शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील २९ गावे पुन्हा लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:38 IST

सुनावणी निवडणुकीनंतर; १० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेतून २९ गावे वगळण्याची सुनावणी बुधवारी होणार होती. मात्र, या प्रकरणी तातडीची आवश्यकता नसल्याचे सांगत निवडणुकीनंतर पुढील सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता गावांचा निकाल हा निवडणुकीनंतर लागणार आहे.२००९ मध्ये तत्कालीन चार नगरपरिषदा आणि ५३ ग्रामपंचायती मिळून वसई - विरार शहर महापालिका स्थापन करण्यात आली. मात्र, वसईच्या पूर्व - पश्चिम पट्ट्यातील २९ गावांनी महापालिकेत जाण्यासाठी जोरदार विरोध केला होता. मात्र, गेल्या १० वर्षांत गावे काही वगळली गेली नाहीत. सभा, आंदोलन, उपोषण, मोर्चे, विविध समित्या, आश्वासने, न्यायालयीन प्रक्रिया, कायदेशीर अडचणी यात गावांचा प्रश्न पार भिजत राहिला. मधल्या काळात राज्य सरकारने गावे वगळण्याची अधिसूचना रद्द करण्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून गावांचा समावेश महापालिकेत करावा, असे प्रतिज्ञापत्र जानेवारी २०१५ मध्ये सादर केले होते. मात्र, हे प्रतिज्ञापत्र पुन्हा मागे घेत मे २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी गावांचा समावेश करण्याचे जाहीर केले गेले. त्यानुसार गावे वगळण्यात यावी, असे प्रतिज्ञापत्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी पुन्हा सादर करण्यात आले होते.त्यानंतर झालेल्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी तारीख पे तारीखचा हा सिलसिला सुरूच आहे, आणि आता तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याने हा प्रश्नच गुंडाळून टाकण्यात आला आहे. किंबहुना बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही. तर आता या प्रकरणाची सुनावणी थेट निवडणूक झाल्यानंतरच होणार असल्याचे जनआंदोलनचे प्रफुल ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार