शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

आलोंडे शाळा कोसळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:11 IST

आलोंडा येथील जि.प. शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती असल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या ९७ विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न बिकट बनला आहे.

- राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड: आलोंडा येथील जि.प. शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती असल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या ९७ विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न बिकट बनला आहे. येथे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण दिले जात असून शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी आता पर्यंत १७ वेळा धोकादायक इमारतीचा प्रश्न जिल्हा शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखां समोर मांडला आहे. मात्र, लालफितीत आडकलेल्या जिल्हा प्रशासनाने त्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन सध्या ही शाळा खाजगी जागी भरविली जात असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सदु कोरडा व उपाध्यक्ष प्रविण बोडके यांनी लोकमतला दिली. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा यासाठी शासनाकडून विद्यार्थी पटसंख्येनुसार शाळां सुरु करण्याची प्रक्रिया आहे. यावर शासनाचा कोटयावधी रुपये खर्च होत असतो. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे़. २३६ शाळांमधील अनेक ठिकाणच्या जि़ प़ शाळांची अशीच अवस्था असून तालुक्यातील खडकी, मेढी, अवचीतपाडा, म्हसरोली, चिंचघर, भोईरपाडा (करसूड), घाणेडे, धामणी, कुंर्झे, द्गडीपाडा (कुंर्झे), ब्राम्हणेपाडा, चाबके तलावली, दादडे व आलोंडे अशा एकुण १४ शाळांच्या २० वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याने त्या धोकादायक बनत चालेल्या आहेत़ मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पालक वर्गाने केला आहे. आलोंडा गावातील जि.प. शाळेच्या दुरावस्थेकडे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे शिक्षण विभाग सप्शेल दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे आम्ही आता विदयार्थी, पालकासह महिनाभरात उपोषणास बसून न्याय मागणार आहोत, असा इशारा आलोंडा गावचे सरपंच प्रदिप भोइर यांनी लोकमतशी बोलतांना दिला.विक्रमगड तालुक्यातील जि.प. शाळांच्या धोकादायक इमारतींबाबत जिल्हा पातळीवर पत्रव्यवहार केलेला असून बाबतची संपूर्ण माहिती त्यांना देण्यात आली आहे़-भगवान मोकाशी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी (विक्रमगड)आलोंडा जि़ प़ शाळा ही ६० वर्षाची जुनी असल्याने पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याबाबत १७ वेळा तक्रारी करुनही उपाय योजना झालेली नाही़-सदु कोरडा, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती