शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
2
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
3
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
4
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
5
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
6
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
7
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
8
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
9
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
11
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
12
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
13
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
15
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
16
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
17
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
18
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
19
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
20
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम

थेट प्रवाशांअभावी ५४ बसेस बंद

By admin | Updated: September 27, 2016 03:41 IST

थेट प्रवासी नसल्याचे कारण देवून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ एसट्या बंद करण्यात आल्यामुळे पालघर विभागाला दररोज १० ते १२ लाख रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती

- शशी करपे,  वसईथेट प्रवासी नसल्याचे कारण देवून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ एसट्या बंद करण्यात आल्यामुळे पालघर विभागाला दररोज १० ते १२ लाख रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्याचबरोबर एसट्या बंद झाल्याने दररोज शेकडो प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे हाल होऊ लागले आहेत. पर्यायी प्रवाशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना दूरवर मुंबईला जाऊन एसटी अथवा रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. थेट प्रवासी नसल्यामुळे या गाड्या बंद करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांने दिल्याचे बोलले जात आहे.थेट प्रवासी नसले तरी या लांब पल्ल्यांच्या गाड्या दररोज पन्नास हजार रुपयांचा गल्ला भरून काढत आहेत.पालघर विभागाच्या डेपोतून निघालेल्या या गाड्यांमध्ये शेवटच्या डेपोपर्यंत प्रवास करणारे प्रवासी कमी असतात. मात्र, टप्पा वाहतुकीचा परवाना, हात दाखवा आणि एस.टी.थांबवा हे धोरण तसेच वाहक आणि चालकाच्या प्रामाणिक सेवेमुळे पन्नास हजारांचा गल्ला गाठण्यास एस.टी.ला यश येत होते. डेपोतून निघालेली लांब पल्ल्याची गाडी महामार्ग,ठाणे,पनवेल,पुणे असे टप्पा प्रवासी घेत जाते. त्यासाठी वाहक ओरडून प्रवाशांना आवाहनही करताना दिसून येतात. त्यामुळेच या गाड्यांना भरपूर नफा मिळत होता. तरीही परिवहन मंत्र्यांच्या आदेशामुळे पालघर विभागातील लांब पल्ल्यांच्या गाड्या १ जुलैपासून बंद करण्यात आल्या आहेत. दररोजचा २१ हजार ८२१ किलोमीटरचा एस.टी.प्रवास आता बंद झाला आहे.त्यामुळे पालघर विभागातील एस.टीला दररोज १० ते १२ लाखांचा फटका बसत आहे.पालघर विभागांतर्गत जव्हार, डहाणू, बोईसर, पालघर, सफाळा, विरार,नालासोपारा आणि वसई असे आठ आगार येतात. त्यातून वडूज,पैठण, अमळनेर, औरंगाबाद, नंदुरबार, पाथर्डी, भुसावळ, धुळे, शिरपूर, चाळीसगांव, आंबेजोगाई, संगमनेर, पंढरपूर, लातूर, स्वारगेट, चोपडा, सोलापूर, भूम, फलटण, विटा, भुसावळ, बीड, कोल्हापूर, शहादा, अकोला,पाटोदा, सातारा, सांगोला, गेवराई, झांजवड अशा तीस ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना होणाऱ्या नफ्यामुळे शहरी वाहतुकीचा तोटा भरुन काढला जात होेता. मात्र,आता या नफ्यातील गाड्या बंद करून एसटीने आपल्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. बंद करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे पालघर विभाग अध्यक्ष भरत पेंढारी यांनी केला आहे.पालघर जिल्ह्यात एसटी हाच ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सामानासहीत थेट गावापर्यंत ये- जा करण्यासाठी एसटी हाच मार्ग आहे. मात्र, तो बंद झाल्याने आता शेकडो प्रवाशांना मुंबई सारख्या दूरवर जाऊन एसटी अथवा रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. जिल्हयात दूरवर रहात असलेल्या प्रवाशाला गावी जायचे असेल तर लोकलने मुंबई गाठावी लागते. विशेष म्हणजे या निर्णयाची जनतेला कोणतीही माहिती जाहीरपणे दिलेली नाही. याबाबत जाहीर आवाजही उठविला गेलेला नाही. विशेष म्हणजे ज्यांना या निर्णयाची खडान्खडा माहिती आहे अशा एसटी कामगार संघटनाही याबाबत काहीच आवाज उठवत नाहीत. मूळ गाडीकुठपर्यंतपालघर - औरंगाबाद नाशिकपालघर - नंदुरबार नाशिकपालघर - पाथर्डीनगरपालघर - भुसावळ धुळेपालघर - शिरपूर नाशिकवसई - आंबेजोगाई आळेफाटावसई -औरंगाबाद आळेफाटाअर्नाळा - चोपडा नाशिकअर्नाळा - सोलापूर इंदापूरअर्नाळा - पंढरपूर फलटणअर्नाळा - भूम जामखेडअर्नाळा - भुसावळ मालेगांवजव्हार - पंढरपूर फलटणजव्हा र- औरंगाबाद नाशिकजव्हार - अकोला धुळेबोईसर - पैठणनगरबोईसर - औरंगाबादनाशिकबोईसर - पाटोदा आळेफाटासोपारा - गेवराईशेवगांव