शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

जि.प. निवडणूक काळात सावंगी ठाणेदाराचा प्रभार काढावा

By admin | Updated: January 17, 2017 01:04 IST

जि.प. व पं.स. काळात सावंगी (मेघे) येथील ठाणेदार संतोष शेगावकर यांचा प्रभार काढावा, ..

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन : निवडणूक प्रभावित होण्याची भीतीवर्धा : जि.प. व पं.स. काळात सावंगी (मेघे) येथील ठाणेदार संतोष शेगावकर यांचा प्रभार काढावा, अशी तक्रारवजा मागणी जि. प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सोमवारी केली आहे. सदर तक्रारीची प्रतिलिपी राज्य निवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया यांनाही पाठविली आहे. २९ डिसेंबर २०१६ रोजी किशोर दौड, विलास दौड व अमर चौधरी सर्व रा. सावंगी(मेघे) यांनी एका कार्यक्रमात शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याची तक्रार दाखल करण्याकरिता सावंगी(मेघे) येथील पोलीस ठाण्यात गेलो असता ठाणेदार शेगावकर यांनी आपले काहीही ऐकून न घेता गेट आऊट म्हटले. उलट तू दारू पिऊन आहे. पोलीस ठाण्यात कसा आला म्हणून आपणासह कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देत अश्लील शिवीगाळ केली. इतकेच नव्हे, तर निवडणूक कशी काय लढतो, अशी धमकीहीे दिली आहे. येत्या १६ फेब्रुवारीला जि.प. निवडणूक होऊ घातली आहे. सावंगी(मेघे) जि.प. गट हा आपला मतदार संघ आहे. त्यांच्या धमकीमुळे आपली निवडणूक प्रभावित होण्याची शक्यता असून आपणावर ते खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता निवडणूक काळापर्यंत सदर ठाणेदाराचा प्रभार काढावा, याकडेही जि.प. उपाध्यक्ष कांबळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे.२९ डिसेंबरला घडलेल्या प्रकाराची तक्रार यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केलेली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहविभाग(ग्रामीण)चे राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेसुद्धा रितसर तक्रार दिलेली आहे, ही बाब तक्रारीत नमुद आहे. ठाणेदार शेगावकर यांची सावंगी(मेघे) येथील कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. किशोर व विलास दौड यांच्या अवैधधंद्यांना त्यांचा भक्कम पाठींबा आहे. यापूर्वीच्या ठाणेदारांनी त्यांच्यावर केलेल्या कारवायामुळे या दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहे. सदर ठाणेदाराच्या कार्यकाळातही अवैधधंदे सुरू असताना एकही कारवाई केलेली नाही. ही बाब ठाणेदार आणि विलास व किशोर दौड यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारी आहे. यामुळेच आपणाला अपमानास्पद वागणूक मिळाली. सदर ठाणेदाराने आचार संहितेच्या काळात खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याची तक्रार आधीच केलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक काळापर्यंत त्यांचा प्रभार काढावा, अशी विनंतीही विलास कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)