शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

सीओंसाठीच्या उपोषणाकडे सगळ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:03 IST

जानेवारीपासून अस्तित्वात आलेल्या या नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने तो तातडीने नेमावा यासाठी नगराध्यक्षांसह

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड: जानेवारीपासून अस्तित्वात आलेल्या या नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने तो तातडीने नेमावा यासाठी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी आरंभिलेल्या उपोषणाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने ते बुधवारी म्हणजे दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. पहिल्या दिवशी बांधकाम विभागाचे अधिकारी होले यांनी मिटींंगला जाण्याचा बहाणा करुन पळ काढला़ विक्रमगड हा आपला मतदारसंघ असतांनाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी या उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचाच कित्ता गिरवून जिल्हा प्रशासनानेही त्याची दखल न घेण्यात धन्यता मानली आहे. पालकमंत्र्यांनी भेट घेतली नाहीच. साधा फोन करुनही उपोषण कर्त्यांची चौकशी केलेली नाही़ मंत्री या नात्याने राजकारण बाजुला ठेऊन हा प्रश्न सोडविणे आवश्यक असतांनाही येथील मतदारांनी त्यांच्या पक्षाला या नगरपंचायतीची सत्ता दिली नाही याचा राग मनात ठेवून त्यांनी या नगरपंचायतीला मुख्याधिकारी लाभू दिलेला नाही. असा आरोप निलेश सांबरे यांनी यावेळी केला़ तर यामध्ये अधिका-यांना वेठीस धरले जात असल्याने ते ही यामध्ये दुर्लक्ष करीत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे़पहिल्या व दुस-या दोन्ही दिवशी तहसिलदार सुरेश सोनवणे यांनी उपषेणकर्त्यांची भेट घेतली. मात्र हा विषय माझ्या अखत्यारीमधील नसून सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडविता येईल असे सांगितले. मात्र पालकमंत्री, अगर जिल्हाधिकारी वा त्यांचा कुणी प्रतिनिधी येथे चर्चासाठी आलेले नाहीत त्यामुळे उपोषणकर्ते नगराध्यक्ष रविंद्र खुताडे यांनी व त्यांच्या समर्थकांनी हे उपोषण सुरुच ठेवले आहे़ मात्र मुख्याधिकारी नसल्याने विद्यार्थ्यांना दाखले देणे, येथील रहीवाशांची घरपटटी घेणे, घरे, सदनिका नावे करणे अतिक्रमणे हटविणे आदींबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे़ बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस असूनही आदिवासी विकास मंत्र्यांनी साधी चौकशीही केली नाही त्यामुळे जो पर्यत मुख्याधिकारी मिळकत नाही तो पर्यत हे उपोषण सुरुच राहील भले शहराच्या विकासासाठी या उपोषणामध्ये माझा जीव गेला तरी मला त्याची पर्वा नाही़-रविंद्र खुताडे, नगरध्यक्ष, विक्रमगडविक्रमगडच्या नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी सत्ता आमच्या विकास आघाडीच्या हाती दिली तिने कमी कालावधीत विकास कामांचा धडाका लावला हे विरोधकांना रुचले नाही व त्यांनी असलेला मुख्याधिकारी पळवून लावून हे पद रिक्त ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत हा गावाच्या विकासात घातलेला खोडा आहे. हे शहरवासीयांनी लक्षात ठेवावे.- निलेश सांबरे, सत्ताधारी विकास आघाडीचे प्रमुख