीटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, रिक्षा चालक त्याचे पालन करत नाही. त्यांच्याकडून ठराविक भाडं ठरवले जाते व त्या ठिकाणी तितकेच भाडं घेतलं जातं. अंतर कमी व भाडं जास्त अशी पद्धत सुरु असल्याने नागरिक हैराण आहेत.इतकेच नाही तर रिक्षा चालकांना मीटर वापरण्यास सांगितले की, ते करणे देतात. मीटरची वायर उंदराने खाल्ली, मीटर मध्ये पाणी गेले, मीटर खराब आहे. यासारखे करणे देऊन विषय टाळला जातो. ‘‘ पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी ४० रु पये घेतले जातात. अंबाडी रोड येथे शेअरिंग घेत नाहीत आणि कोणी शेरिंगमध्ये जायचं प्रयत्न केला तर रिक्षा चालक त्याला उतरवतात. ७० ते ८० रु पये मागू लागतात.येथील स्थानिक जगदीश केळशीकर यांनी असे म्हणतात की, एखाद्या नागरिकाने या विरोधात आवाज उठवला तर त्याचाशी भांडायला रिक्षा चालक गॅँगकरुन येतात. अनेकदा शेअरिंगच्या पद्धतीत देखील अशा प्रकारची अरेरावी केली जाते. १० रु पयाच्या शेअरिंग मध्ये ३५ रु पये मागितले जातात व नागरिकांची लुट होते. ‘‘ वसई स्थानक ते ओम नगर स्पेशल भाडे ३५ रु पये घेतले जाते. हे अंतर एक किलोमीटर देखील नाही. मीटर कधीच चालू नसतो आणि असल्यास २० रु पये भाडं आकारले जाते. त्याठिकाणी रिक्षा चालक ४० रु पये घेतात. रिक्षा चालक त्यांच्या होशोबाने भाडं ठरवत असल्याने नागरीकांना प्रवास म्हणजे भुर्दंड ठरत आहे.रिक्षा चालाकंची लुट थांबावी यासाठी आर.टी.ओ यांनी मीटरची सुविधा सुरु केली मात्र, रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरूच आहे. या विरोधात तक्र ार नोंदवण्यास नागरिक गेल्या नंतर त्यांना राजकीय पक्षांची भीती घातली जाते. आरटीओने याविरोधात मोहीम सुरु केली आहे. याचे गांभिर्य देखिल मस्तवाल रिक्षा चालकांना नाही. नागरिकांची लुट होत असली तरी रिक्षा चालक न सुधारण्याची भाषा करत असल्याने हा पेच अधिक वाढला आहे.मीटरची सुविधा सगळीकडे देण्यात आली आहे. हे असे प्रकार थांबावे यासाठीचे हे मीटर देण्यात आले आहेत. जर कोणीही रिक्षा चालक त्याच्या वापर करत नसेल किंवा मनमानी करत असेल तर त्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू. दांडतात्मक कारवाई करण्यात येईल व त्याचं बरोबर त्याचा परवाना देखील काही नियमित काळासाठी रद्द करण्यात येईल.- अनिल पाटील,आरटीओ अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार