शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

वसईतून वीस महिन्यात झालीत ५६० मुले बेपत्ता

By admin | Updated: September 28, 2016 02:55 IST

वसई तालुक्यातून अल्पवयीन विद्यार्थी आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस

विरार : वसई तालुक्यातून अल्पवयीन विद्यार्थी आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या नाहीत. यातील अद्याप अनेक मुलांचा शोध लागलेला नाही. मध्यमवर्गीय लोकवस्तीतून गृहोपयोगी साहित्य आणण्यासाठी बाजारात,नाक्यावरील दुकानात गेलेली हि मुले बेपत्ता झाली आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१५ मध्ये वसई-0९,विरार-७७, माणिकपूर-२५,नालासोपारा-३४,वालीव-७३, तुळींज-११०, अर्नाळा-0१ आणि जानेवारी ते आॅगस्ट २०१६ या कालवधीत वसई-0५, विरार-५२,माणिकपूर-0९, नालासोपारा-१३, वालीव-४९ , तुळींज-८७, अर्नाळा-0९ असे वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. तुळींज,वालीव आणि विरार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या वीस महिन्यात विरार-१२९, वालीव-१२२, तुळींज-१९७ असे ४४८ मुले बेपत्ता झाली आहेत. तर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० मुले हरवली आहेत. यातील मोजकीच मुले स्वत:हून परतली आहेत. तर मोजक्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. परत आलेल्या मुलांची नोंद केली जात नसल्याने नेमकी किती मुले परतली याची माहिती पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध नाही. तसेच १४ ते सतरा वयोगटातील मुला-मुलींचे प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे बेपत्ता मुलांची कागदोपत्री आकडेवारी वाढत चालली आहे. गायब होणाऱ्या मुलांचे वयोगट पाच ते सतरा असल्याचेही दिसून येत आहे. याप्रकरणी परप्रातिंय टोळ्या कार्यरत असल्याच्या वावड्या उडत असल्या तरी पोलिसांकडून या वृत्तास दुजोरा मिळाला नाही. (प्रतिनिधी)