शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वसईतून वीस महिन्यात झालीत ५६० मुले बेपत्ता

By admin | Updated: September 28, 2016 02:55 IST

वसई तालुक्यातून अल्पवयीन विद्यार्थी आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस

विरार : वसई तालुक्यातून अल्पवयीन विद्यार्थी आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या नाहीत. यातील अद्याप अनेक मुलांचा शोध लागलेला नाही. मध्यमवर्गीय लोकवस्तीतून गृहोपयोगी साहित्य आणण्यासाठी बाजारात,नाक्यावरील दुकानात गेलेली हि मुले बेपत्ता झाली आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१५ मध्ये वसई-0९,विरार-७७, माणिकपूर-२५,नालासोपारा-३४,वालीव-७३, तुळींज-११०, अर्नाळा-0१ आणि जानेवारी ते आॅगस्ट २०१६ या कालवधीत वसई-0५, विरार-५२,माणिकपूर-0९, नालासोपारा-१३, वालीव-४९ , तुळींज-८७, अर्नाळा-0९ असे वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. तुळींज,वालीव आणि विरार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या वीस महिन्यात विरार-१२९, वालीव-१२२, तुळींज-१९७ असे ४४८ मुले बेपत्ता झाली आहेत. तर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० मुले हरवली आहेत. यातील मोजकीच मुले स्वत:हून परतली आहेत. तर मोजक्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. परत आलेल्या मुलांची नोंद केली जात नसल्याने नेमकी किती मुले परतली याची माहिती पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध नाही. तसेच १४ ते सतरा वयोगटातील मुला-मुलींचे प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे बेपत्ता मुलांची कागदोपत्री आकडेवारी वाढत चालली आहे. गायब होणाऱ्या मुलांचे वयोगट पाच ते सतरा असल्याचेही दिसून येत आहे. याप्रकरणी परप्रातिंय टोळ्या कार्यरत असल्याच्या वावड्या उडत असल्या तरी पोलिसांकडून या वृत्तास दुजोरा मिळाला नाही. (प्रतिनिधी)