शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

वसईत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: December 17, 2015 00:23 IST

अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी वसई रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. रुळ ओलांडणाऱ्या १ हजार २३७ प्रवाशांकडून वर्षभरात

वसई : अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी वसई रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. रुळ ओलांडणाऱ्या १ हजार २३७ प्रवाशांकडून वर्षभरात ५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर गेल्या दहा दिवसात २२० प्रवाशांना अटक करण्यात आली रेल्वे रुळ ओलांडताना वर्षभरात शेकडो प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागल्याची गंभीर दखल घेवून पश्चिम रेल्वेने रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांची धरपकड सुरु केली आहे. वसई रेल्वे पोलिसांनी १ जानेवारी २०१५ ते १० डिसेंबर २०१५ दरम्यान १ हजार २३७ प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ लाख ७० हजार ५२५ रुपयांचा दंडही वसूल केला. डिसेंबर महिन्यात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्यावर अवघ्या दहा दिवसांत २२० जणांवर रेल्वेने अटकेची कारवाई केली. त्यानंतरही प्रवासी रुळ ओलांडून जीव धोक्यात घालत असताना दिसत असल्याने रेल्वेने चिंंता व्यक्त केली.विरार, नालासोपारा, वसई रोड आणि नायगांव या रेल्वे स्थानकातील कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणती गाडी येईल याचा भरवसा नसतो. अनेकदा नेहमीच्या प्लॅटफॉर्मवर येणारी गाडी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर येते. आयत्यावेळी घोषणा केली जात असल्याने प्रवासी गाडी पकडण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. रेल्वेने आपले वेळापत्रक आणि फलाट नीट सांभाळले तर प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालावा लागणार नाही.