शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आॅनलाइनमुळे सर्वच उमेदवार, पक्ष जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:55 IST

जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबर पासून होणार असल्याने उमेदवार शोधण्यात राजकीय पक्षाची धावपळ सुरू असतांना शोधलेल्या उमेदवारांची आॅनलाइन माहिती भरतांना सर्वच उमेदवार आणि राजकीय पक्ष जेरीस आले आहेत.

- हितेंन नाईक ।पालघर : जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबर पासून होणार असल्याने उमेदवार शोधण्यात राजकीय पक्षाची धावपळ सुरू असतांना शोधलेल्या उमेदवारांची आॅनलाइन माहिती भरतांना सर्वच उमेदवार आणि राजकीय पक्ष जेरीस आले आहेत.अनेक समस्या उद्भवत असून आयोगाची वेबसाईट ही मध्येच बंद पडत असल्याने अर्ज भरण्याची मुदत दोन दिवस वाढवून देण्याची मागणी बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी निवडणूक आयोगा कडे केली आहे.१४ सप्टेंबर पासून तहसीलदारांनी निवडणुकांची नोटीस प्रसिद्ध केल्यापासून राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवार शोधणे, त्यांची कागदपत्रे गोळा करणे, नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे. आॅनलाइन उमेदवारी अर्ज राज्यनिवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर भरून देण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर असून त्यांची वेबसाईट अत्यंत धीम्या गतीने चालत असून मध्येच बंद पडत असल्याने फॉर्म मध्ये भरलेली माहिती डिलिट होत असल्याने नव्याने भरावी लागत आहे. पूर्वी उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्ववभूमी, स्थावर-जंगम मालमत्ता, व्यवसाय, कर्जे इथपर्यंत मोजकीच माहिती फॉर्म मध्ये लिहून सादर केली जात होती.मात्र ग्रामीण भागातील उमेदवार शोधल्या नंतर वरील सर्व माहिती गोळा करताना उमेदवारासह राजकीय पक्षाला मोठ्या दिव्यातून जावे लागत असून उमेदवार वेळेवर नकार देत असल्याने आमच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण होत असल्याचे पंचायत समितीचे उपसभापती मेघन पाटील ह्यांनी सांगितले.माहिती मिळविता मिळविता सगळयांच्या नाकी आले नऊउमेदवारा विरूध्द कोर्ट केस आहे काय? कोर्टाचे नाव, केस नंबर, कलम, चार्जशीट, न्यायालयाने दोषी ठरविल्यास त्याची सर्व इत्यंभूत माहिती, उमेदवार व त्यांच्या पत्नीच्या नावावरील वाहन संख्या, नंबर, खरेदी करतानाची किंमत, खरेदी वर्ष, दागिने त्याचे वजन, किंमत, विमा पॉलिसी रक्कम, इतर येणी असल्याची माहिती,कर्ज तपशील, एकूण मुलांची संख्या, जन्मतारीख,उत्पन्नाची माहिती, पती-पत्नीचे पॅनकार्ड, इन्कमटेक्स भरत असल्यास त्याची माहिती, एकूण वार्षिक उत्पन्नाची माहिती, यापूर्वी कोणती निवडणूक लढली, असल्यास त्यावेळी फॉर्म मध्ये भरलेल्या संपत्तीचे मूल्य, बँकेत नव्याने खाते उघडणे, शैक्षणिक तपशिलात शिक्षण,शाळा-महाविद्यालयाचे नाव, विद्यापीठ नाव, टक्केवारी, स्थावर-जंगम मालमत्ता विवरण मध्ये पती-पत्नीच्या नावावरची शेतजमीन, बिनशेती जमीन, घर, सदनिका, गाळे, दुकाने, संपत्ती स्वत: घेतली की विडलोपार्जित, संपत्ती असल्यास गाव, सर्व्हे नंबर, क्षेत्र, बाजारभावा नुसार किंमत अश्या नानाविध प्रश्नांची माहिती गोळा करणे आण िती व्यविस्थत आॅनलाइन भरणे अशा किचकट प्रक्रियेतून सध्या राजकीय पक्ष्यांच्या लोकांना जावे लागत आहे.