शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

होळीसाठी वसईतून कोकणात जाणार २० एसटी; एका बसमध्ये फक्त ३० प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:50 IST

गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमीच बस सोडणार

सुनील घरत पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून त्याचे सावट होळी सणावरही आहे. त्यामुळे होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असेल असा अंदाज घेत एसटी महामंडळाकडून वसई-विरारमधून होळीसाठी कोकणात २० बसेसच सोडल्या जाणार आहेत. त्यातही प्रत्येक बसमध्ये कोविडच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून केवळ ३० प्रवासीच राहणार आहेत.

यंदा कोरोना रुग्णांची पुन्हा वाढती संख्या पाहता शिमगोत्सव उत्साहात होणाऱ्या कोकणातीलही अनेक गावांत यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे शहरांतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असेल, असा अंदाज आहे आणि कोकणात जाऊ इच्छिणारे चाकरमानी धोका टाळण्यासाठी सार्वजनिकपेक्षा खासगी वाहनांचा आधार घेण्याच्या विचारात आहेत. तरीही सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून कोकणाकडे जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा २८ मार्चला होळी आणि २९ मार्चला धूलिवंदन आहे. त्या अनुषंगाने वसई-विरारमधून कोल्हापूर, खेड, महाबळेश्वर, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण या गाड्या २७ मार्चला १० वाजता व २८ मार्चला १० वाजता सोडण्यात येणार असून, २ मार्च व ३ मार्चला या बस परतीचा प्रवास करणार आहेत. अर्नाळा, नालासोपारा, वसई आगारातून या गाड्या धावणार असून, प्रत्येक बसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत. गेल्या वर्षी शिमगोत्सवानिमित्त वसई - विरारमधून २३ ते २४ बस कोकणाकडे धावल्या होत्या, मात्र यंदा कोरोनामुळे ही संख्या थोडी कमी केली आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येणाऱ्यांना कोरोनाचा रिपोर्ट बंधनकारक असेल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी हा रिपोर्ट करावा लागणार आहे.

कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत. तसेच गाडीत प्रवासादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करून, मास्क बंधनकारक आहे. गाडीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. - राजेंद्र जगताप, नियंत्रक, एसटी पालघर विभाग.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या