शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

होळीसाठी वसईतून कोकणात जाणार २० एसटी; एका बसमध्ये फक्त ३० प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:50 IST

गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमीच बस सोडणार

सुनील घरत पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून त्याचे सावट होळी सणावरही आहे. त्यामुळे होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असेल असा अंदाज घेत एसटी महामंडळाकडून वसई-विरारमधून होळीसाठी कोकणात २० बसेसच सोडल्या जाणार आहेत. त्यातही प्रत्येक बसमध्ये कोविडच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून केवळ ३० प्रवासीच राहणार आहेत.

यंदा कोरोना रुग्णांची पुन्हा वाढती संख्या पाहता शिमगोत्सव उत्साहात होणाऱ्या कोकणातीलही अनेक गावांत यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे शहरांतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असेल, असा अंदाज आहे आणि कोकणात जाऊ इच्छिणारे चाकरमानी धोका टाळण्यासाठी सार्वजनिकपेक्षा खासगी वाहनांचा आधार घेण्याच्या विचारात आहेत. तरीही सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून कोकणाकडे जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा २८ मार्चला होळी आणि २९ मार्चला धूलिवंदन आहे. त्या अनुषंगाने वसई-विरारमधून कोल्हापूर, खेड, महाबळेश्वर, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण या गाड्या २७ मार्चला १० वाजता व २८ मार्चला १० वाजता सोडण्यात येणार असून, २ मार्च व ३ मार्चला या बस परतीचा प्रवास करणार आहेत. अर्नाळा, नालासोपारा, वसई आगारातून या गाड्या धावणार असून, प्रत्येक बसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत. गेल्या वर्षी शिमगोत्सवानिमित्त वसई - विरारमधून २३ ते २४ बस कोकणाकडे धावल्या होत्या, मात्र यंदा कोरोनामुळे ही संख्या थोडी कमी केली आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येणाऱ्यांना कोरोनाचा रिपोर्ट बंधनकारक असेल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी हा रिपोर्ट करावा लागणार आहे.

कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत. तसेच गाडीत प्रवासादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करून, मास्क बंधनकारक आहे. गाडीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. - राजेंद्र जगताप, नियंत्रक, एसटी पालघर विभाग.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या