शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

थेट प्रवाशांअभावी ५४ बसेस बंद

By admin | Updated: September 27, 2016 03:41 IST

थेट प्रवासी नसल्याचे कारण देवून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ एसट्या बंद करण्यात आल्यामुळे पालघर विभागाला दररोज १० ते १२ लाख रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती

- शशी करपे,  वसईथेट प्रवासी नसल्याचे कारण देवून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ एसट्या बंद करण्यात आल्यामुळे पालघर विभागाला दररोज १० ते १२ लाख रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्याचबरोबर एसट्या बंद झाल्याने दररोज शेकडो प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे हाल होऊ लागले आहेत. पर्यायी प्रवाशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना दूरवर मुंबईला जाऊन एसटी अथवा रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. थेट प्रवासी नसल्यामुळे या गाड्या बंद करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांने दिल्याचे बोलले जात आहे.थेट प्रवासी नसले तरी या लांब पल्ल्यांच्या गाड्या दररोज पन्नास हजार रुपयांचा गल्ला भरून काढत आहेत.पालघर विभागाच्या डेपोतून निघालेल्या या गाड्यांमध्ये शेवटच्या डेपोपर्यंत प्रवास करणारे प्रवासी कमी असतात. मात्र, टप्पा वाहतुकीचा परवाना, हात दाखवा आणि एस.टी.थांबवा हे धोरण तसेच वाहक आणि चालकाच्या प्रामाणिक सेवेमुळे पन्नास हजारांचा गल्ला गाठण्यास एस.टी.ला यश येत होते. डेपोतून निघालेली लांब पल्ल्याची गाडी महामार्ग,ठाणे,पनवेल,पुणे असे टप्पा प्रवासी घेत जाते. त्यासाठी वाहक ओरडून प्रवाशांना आवाहनही करताना दिसून येतात. त्यामुळेच या गाड्यांना भरपूर नफा मिळत होता. तरीही परिवहन मंत्र्यांच्या आदेशामुळे पालघर विभागातील लांब पल्ल्यांच्या गाड्या १ जुलैपासून बंद करण्यात आल्या आहेत. दररोजचा २१ हजार ८२१ किलोमीटरचा एस.टी.प्रवास आता बंद झाला आहे.त्यामुळे पालघर विभागातील एस.टीला दररोज १० ते १२ लाखांचा फटका बसत आहे.पालघर विभागांतर्गत जव्हार, डहाणू, बोईसर, पालघर, सफाळा, विरार,नालासोपारा आणि वसई असे आठ आगार येतात. त्यातून वडूज,पैठण, अमळनेर, औरंगाबाद, नंदुरबार, पाथर्डी, भुसावळ, धुळे, शिरपूर, चाळीसगांव, आंबेजोगाई, संगमनेर, पंढरपूर, लातूर, स्वारगेट, चोपडा, सोलापूर, भूम, फलटण, विटा, भुसावळ, बीड, कोल्हापूर, शहादा, अकोला,पाटोदा, सातारा, सांगोला, गेवराई, झांजवड अशा तीस ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना होणाऱ्या नफ्यामुळे शहरी वाहतुकीचा तोटा भरुन काढला जात होेता. मात्र,आता या नफ्यातील गाड्या बंद करून एसटीने आपल्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. बंद करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे पालघर विभाग अध्यक्ष भरत पेंढारी यांनी केला आहे.पालघर जिल्ह्यात एसटी हाच ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सामानासहीत थेट गावापर्यंत ये- जा करण्यासाठी एसटी हाच मार्ग आहे. मात्र, तो बंद झाल्याने आता शेकडो प्रवाशांना मुंबई सारख्या दूरवर जाऊन एसटी अथवा रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. जिल्हयात दूरवर रहात असलेल्या प्रवाशाला गावी जायचे असेल तर लोकलने मुंबई गाठावी लागते. विशेष म्हणजे या निर्णयाची जनतेला कोणतीही माहिती जाहीरपणे दिलेली नाही. याबाबत जाहीर आवाजही उठविला गेलेला नाही. विशेष म्हणजे ज्यांना या निर्णयाची खडान्खडा माहिती आहे अशा एसटी कामगार संघटनाही याबाबत काहीच आवाज उठवत नाहीत. मूळ गाडीकुठपर्यंतपालघर - औरंगाबाद नाशिकपालघर - नंदुरबार नाशिकपालघर - पाथर्डीनगरपालघर - भुसावळ धुळेपालघर - शिरपूर नाशिकवसई - आंबेजोगाई आळेफाटावसई -औरंगाबाद आळेफाटाअर्नाळा - चोपडा नाशिकअर्नाळा - सोलापूर इंदापूरअर्नाळा - पंढरपूर फलटणअर्नाळा - भूम जामखेडअर्नाळा - भुसावळ मालेगांवजव्हार - पंढरपूर फलटणजव्हा र- औरंगाबाद नाशिकजव्हार - अकोला धुळेबोईसर - पैठणनगरबोईसर - औरंगाबादनाशिकबोईसर - पाटोदा आळेफाटासोपारा - गेवराईशेवगांव