शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

होळीसाठी वसईतून कोकणात जाणार २० एसटी; एका बसमध्ये फक्त ३० प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:50 IST

गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमीच बस सोडणार

सुनील घरत पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून त्याचे सावट होळी सणावरही आहे. त्यामुळे होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असेल असा अंदाज घेत एसटी महामंडळाकडून वसई-विरारमधून होळीसाठी कोकणात २० बसेसच सोडल्या जाणार आहेत. त्यातही प्रत्येक बसमध्ये कोविडच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून केवळ ३० प्रवासीच राहणार आहेत.

यंदा कोरोना रुग्णांची पुन्हा वाढती संख्या पाहता शिमगोत्सव उत्साहात होणाऱ्या कोकणातीलही अनेक गावांत यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे शहरांतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असेल, असा अंदाज आहे आणि कोकणात जाऊ इच्छिणारे चाकरमानी धोका टाळण्यासाठी सार्वजनिकपेक्षा खासगी वाहनांचा आधार घेण्याच्या विचारात आहेत. तरीही सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून कोकणाकडे जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा २८ मार्चला होळी आणि २९ मार्चला धूलिवंदन आहे. त्या अनुषंगाने वसई-विरारमधून कोल्हापूर, खेड, महाबळेश्वर, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण या गाड्या २७ मार्चला १० वाजता व २८ मार्चला १० वाजता सोडण्यात येणार असून, २ मार्च व ३ मार्चला या बस परतीचा प्रवास करणार आहेत. अर्नाळा, नालासोपारा, वसई आगारातून या गाड्या धावणार असून, प्रत्येक बसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत. गेल्या वर्षी शिमगोत्सवानिमित्त वसई - विरारमधून २३ ते २४ बस कोकणाकडे धावल्या होत्या, मात्र यंदा कोरोनामुळे ही संख्या थोडी कमी केली आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येणाऱ्यांना कोरोनाचा रिपोर्ट बंधनकारक असेल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी हा रिपोर्ट करावा लागणार आहे.

कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत. तसेच गाडीत प्रवासादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करून, मास्क बंधनकारक आहे. गाडीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. - राजेंद्र जगताप, नियंत्रक, एसटी पालघर विभाग.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या