शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४०० टन रासायनिक घनकचरा (स्लज) उघड्यावर पडून

By admin | Updated: May 30, 2017 05:09 IST

तारापूर एमआयडीसी च्या अधिपत्याखाली असलेल्या सम्प नंबर तीन मध्ये वर्षानुवर्षांपासून साचून राहिलेला सुमारे ४०० टन

पंकज राऊत /लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसी च्या अधिपत्याखाली असलेल्या सम्प नंबर तीन मध्ये वर्षानुवर्षांपासून साचून राहिलेला सुमारे ४०० टन रासायनिक घनकचरा (सांड पाण्यातील गाळ/स्लज ) सांडपाण्याचा दर्जा सुधारणयांसाठी तारापुर एनव्हायरोमेन्ट प्रोटेक्शन सोसायटी (टी ई पी एस) ने पुढाकार घेवून बाहेर काढला मात्र तो उघडयावर पडून आहे. पावसाळ्या पूर्वी त्याची विल्हेवाट न लावल्यास पावसाच्या पाण्यासोबत तो खारेकुरण, मुरबा खाडीत वाहून जाण्याची शक्यता आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निर्मित होणाऱ्या सांडपाण्याचा दर्जा न सुधारल्यास राष्ट्रीय हरित लवाद आणि म. प्र. नियंत्रण मंडळा कडून तारापूरच्या उद्योगांवर कारवार्ई होण्याच्या भीतीने सम्प नंबर तीन मध्ये साठून रहिलेला रासायनिक घनकचरा तारापुरचे २०० कारखाने तात्पुरते बंद ठेवून एक जेसीबी व पोकलेन आणि सुमारे १५० कामगार लावून काढण्यात आला आहे. प्लास्टिक वर जमा करून तो सुकविलाही आहे तो मुंबई वेस्ट मैनेजमेंटकडे विल्हेवाटी करीता तातडीने पाठविणे गरजेचे आहे मात्र एमआयडीसी व टीईपीएस या दोन संस्थांमध्ये त्याचा खर्च कोणी करावा या वादामुळे तो सध्या उघडयावरच पडलेला आहे. या स्लज ची तातडीने विल्हेवाट न लावल्यास खारेकुरण मुरबा-खाडीतील मच्छीवर तसेच आरोग्यवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सम्प तीन ७० टक्के गाळाने व्यपाल्याने तसेच पंचवीस वर्षात काढला न गेल्याने त्याचा विपरीत परिणाम सीईटीपीच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पहाणीत निदर्शनास आल्या नंतर त्यांनी टीमा व टीईपीएस यांना सम्प ३ मधील गाळ काढण्यासाठी उपाय योजण्याचे आवाहन केले होते त्या नंतर या दोन्ही संस्थानी पुढाकार घेऊन सम्प तीन मधील गाळ काढलायाबाबत ठोस व जलद निर्णय होणे अपेक्षित आहे नाहीतर हे घोंगडे भिजत राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम मच्छीमारांसह शेतकरी आणि नागरिकांना भोगावा लागेल.एमआयडीसीने जबाबदारी झटकलीहा घनकचरा एमआयडीसीने तळोजा येथील मुम्बई वेस्ट मॅनेजमेंट ला पाठवावा असे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच टीईपीएसने एमआयडीसीला दिले आहे. हा मात्र या घनकचऱ्यांची विल्हेवाट तातडीने लावणे एमआयडीसीला शक्य नसल्याने विलंब लागेल. त्यामुळे हे काम टीईपीएसनेच करावे असे एमआयडीसीच्या अधिक्षक अभियंत्यांनी सांगितल्याचे कळते या मुळे एमआयडीसी आपली जबाबदारी झटकू पाहते आहे. हेच सिद्ध होते आहे.