शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना अक्षरज्ञानच नाही

By admin | Updated: March 6, 2015 01:50 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने वार्षिक शाळा तपासणी झाली. यात सेलू तालुक्यात जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरज्ञान नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

आकोली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने वार्षिक शाळा तपासणी झाली. यात सेलू तालुक्यात जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरज्ञान नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती बाबतही चिंता व्यक्त करणारी परिस्थिती आहे. शिक्षकाला ब्रह्माची उपमा दिली गेली आहे. शिक्षकांनी प्रमाणिकपणे, निष्ठेने अध्यापनाचे पवित्र कार्य करणे अपेक्षित आहे. त्याकरिता शिक्षकांना वेतन दिले जाते. बहुतांश शिक्षक अध्यापनाशी बांधिलकी जोपासून विद्यार्जनाचे पवित्र कार्य करतात; मात्र काही केवळ वेतनाकरिताच कार्य करीत असल्याचे समोर येत आहे. सेलू तालुक्यात हिच स्थिती असल्याचे या तपासणीत समोर आले आहे. केवळ पगाराकरिता काम करणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. सर्व शिक्षा अभियानातून शाळा चकचकीत झाल्या असल्या तरी शिक्षणाचा दर्जा मात्र सुमार होत चालला आहे. शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांकडून नियमाप्रमाणे वार्षिक शालेय तपासणी झाली. ही तपासणी काटेकोरपणे झाली वा कागदोपत्र हे लवकरच समोर येईल. असे असले तरी सेलू तालुक्यातील विद्यार्थ्यांचे वास्तव पुढे आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थितीही योग्यच दाखविण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्र पडताळणी घेण्यात आली. यात त्याला लिहीता येते का, वाचता येते का, गणित सोडविता येते का या बाबी पडताळण्यात आल्या. यावरून शिक्षकाचा अहवालही तयार करण्यात आला.(वार्ताहर)