शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वसईतून वीस महिन्यात झालीत ५६० मुले बेपत्ता

By admin | Updated: September 28, 2016 02:55 IST

वसई तालुक्यातून अल्पवयीन विद्यार्थी आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस

विरार : वसई तालुक्यातून अल्पवयीन विद्यार्थी आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या नाहीत. यातील अद्याप अनेक मुलांचा शोध लागलेला नाही. मध्यमवर्गीय लोकवस्तीतून गृहोपयोगी साहित्य आणण्यासाठी बाजारात,नाक्यावरील दुकानात गेलेली हि मुले बेपत्ता झाली आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१५ मध्ये वसई-0९,विरार-७७, माणिकपूर-२५,नालासोपारा-३४,वालीव-७३, तुळींज-११०, अर्नाळा-0१ आणि जानेवारी ते आॅगस्ट २०१६ या कालवधीत वसई-0५, विरार-५२,माणिकपूर-0९, नालासोपारा-१३, वालीव-४९ , तुळींज-८७, अर्नाळा-0९ असे वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. तुळींज,वालीव आणि विरार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या वीस महिन्यात विरार-१२९, वालीव-१२२, तुळींज-१९७ असे ४४८ मुले बेपत्ता झाली आहेत. तर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० मुले हरवली आहेत. यातील मोजकीच मुले स्वत:हून परतली आहेत. तर मोजक्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. परत आलेल्या मुलांची नोंद केली जात नसल्याने नेमकी किती मुले परतली याची माहिती पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध नाही. तसेच १४ ते सतरा वयोगटातील मुला-मुलींचे प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे बेपत्ता मुलांची कागदोपत्री आकडेवारी वाढत चालली आहे. गायब होणाऱ्या मुलांचे वयोगट पाच ते सतरा असल्याचेही दिसून येत आहे. याप्रकरणी परप्रातिंय टोळ्या कार्यरत असल्याच्या वावड्या उडत असल्या तरी पोलिसांकडून या वृत्तास दुजोरा मिळाला नाही. (प्रतिनिधी)