शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

सर्व धर्मांत जे चांगले आहे ते आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 01:57 IST

आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांचा संदेश : ‘सर्वधर्म मैत्री स्नेहभाव सायंकाळ’ कार्यक्र म उत्साहात

वसई : आज जगाला शांतीची नितांत गरज असून तत्पूर्वी सर्वधर्मीय बांधवांनी आपापल्या धर्मात जे चांगले आहे त्याचा स्वीकार करत ते आत्मसात करणे महत्त्वाचे असल्याचा सर्वदूर असा अर्थपूर्ण संदेश नाताळनिमित्ताने बिशप हाऊस आयोजित ‘सर्वधर्म मैत्री स्नेहभाव सायंकाळ’ कार्यक्र मामध्ये उपस्थितांना दिला.

नाताळ सणानिमित्ताने स्टेला येथील बिशप हाऊसमध्ये सर्वधर्म मैत्री आयोगातर्फेनाताळ स्नेहभाव मैत्रीचे आयोजन केले होते. त्या वेळी वसई धर्मप्रांताचे आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो हे उपस्थित सर्व धर्मीय गुरूंना व इतर बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आपल्या मार्गदर्शन विवेचनात बिशप यांनी प्रभू येशू ख्रिस्त हे अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मले. आजच्या युगात नाती विस्कळीत होताना, ती तुटत असताना स्वत:बरोबर, इतरांबरोबर, निसर्गासोबत आणि विधात्याबरोबर सर्वधर्मीय बांधवांनी नाती जपली पाहिजेत, असा सर्वदूर अर्थपूर्ण संदेश या वेळी आर्च बिशप डॉ. फेलिक्स यांनी दिला. दरम्यान, सुरुवातीला चुळणे ग्रामस्थांनी संगीत, वाद्याद्वारे प्रार्थना आणि प्रभू येशूच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्र म संपन्न झाला. यानंतर उपस्थित सर्वधर्मीय धर्मगुरू आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यावर या नाताळ संध्येला सुरुवात झाली. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध धर्माचे धर्मगुरू, मान्यवर तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे विशेष व्यक्ती उपस्थित होते.यामध्ये ज्येष्ठ विचारवंत फा. फ्रान्सिस दिब्रिटो, खासदार राजेंद्र गावित, वसई-विरार महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, मौलाना अब्दुल सुबहन खान, आचार्य नरहरी, अमील साहेब मुर्तजा सि. कॅन्ड्रीन, ब्रह्मकुमारी सारिका आणि प्रा.सोमनाथ विभुते तसेच माजी महापौर नारायण मानकर आणि विविध धर्मीय पदाधिकारी उपस्थित होते. या स्नेहमेळाव्याविषयी आपले प्रास्ताविक मांडताना ज्येष्ठ साहित्यिक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सर्व धर्मांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.क्रांती नव्हे, तर शांती हवीच्या स्नेहमेळाव्याचे ज्येष्ठ साहित्यिक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रास्ताविक केले. आज जगात श्रीमंत व गरीब यांची दरी वाढत आहे. भीतीसोबत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपल्याला क्रांती नाही तर शांती हवी. श्रीमंत व गरीबही हे अंतर कमी करण्यासाठी सर्वधर्मांनी पुढाकार घ्यायला हवा व सामन्यांच्या मागे उभे राहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार