शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

सर्व धर्मांत जे चांगले आहे ते आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 01:57 IST

आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांचा संदेश : ‘सर्वधर्म मैत्री स्नेहभाव सायंकाळ’ कार्यक्र म उत्साहात

वसई : आज जगाला शांतीची नितांत गरज असून तत्पूर्वी सर्वधर्मीय बांधवांनी आपापल्या धर्मात जे चांगले आहे त्याचा स्वीकार करत ते आत्मसात करणे महत्त्वाचे असल्याचा सर्वदूर असा अर्थपूर्ण संदेश नाताळनिमित्ताने बिशप हाऊस आयोजित ‘सर्वधर्म मैत्री स्नेहभाव सायंकाळ’ कार्यक्र मामध्ये उपस्थितांना दिला.

नाताळ सणानिमित्ताने स्टेला येथील बिशप हाऊसमध्ये सर्वधर्म मैत्री आयोगातर्फेनाताळ स्नेहभाव मैत्रीचे आयोजन केले होते. त्या वेळी वसई धर्मप्रांताचे आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो हे उपस्थित सर्व धर्मीय गुरूंना व इतर बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आपल्या मार्गदर्शन विवेचनात बिशप यांनी प्रभू येशू ख्रिस्त हे अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मले. आजच्या युगात नाती विस्कळीत होताना, ती तुटत असताना स्वत:बरोबर, इतरांबरोबर, निसर्गासोबत आणि विधात्याबरोबर सर्वधर्मीय बांधवांनी नाती जपली पाहिजेत, असा सर्वदूर अर्थपूर्ण संदेश या वेळी आर्च बिशप डॉ. फेलिक्स यांनी दिला. दरम्यान, सुरुवातीला चुळणे ग्रामस्थांनी संगीत, वाद्याद्वारे प्रार्थना आणि प्रभू येशूच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्र म संपन्न झाला. यानंतर उपस्थित सर्वधर्मीय धर्मगुरू आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यावर या नाताळ संध्येला सुरुवात झाली. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध धर्माचे धर्मगुरू, मान्यवर तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे विशेष व्यक्ती उपस्थित होते.यामध्ये ज्येष्ठ विचारवंत फा. फ्रान्सिस दिब्रिटो, खासदार राजेंद्र गावित, वसई-विरार महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, मौलाना अब्दुल सुबहन खान, आचार्य नरहरी, अमील साहेब मुर्तजा सि. कॅन्ड्रीन, ब्रह्मकुमारी सारिका आणि प्रा.सोमनाथ विभुते तसेच माजी महापौर नारायण मानकर आणि विविध धर्मीय पदाधिकारी उपस्थित होते. या स्नेहमेळाव्याविषयी आपले प्रास्ताविक मांडताना ज्येष्ठ साहित्यिक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सर्व धर्मांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.क्रांती नव्हे, तर शांती हवीच्या स्नेहमेळाव्याचे ज्येष्ठ साहित्यिक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रास्ताविक केले. आज जगात श्रीमंत व गरीब यांची दरी वाढत आहे. भीतीसोबत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपल्याला क्रांती नाही तर शांती हवी. श्रीमंत व गरीबही हे अंतर कमी करण्यासाठी सर्वधर्मांनी पुढाकार घ्यायला हवा व सामन्यांच्या मागे उभे राहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार