शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

जिल्हा बँकेच्या ठेवीदारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: August 19, 2014 23:52 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आली आहे. यातून बँकेला वर काढण्याकरिता शासनाच्यावतीने १०२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे; ही मदत जाहीर करण्यात आली असली तरी ती देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे.

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आली आहे. यातून बँकेला वर काढण्याकरिता शासनाच्यावतीने १०२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे; ही मदत जाहीर करण्यात आली असली तरी ती देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. यामुळे ठेविदारांच्या बँकेतील रकमा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे, असा आरोप करीत मंगळवारी ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.दुपारी १२ वाजता रेल्वे स्थानकासमोर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून ठेवीदारांचा मोर्चा निघाला. या मोर्चात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व मध्यवर्ती बँकेच्या ठेवीदारांनी सहभाग नोंदविला होता. हा मोर्चा बजाज चौक, आंबेडकर चौक या मार्गे आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी एका एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनातून बँकेला वाचवून ठेविदरांच्या रकमा परत करण्याची मुख्य मागणी केली आहे. गत दोन महिन्यांपासून बँकेला जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजची रक्कम अद्याप देण्यात आली नाही. सदर प्रकरण न्यायालयात आहे. यात बँकांना मदत करण्याकरिता न्यायालयाच्यावतीने २१ आॅगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. यात बँकेला तर मदत मिळाली तर ठेवीदारांच्या रकमा वाचतील.न्यायालयाचा निकाल जर रिझर्व बँकेच्या बाजूने लागला तर बँकेतील खातेदारांच्या रकमा बुडल्याशिवाय राहणार नाही. ठेवीदारांची रक्कम वाचविण्याकरिता ठेवीदारांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात तिसरा पक्ष म्हणून ठेवीदारांनी याचिका दाखल केली आहे. २१ आॅगस्ट रोजी येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या मोर्चात किसान अधिकार अभियानच्या पदाधिकारी आणि सदस्यांसह बँकेचे ठेवीदार व शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)