शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

४०० टन रासायनिक घनकचरा (स्लज) उघड्यावर पडून

By admin | Updated: May 30, 2017 05:09 IST

तारापूर एमआयडीसी च्या अधिपत्याखाली असलेल्या सम्प नंबर तीन मध्ये वर्षानुवर्षांपासून साचून राहिलेला सुमारे ४०० टन

पंकज राऊत /लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसी च्या अधिपत्याखाली असलेल्या सम्प नंबर तीन मध्ये वर्षानुवर्षांपासून साचून राहिलेला सुमारे ४०० टन रासायनिक घनकचरा (सांड पाण्यातील गाळ/स्लज ) सांडपाण्याचा दर्जा सुधारणयांसाठी तारापुर एनव्हायरोमेन्ट प्रोटेक्शन सोसायटी (टी ई पी एस) ने पुढाकार घेवून बाहेर काढला मात्र तो उघडयावर पडून आहे. पावसाळ्या पूर्वी त्याची विल्हेवाट न लावल्यास पावसाच्या पाण्यासोबत तो खारेकुरण, मुरबा खाडीत वाहून जाण्याची शक्यता आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निर्मित होणाऱ्या सांडपाण्याचा दर्जा न सुधारल्यास राष्ट्रीय हरित लवाद आणि म. प्र. नियंत्रण मंडळा कडून तारापूरच्या उद्योगांवर कारवार्ई होण्याच्या भीतीने सम्प नंबर तीन मध्ये साठून रहिलेला रासायनिक घनकचरा तारापुरचे २०० कारखाने तात्पुरते बंद ठेवून एक जेसीबी व पोकलेन आणि सुमारे १५० कामगार लावून काढण्यात आला आहे. प्लास्टिक वर जमा करून तो सुकविलाही आहे तो मुंबई वेस्ट मैनेजमेंटकडे विल्हेवाटी करीता तातडीने पाठविणे गरजेचे आहे मात्र एमआयडीसी व टीईपीएस या दोन संस्थांमध्ये त्याचा खर्च कोणी करावा या वादामुळे तो सध्या उघडयावरच पडलेला आहे. या स्लज ची तातडीने विल्हेवाट न लावल्यास खारेकुरण मुरबा-खाडीतील मच्छीवर तसेच आरोग्यवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सम्प तीन ७० टक्के गाळाने व्यपाल्याने तसेच पंचवीस वर्षात काढला न गेल्याने त्याचा विपरीत परिणाम सीईटीपीच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पहाणीत निदर्शनास आल्या नंतर त्यांनी टीमा व टीईपीएस यांना सम्प ३ मधील गाळ काढण्यासाठी उपाय योजण्याचे आवाहन केले होते त्या नंतर या दोन्ही संस्थानी पुढाकार घेऊन सम्प तीन मधील गाळ काढलायाबाबत ठोस व जलद निर्णय होणे अपेक्षित आहे नाहीतर हे घोंगडे भिजत राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम मच्छीमारांसह शेतकरी आणि नागरिकांना भोगावा लागेल.एमआयडीसीने जबाबदारी झटकलीहा घनकचरा एमआयडीसीने तळोजा येथील मुम्बई वेस्ट मॅनेजमेंट ला पाठवावा असे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच टीईपीएसने एमआयडीसीला दिले आहे. हा मात्र या घनकचऱ्यांची विल्हेवाट तातडीने लावणे एमआयडीसीला शक्य नसल्याने विलंब लागेल. त्यामुळे हे काम टीईपीएसनेच करावे असे एमआयडीसीच्या अधिक्षक अभियंत्यांनी सांगितल्याचे कळते या मुळे एमआयडीसी आपली जबाबदारी झटकू पाहते आहे. हेच सिद्ध होते आहे.