शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या २४ शाळा बंद पडणार

By admin | Updated: July 24, 2016 04:02 IST

विक्रमगड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २३७ शाळा असून त्यातील २४ शाळांची विदयार्थी पटसंख्या ही २० हून कमी असल्याने या शाळा भविष्यात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ कारण

- राहुल वाडेकर, विक्रमगडविक्रमगड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २३७ शाळा असून त्यातील २४ शाळांची विदयार्थी पटसंख्या ही २० हून कमी असल्याने या शाळा भविष्यात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ कारण २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातच जि. प. शिक्षण विभाग व शाळांवरील रिक्त असलेली पदे या सर्वाचा परिणाम एकंदरीत जिल्हा परिषद शाळांवर दिसून येत असून मुलांची पटसंख्या घटतांना दिसत आहेत़ विक्रमगड तालुक्यातील २४ केंद्रा अंतर्गत ठाकुरपाडा, आरजपाडा, चौधरीपाडा, फुफाणेपाडा, फुटखंडपाडा, फणसपाडा, चौधरीपाडा, तांबडीपाडा, रडेपाडा, म्हसेपाडा(साखरे), म्हसेपाडा (वाकी), गिंभलपाडा, खोरीपाडा, बोरसेपाडा, धोदडेपाडा, वडोलपाडा, झोपपाडा, वेडगेपाडा, सहारेपाडा, नडगेंपाडा, पलाटपाडा, खुडेद, अवचितपाडा, भोईरपाडा आदी शाळांची विदयार्थी पटसंख्या ही २० पेक्षा कमी असल्याने या शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे़तालुक्यातील बहुतेक शाळा हया आदिवासी बहुल भागात असल्याने आदिवासी मुलांच्या शैक्षणिक भवितव्यांवर परिणाम होऊ लागला आहे़ अनेक शाळांमध्ये सुविधांचा वनवा आहे़ विदयार्थ्यांसाठी स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेची सोय अशा गरजांमध्ये योग्य नियोजन नाही़ या सुविधा अपुऱ्या आहेत़ शासनाने जिल्हा परिषद शाळांना प्रोजेक्टर दिलेले आहेत मात्र त्यांच्या वायर दिलेल्या नाहीत व सर्व शाळा डिजिटल करण्याचा मानस आहे़ परंतु अनेक शाळांमध्ये वीज नाही, वीज आहे तर तिचा पुरेसा दाब नाही. बल्ब दिव्याप्रमाणे मिणमिणतात़ त्यामुळे जिल्हा पषिदेच्या प्राथमिक शाळांमधील वातावरण बिघडले असून याचा फटका मुख्यत:आदिवासी मुलांनाच बसणार असल्याचे चित्र आहे़शिक्षण विभागाचे धोरण चुकले कुठे...पालघर जिल्यांतील पाच तालुक्यांना गट शिक्षणाधिकारी नाहीत. मोखाडा, डहाणु व पालघर हे तालुके वगळले तर जव्हार, तलासरी, वसई, विक्रमगड, वाडा या पाच तालुक्यांची जबाबदारी विस्तार, अधिकारी सांभाळत आहेत़ तर अनेक शाळांत मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्यामुळे वरिष्ठ शिक्षकांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवून वेळ मारुन नेली जात आहे़ १५० पटसंख्या असेल तरच मुख्याध्यापक देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे़ त्याचा फटका शाळांना बसला आहे़ विक्रमगड शिक्षण विभागातील गट शिक्षणाधिकारी हे पदे तालुका अस्तित्वापासुन रिक्तच असल्याने तो कारभार विस्तार अधिकारी हे पाहत आलेले आहेत़ त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या पदांवर काम करीतांना त्यांना पुरेसा वेळ प्राथमिक शाळांना देता येत नसल्याच्या तक्रारी आहेत़ विद्यार्थी वाढीसाठी विशेष उपक्रमयाबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी पटसंख्या कमी असलेल्या शाळांची या शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत असे सांगीतले. एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगीतले की,ज्या शाळांवर ३ ंिकंवा ६ अगर ७ विदयार्थी पटसंख्या आहेत़ त्या ठिकाणी दोन दोन शिक्षक व ज्या ठिकाणी १ ली ते ८ वी पर्यत असलेल्या मोठया शाळांवर विदयार्थी संख्या जास्त असतांनाही पाच ते सहा शिक्षक यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एकच शिक्षक ठेवुन दुसरा शिक्षक पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर वर्ग करावा अशी मागणी आहे़