शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

जि.प. निवडणूक काळात सावंगी ठाणेदाराचा प्रभार काढावा

By admin | Updated: January 17, 2017 01:04 IST

जि.प. व पं.स. काळात सावंगी (मेघे) येथील ठाणेदार संतोष शेगावकर यांचा प्रभार काढावा, ..

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन : निवडणूक प्रभावित होण्याची भीतीवर्धा : जि.प. व पं.स. काळात सावंगी (मेघे) येथील ठाणेदार संतोष शेगावकर यांचा प्रभार काढावा, अशी तक्रारवजा मागणी जि. प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सोमवारी केली आहे. सदर तक्रारीची प्रतिलिपी राज्य निवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया यांनाही पाठविली आहे. २९ डिसेंबर २०१६ रोजी किशोर दौड, विलास दौड व अमर चौधरी सर्व रा. सावंगी(मेघे) यांनी एका कार्यक्रमात शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याची तक्रार दाखल करण्याकरिता सावंगी(मेघे) येथील पोलीस ठाण्यात गेलो असता ठाणेदार शेगावकर यांनी आपले काहीही ऐकून न घेता गेट आऊट म्हटले. उलट तू दारू पिऊन आहे. पोलीस ठाण्यात कसा आला म्हणून आपणासह कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देत अश्लील शिवीगाळ केली. इतकेच नव्हे, तर निवडणूक कशी काय लढतो, अशी धमकीहीे दिली आहे. येत्या १६ फेब्रुवारीला जि.प. निवडणूक होऊ घातली आहे. सावंगी(मेघे) जि.प. गट हा आपला मतदार संघ आहे. त्यांच्या धमकीमुळे आपली निवडणूक प्रभावित होण्याची शक्यता असून आपणावर ते खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता निवडणूक काळापर्यंत सदर ठाणेदाराचा प्रभार काढावा, याकडेही जि.प. उपाध्यक्ष कांबळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे.२९ डिसेंबरला घडलेल्या प्रकाराची तक्रार यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केलेली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहविभाग(ग्रामीण)चे राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेसुद्धा रितसर तक्रार दिलेली आहे, ही बाब तक्रारीत नमुद आहे. ठाणेदार शेगावकर यांची सावंगी(मेघे) येथील कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. किशोर व विलास दौड यांच्या अवैधधंद्यांना त्यांचा भक्कम पाठींबा आहे. यापूर्वीच्या ठाणेदारांनी त्यांच्यावर केलेल्या कारवायामुळे या दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहे. सदर ठाणेदाराच्या कार्यकाळातही अवैधधंदे सुरू असताना एकही कारवाई केलेली नाही. ही बाब ठाणेदार आणि विलास व किशोर दौड यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारी आहे. यामुळेच आपणाला अपमानास्पद वागणूक मिळाली. सदर ठाणेदाराने आचार संहितेच्या काळात खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याची तक्रार आधीच केलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक काळापर्यंत त्यांचा प्रभार काढावा, अशी विनंतीही विलास कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)