शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सर्व धर्मांत जे चांगले आहे ते आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 01:57 IST

आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांचा संदेश : ‘सर्वधर्म मैत्री स्नेहभाव सायंकाळ’ कार्यक्र म उत्साहात

वसई : आज जगाला शांतीची नितांत गरज असून तत्पूर्वी सर्वधर्मीय बांधवांनी आपापल्या धर्मात जे चांगले आहे त्याचा स्वीकार करत ते आत्मसात करणे महत्त्वाचे असल्याचा सर्वदूर असा अर्थपूर्ण संदेश नाताळनिमित्ताने बिशप हाऊस आयोजित ‘सर्वधर्म मैत्री स्नेहभाव सायंकाळ’ कार्यक्र मामध्ये उपस्थितांना दिला.

नाताळ सणानिमित्ताने स्टेला येथील बिशप हाऊसमध्ये सर्वधर्म मैत्री आयोगातर्फेनाताळ स्नेहभाव मैत्रीचे आयोजन केले होते. त्या वेळी वसई धर्मप्रांताचे आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो हे उपस्थित सर्व धर्मीय गुरूंना व इतर बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आपल्या मार्गदर्शन विवेचनात बिशप यांनी प्रभू येशू ख्रिस्त हे अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मले. आजच्या युगात नाती विस्कळीत होताना, ती तुटत असताना स्वत:बरोबर, इतरांबरोबर, निसर्गासोबत आणि विधात्याबरोबर सर्वधर्मीय बांधवांनी नाती जपली पाहिजेत, असा सर्वदूर अर्थपूर्ण संदेश या वेळी आर्च बिशप डॉ. फेलिक्स यांनी दिला. दरम्यान, सुरुवातीला चुळणे ग्रामस्थांनी संगीत, वाद्याद्वारे प्रार्थना आणि प्रभू येशूच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्र म संपन्न झाला. यानंतर उपस्थित सर्वधर्मीय धर्मगुरू आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यावर या नाताळ संध्येला सुरुवात झाली. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध धर्माचे धर्मगुरू, मान्यवर तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे विशेष व्यक्ती उपस्थित होते.यामध्ये ज्येष्ठ विचारवंत फा. फ्रान्सिस दिब्रिटो, खासदार राजेंद्र गावित, वसई-विरार महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, मौलाना अब्दुल सुबहन खान, आचार्य नरहरी, अमील साहेब मुर्तजा सि. कॅन्ड्रीन, ब्रह्मकुमारी सारिका आणि प्रा.सोमनाथ विभुते तसेच माजी महापौर नारायण मानकर आणि विविध धर्मीय पदाधिकारी उपस्थित होते. या स्नेहमेळाव्याविषयी आपले प्रास्ताविक मांडताना ज्येष्ठ साहित्यिक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सर्व धर्मांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.क्रांती नव्हे, तर शांती हवीच्या स्नेहमेळाव्याचे ज्येष्ठ साहित्यिक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रास्ताविक केले. आज जगात श्रीमंत व गरीब यांची दरी वाढत आहे. भीतीसोबत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपल्याला क्रांती नाही तर शांती हवी. श्रीमंत व गरीबही हे अंतर कमी करण्यासाठी सर्वधर्मांनी पुढाकार घ्यायला हवा व सामन्यांच्या मागे उभे राहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार