शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

मीटरला बगल देत रिक्षाचालकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:35 IST

वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.

विरार : वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत.वसई विरार मध्ये पश्चिम भागात पर्यटक स्थळे असल्याने बाहेरून मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. बाहेरच्या नागरिकांची ज्याप्रकारे फसवणूक केली जाते त्याचं प्रकारे स्थानिक रहिवाशांना देखील फसवले जात आहे. शहरात सर्वत्र मीटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, रिक्षा चालक त्याचे पालन करत नाही. त्यांच्याकडून ठराविक भाडं ठरवले जाते व त्या ठिकाणी तितकेच भाडं घेतलं जातं. अंतर कमी व भाडं जास्त अशी पद्धत सुरु असल्याने नागरिक हैराण आहेत.इतकेच नाही तर रिक्षा चालकांना मीटर वापरण्यास सांगितले की, ते करणे देतात. मीटरची वायर उंदराने खाल्ली, मीटर मध्ये पाणी गेले, मीटर खराब आहे. यासारखे करणे देऊन विषय टाळला जातो. ‘‘ पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी ४० रु पये घेतले जातात. अंबाडी रोड येथे शेअरिंग घेत नाहीत आणि कोणी शेरिंगमध्ये जायचं प्रयत्न केला तर रिक्षा चालक त्याला उतरवतात. ७० ते ८० रु पये मागू लागतात.येथील स्थानिक जगदीश केळशीकर यांनी असे म्हणतात की, एखाद्या नागरिकाने या विरोधात आवाज उठवला तर त्याचाशी भांडायला रिक्षा चालक गॅँगकरुन येतात. अनेकदा शेअरिंगच्या पद्धतीत देखील अशा प्रकारची अरेरावी केली जाते. १० रु पयाच्या शेअरिंग मध्ये ३५ रु पये मागितले जातात व नागरिकांची लुट होते. ‘‘ वसई स्थानक ते ओम नगर स्पेशल भाडे ३५ रु पये घेतले जाते. हे अंतर एक किलोमीटर देखील नाही. मीटर कधीच चालू नसतो आणि असल्यास २० रु पये भाडं आकारले जाते. त्याठिकाणी रिक्षा चालक ४० रु पये घेतात. रिक्षा चालक त्यांच्या होशोबाने भाडं ठरवत असल्याने नागरीकांना प्रवास म्हणजे भुर्दंड ठरत आहे.रिक्षा चालाकंची लुट थांबावी यासाठी आर.टी.ओ यांनी मीटरची सुविधा सुरु केली मात्र, रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरूच आहे. या विरोधात तक्र ार नोंदवण्यास नागरिक गेल्या नंतर त्यांना राजकीय पक्षांची भीती घातली जाते. आरटीओने याविरोधात मोहीम सुरु केली आहे. याचे गांभिर्य देखिल मस्तवाल रिक्षा चालकांना नाही. नागरिकांची लुट होत असली तरी रिक्षा चालक न सुधारण्याची भाषा करत असल्याने हा पेच अधिक वाढला आहे.मीटरची सुविधा सगळीकडे देण्यात आली आहे. हे असे प्रकार थांबावे यासाठीचे हे मीटर देण्यात आले आहेत. जर कोणीही रिक्षा चालक त्याच्या वापर करत नसेल किंवा मनमानी करत असेल तर त्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू. दांडतात्मक कारवाई करण्यात येईल व त्याचं बरोबर त्याचा परवाना देखील काही नियमित काळासाठी रद्द करण्यात येईल.- अनिल पाटील,आरटीओ अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार