शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

आलोंडे शाळा कोसळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:11 IST

आलोंडा येथील जि.प. शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती असल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या ९७ विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न बिकट बनला आहे.

- राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड: आलोंडा येथील जि.प. शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती असल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या ९७ विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न बिकट बनला आहे. येथे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण दिले जात असून शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी आता पर्यंत १७ वेळा धोकादायक इमारतीचा प्रश्न जिल्हा शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखां समोर मांडला आहे. मात्र, लालफितीत आडकलेल्या जिल्हा प्रशासनाने त्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन सध्या ही शाळा खाजगी जागी भरविली जात असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सदु कोरडा व उपाध्यक्ष प्रविण बोडके यांनी लोकमतला दिली. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा यासाठी शासनाकडून विद्यार्थी पटसंख्येनुसार शाळां सुरु करण्याची प्रक्रिया आहे. यावर शासनाचा कोटयावधी रुपये खर्च होत असतो. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे़. २३६ शाळांमधील अनेक ठिकाणच्या जि़ प़ शाळांची अशीच अवस्था असून तालुक्यातील खडकी, मेढी, अवचीतपाडा, म्हसरोली, चिंचघर, भोईरपाडा (करसूड), घाणेडे, धामणी, कुंर्झे, द्गडीपाडा (कुंर्झे), ब्राम्हणेपाडा, चाबके तलावली, दादडे व आलोंडे अशा एकुण १४ शाळांच्या २० वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याने त्या धोकादायक बनत चालेल्या आहेत़ मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पालक वर्गाने केला आहे. आलोंडा गावातील जि.प. शाळेच्या दुरावस्थेकडे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे शिक्षण विभाग सप्शेल दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे आम्ही आता विदयार्थी, पालकासह महिनाभरात उपोषणास बसून न्याय मागणार आहोत, असा इशारा आलोंडा गावचे सरपंच प्रदिप भोइर यांनी लोकमतशी बोलतांना दिला.विक्रमगड तालुक्यातील जि.प. शाळांच्या धोकादायक इमारतींबाबत जिल्हा पातळीवर पत्रव्यवहार केलेला असून बाबतची संपूर्ण माहिती त्यांना देण्यात आली आहे़-भगवान मोकाशी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी (विक्रमगड)आलोंडा जि़ प़ शाळा ही ६० वर्षाची जुनी असल्याने पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याबाबत १७ वेळा तक्रारी करुनही उपाय योजना झालेली नाही़-सदु कोरडा, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती