शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

देश आणि देहासाठी युवकांनी एक तास द्यावा- एन. सुब्बाराव

By admin | Updated: June 30, 2015 02:45 IST

मनाचे संतुलन, दृढ आत्मविश्वास स्वामी विवेकानंदाच्या अध्यात्मिक शिकवणीवर आजच्या युवकांनी भर द्यावा, तसेच

नेहरू युवा केंद्राची पुनर्जागरण यात्रा : खासदारांनी दाखविली हिरवी झेंडीवर्धा: मनाचे संतुलन, दृढ आत्मविश्वास स्वामी विवेकानंदाच्या अध्यात्मिक शिकवणीवर आजच्या युवकांनी भर द्यावा, तसेच देशासाठी आणि देहासाठी रोज एक तास देऊन ग्रमोद्योगाला चालना देण्यासाठी पुढे यावे, असे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते एन. सुब्बाराव यांनी केले.विकास भवन येथे सोमवारी नेहरू युवा केंद्राच्या पुनर्जागरण यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, केंद्राच्या समन्वयक ज्योती मोहिते यांची उपस्थिती होती. खा. तडस म्हणाले, देशात परिवर्तन केवळ युवकच घडवू शकतात. प्रत्येक अडचणीवर युवकच प्रभावीपणे मात करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार लोकप्रतिनिधींनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत मिळवून द्याव्यात. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून पुनर्जागरण यात्रा सुरू होत आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.नेहरू युवा केंद्राच्या या उपक्रमातून नेतृत्त्वाची उभारणी होण्यास मदतच होणार आहे. याच युवकांच्या माध्यमातून त्यांना प्रशासनाकडून प्रशिक्षित करून शासनाच्या विविध योजना पथनाट्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत यापुढेही पोहचविण्याचा विचार करण्यात येईल. या युवकांकडून जनसामान्यांच्या असलेल्या अडीअडचणीही समजून घेण्यास मदतच होणार आहे. ही यात्रा १०४ गावात पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती देणार आहे. या यात्रेचा युवकांनी अधिकाधिक फायदा घेऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यावेळी म्हणाले. प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलनाने यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत केंद्राच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी केले. तसेच एन. सुब्बाराव यांचा परिचय करून दिला. शेतकरी आत्महत्येवर आधारित पथनाट्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. पथनाट्याच्या यात्रेला एन. सुब्बाराव यांच्या उपस्थितीत खा. तडस, जिल्हाधिकारी सलील यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा युवा सल्लागार समितीचे हेमचंद्र वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे प्रा. मोहन गुजरकर यावेळी उपस्थिती होते.(प्रतिनिधी)