शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेती काळाची गरज

By admin | Updated: April 2, 2016 02:44 IST

गत शतकात शेती तंत्रज्ञानावर रसायनांचे राज्य होते. आज जणुकीय तंत्रज्ञान प्रभावी होवू पाहत आहे. दोन्ही प्रकारचे तंत्रज्ञान पर्यावरण,

सुभाष पाळेकर : बदलत्या हवामान व शाश्वत शेतीवर मंथनवर्धा : गत शतकात शेती तंत्रज्ञानावर रसायनांचे राज्य होते. आज जणुकीय तंत्रज्ञान प्रभावी होवू पाहत आहे. दोन्ही प्रकारचे तंत्रज्ञान पर्यावरण, जैवविविधता व मानवीय आरोग्यास हानिकारक असल्याने शाश्वत पद्धतीने जमिनीची सुपकिता टिकवून ठेवणे काळाची गरज आहे, असे मत नैसर्गिक शेतीचे जनक पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले.न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्सच्या जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे ‘बदलत्या हवामानाचा शाश्वत शेतीवर होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वातावरणातील बदलाने निसर्ग अधिकाधिक लहरी होत आहे. कृषी क्षेत्रातील जमिनीतही घट होत आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर करून किमान जागेत अधिक उत्पादन देवू शकणारे झिरो बजेट नैसर्गिक शेतीची भारताला खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम करेल असे ठाम मत पाळेकर यांनी मांडले. यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य वन संरक्षण तथा महाराष्ट्र राज्य जैवविविधता बोर्डाचे अध्यक्ष डॉ. दिलीप सिंह, डॉ. अजय पंचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती. सृष्टीतील प्रत्येक जीव परस्परांवर अवलंबून आहे. कुठलाच जीव स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकत नाही. भारताला संपन्न जैवविविधतेचा वारसा लाभला असताना बदलत्या वातावरणात या वैभवाचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढकार घ्यावा, असे आवाहन डॉ.दिलीप सिंह यांनी बीज भाषणातून केले.पहिल्या तांत्रिक सत्राचे अध्यक्ष विजय जावंधिया होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाची आधारभूत किंमत मिळणे, उत्पादन खर्च, आधारभूत हमीभाव यातील कमालीची तफावत हे शेतकऱ्यांच्या समस्यांचे मुळ कारण असल्याचे जावंधिया यांनी सांगितले. शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत असताना काही नाविन्यपूर्ण परिणाम दिसून आल्यास त्याच्या स्वामीत्व हक्काबद्दल शेतकऱ्यांने जागृक असावे, असे मत डॉ. अजय पंचभाई यांनी व्यक्त केले.दुसऱ्या तांत्रिक सत्रात शेत ही एक व्यवस्था समजून त्यांतील जैवविविधता वाढविणे, शेतीजन्य कचऱ्यातील पोषण द्रव्यांचा वापर, कमीजास्त उंची असणाऱ्या पिकांची ऐकमेकांसोबत लागवड करणे, एकल पिकापेक्षा बहुवीधपीक पद्धतीत सर्व पिकांची उत्पादिकता अधिक असल्याने शेतकऱ्यांने अश्या पर्यायांचा विचार करावा, असे आवाहन डॉ. संयोगिता देशमुख यांनी केले. जगभरातील नामांकित शेती संशोधन संस्थांच्या संशोधनावरील आधारित अहवालातून रासायनिक खते, किटकनाशकांचा वापर न करता जैविक पद्धतीने जमिनीची सुपिकता वाढल्याचे निदर्शनास येत असताना सुक्ष्म जिवाणूंच्या वापरावर भर द्यावा, असे विचार डॉ. आरती शणवारे यांनी मांडले. कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सुभाष पाळेकर यांचा महाविद्यालयातर्फे शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून सत्कार केला. यावेळी चेतन झाडे, दिनकर जायले, वैभव उघडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.(स्थानिक प्रतिनिधी)