शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वसईतील २९ गावे पुन्हा लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:38 IST

सुनावणी निवडणुकीनंतर; १० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेतून २९ गावे वगळण्याची सुनावणी बुधवारी होणार होती. मात्र, या प्रकरणी तातडीची आवश्यकता नसल्याचे सांगत निवडणुकीनंतर पुढील सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता गावांचा निकाल हा निवडणुकीनंतर लागणार आहे.२००९ मध्ये तत्कालीन चार नगरपरिषदा आणि ५३ ग्रामपंचायती मिळून वसई - विरार शहर महापालिका स्थापन करण्यात आली. मात्र, वसईच्या पूर्व - पश्चिम पट्ट्यातील २९ गावांनी महापालिकेत जाण्यासाठी जोरदार विरोध केला होता. मात्र, गेल्या १० वर्षांत गावे काही वगळली गेली नाहीत. सभा, आंदोलन, उपोषण, मोर्चे, विविध समित्या, आश्वासने, न्यायालयीन प्रक्रिया, कायदेशीर अडचणी यात गावांचा प्रश्न पार भिजत राहिला. मधल्या काळात राज्य सरकारने गावे वगळण्याची अधिसूचना रद्द करण्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून गावांचा समावेश महापालिकेत करावा, असे प्रतिज्ञापत्र जानेवारी २०१५ मध्ये सादर केले होते. मात्र, हे प्रतिज्ञापत्र पुन्हा मागे घेत मे २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी गावांचा समावेश करण्याचे जाहीर केले गेले. त्यानुसार गावे वगळण्यात यावी, असे प्रतिज्ञापत्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी पुन्हा सादर करण्यात आले होते.त्यानंतर झालेल्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी तारीख पे तारीखचा हा सिलसिला सुरूच आहे, आणि आता तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याने हा प्रश्नच गुंडाळून टाकण्यात आला आहे. किंबहुना बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही. तर आता या प्रकरणाची सुनावणी थेट निवडणूक झाल्यानंतरच होणार असल्याचे जनआंदोलनचे प्रफुल ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार