शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

‘त्या’ बांधकामांना अभय कुणाचे?

By admin | Updated: May 2, 2016 01:17 IST

अनधिकृत बांधकामप्रकरणी पोलीस गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिका आयुक्तांनी थेट पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून याप्रकरणी

- शशी करपे,  वसईअनधिकृत बांधकामप्रकरणी पोलीस गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिका आयुक्तांनी थेट पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून याप्रकरणी तक्रार केली आहे. दुसरीकडे, पालिकेने सुमारे दीड हजारांहून अधिक लोकांना एमआरटीपीच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र, यातील शे-दीडशे लोकांवरच एमआरटीपीचे गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक इमारती पाडण्यात आल्या असल्या तरी पालिकेने त्या बांधणाऱ्यांविरोधात एमआरटीपीची कारवाई केलेली नाही. उलट वसई कोर्टाने सुमारे चारशे प्रकरणात स्टे दिल्याने लाखो रुपो खर्च करून तैनात करण्यात आलेली पालिकेतील वकिलांची टीम अपयशी ठरल्याचे उजेडात आले आहे. वसई विरार पालिकेने अनधिकृत बांधकामविरोधी मोहिम हाती घेतली आहे. मात्र, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पोलीस संरक्षण मिळत नाही आणि एमआरटीपीचे गुन्हे दाखल करून घेण्यास स्थानिक पोलीस टाळाटाळ करीत आहेत. गुन्हे दाखल करण्यास गेल्यास पोलीस सहकार्य करीत नाहीत. काही वेळा रजिस्टर पोस्टाने पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, पोलिसांकडून त्याची दखल घेतली जात नाही, अशा अनेक तक्रारी प्रभाग समितीत असलेल्या सहाय्यक आयुक्तांनी पालिका आयुक्तांकडे केल्या होत्या. याची दखल घेऊन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांच्याकडेच लेखी तक्रार केली आहे. पालिका हद्दीतील अवैध बांधकामांबाबत मुंबई हायकोर्टात विविध जनहित याचिका दाखल झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडेही अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कोर्ट आणि शासनास झालेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे सादर करावा लागतो. प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांचा पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडून संबंधित विकासकांवर अवैध बांधकामाबाबत एमआरटीपी अंतर्गत तसेच अवैध बांधकामाबाबतचे गुन्हे दाखल करण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. परंतु पोलीस ठाण्यात वेळीच गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत. त्यामुळे कोर्ट आणि शासनास माहिती देणेस विलंब होतो. त्यासाठी आपल्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांना तशा सुचना देण्यात याव्यात, असे आयुक्त लोखंडे यांनी २२ एप्रिल १६ रोजी पोलीस अधिक्षकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. बिल्डर मोकाटपोलीस आणि पालिका वादात एमआरटीपीचे गुन्हे दाखल होत नसल्याचे उजेडात आले आहे. पालिकेकडूनही एमआरटीपीच्या नोटीसा बजावल्या जात असल्या तरी त्यांच्याकडून गुन्हे दाखल केले जात नाहीत. पालिकेकडून आतापर्यंत दीड हजाराच्या आसपास एमआरटीपीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यातील अवघ्या शे-दीडशे प्रकरणात एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे पालिकेने नोटीसा बजावल्या नंतर बरेचसे विकासक कोर्टात धाव घेऊन कोर्टातून स्टे मिळवतात. आतापर्यंत सुमारे चारशे प्रकरणात विकासकांनी पालिकेच्या कारवाईविरोधात कोर्टातून स्टे मिळवला आहे. पालिकेने नऊ प्रभाग समित्यांमध्ये प्रत्येकी एक-एक वकिल नेमला आहे. त्यासाठी त्यांना लाखो रुपये फी मोजावी लागत आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर स्टे मिळत असल्याने वकिलांची टीम कोर्टात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याचेच दिसून आले आहे.गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पालिकेने आतापर्यंत हजारो बेकायदा बांधकामे जमिनदोस्त केली आहेत. मात्र, बांधकामे पाडल्यानंतर बहुतेक प्रकरणांमध्ये संंंबंधित विकासकांविरोधात एमआरटीपीचे गुन्हे दाखल कन त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच पालिका आणि पोलीस बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना अभय देत असल्याचा आरोप केला जात आहे.