शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

सीओंसाठीच्या उपोषणाकडे सगळ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:03 IST

जानेवारीपासून अस्तित्वात आलेल्या या नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने तो तातडीने नेमावा यासाठी नगराध्यक्षांसह

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड: जानेवारीपासून अस्तित्वात आलेल्या या नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने तो तातडीने नेमावा यासाठी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी आरंभिलेल्या उपोषणाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने ते बुधवारी म्हणजे दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. पहिल्या दिवशी बांधकाम विभागाचे अधिकारी होले यांनी मिटींंगला जाण्याचा बहाणा करुन पळ काढला़ विक्रमगड हा आपला मतदारसंघ असतांनाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी या उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचाच कित्ता गिरवून जिल्हा प्रशासनानेही त्याची दखल न घेण्यात धन्यता मानली आहे. पालकमंत्र्यांनी भेट घेतली नाहीच. साधा फोन करुनही उपोषण कर्त्यांची चौकशी केलेली नाही़ मंत्री या नात्याने राजकारण बाजुला ठेऊन हा प्रश्न सोडविणे आवश्यक असतांनाही येथील मतदारांनी त्यांच्या पक्षाला या नगरपंचायतीची सत्ता दिली नाही याचा राग मनात ठेवून त्यांनी या नगरपंचायतीला मुख्याधिकारी लाभू दिलेला नाही. असा आरोप निलेश सांबरे यांनी यावेळी केला़ तर यामध्ये अधिका-यांना वेठीस धरले जात असल्याने ते ही यामध्ये दुर्लक्ष करीत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे़पहिल्या व दुस-या दोन्ही दिवशी तहसिलदार सुरेश सोनवणे यांनी उपषेणकर्त्यांची भेट घेतली. मात्र हा विषय माझ्या अखत्यारीमधील नसून सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडविता येईल असे सांगितले. मात्र पालकमंत्री, अगर जिल्हाधिकारी वा त्यांचा कुणी प्रतिनिधी येथे चर्चासाठी आलेले नाहीत त्यामुळे उपोषणकर्ते नगराध्यक्ष रविंद्र खुताडे यांनी व त्यांच्या समर्थकांनी हे उपोषण सुरुच ठेवले आहे़ मात्र मुख्याधिकारी नसल्याने विद्यार्थ्यांना दाखले देणे, येथील रहीवाशांची घरपटटी घेणे, घरे, सदनिका नावे करणे अतिक्रमणे हटविणे आदींबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे़ बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस असूनही आदिवासी विकास मंत्र्यांनी साधी चौकशीही केली नाही त्यामुळे जो पर्यत मुख्याधिकारी मिळकत नाही तो पर्यत हे उपोषण सुरुच राहील भले शहराच्या विकासासाठी या उपोषणामध्ये माझा जीव गेला तरी मला त्याची पर्वा नाही़-रविंद्र खुताडे, नगरध्यक्ष, विक्रमगडविक्रमगडच्या नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी सत्ता आमच्या विकास आघाडीच्या हाती दिली तिने कमी कालावधीत विकास कामांचा धडाका लावला हे विरोधकांना रुचले नाही व त्यांनी असलेला मुख्याधिकारी पळवून लावून हे पद रिक्त ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत हा गावाच्या विकासात घातलेला खोडा आहे. हे शहरवासीयांनी लक्षात ठेवावे.- निलेश सांबरे, सत्ताधारी विकास आघाडीचे प्रमुख