शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

देश आणि देहासाठी युवकांनी एक तास द्यावा- एन. सुब्बाराव

By admin | Updated: June 30, 2015 02:45 IST

मनाचे संतुलन, दृढ आत्मविश्वास स्वामी विवेकानंदाच्या अध्यात्मिक शिकवणीवर आजच्या युवकांनी भर द्यावा, तसेच

नेहरू युवा केंद्राची पुनर्जागरण यात्रा : खासदारांनी दाखविली हिरवी झेंडीवर्धा: मनाचे संतुलन, दृढ आत्मविश्वास स्वामी विवेकानंदाच्या अध्यात्मिक शिकवणीवर आजच्या युवकांनी भर द्यावा, तसेच देशासाठी आणि देहासाठी रोज एक तास देऊन ग्रमोद्योगाला चालना देण्यासाठी पुढे यावे, असे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते एन. सुब्बाराव यांनी केले.विकास भवन येथे सोमवारी नेहरू युवा केंद्राच्या पुनर्जागरण यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, केंद्राच्या समन्वयक ज्योती मोहिते यांची उपस्थिती होती. खा. तडस म्हणाले, देशात परिवर्तन केवळ युवकच घडवू शकतात. प्रत्येक अडचणीवर युवकच प्रभावीपणे मात करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार लोकप्रतिनिधींनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत मिळवून द्याव्यात. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून पुनर्जागरण यात्रा सुरू होत आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.नेहरू युवा केंद्राच्या या उपक्रमातून नेतृत्त्वाची उभारणी होण्यास मदतच होणार आहे. याच युवकांच्या माध्यमातून त्यांना प्रशासनाकडून प्रशिक्षित करून शासनाच्या विविध योजना पथनाट्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत यापुढेही पोहचविण्याचा विचार करण्यात येईल. या युवकांकडून जनसामान्यांच्या असलेल्या अडीअडचणीही समजून घेण्यास मदतच होणार आहे. ही यात्रा १०४ गावात पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती देणार आहे. या यात्रेचा युवकांनी अधिकाधिक फायदा घेऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यावेळी म्हणाले. प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलनाने यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत केंद्राच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी केले. तसेच एन. सुब्बाराव यांचा परिचय करून दिला. शेतकरी आत्महत्येवर आधारित पथनाट्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. पथनाट्याच्या यात्रेला एन. सुब्बाराव यांच्या उपस्थितीत खा. तडस, जिल्हाधिकारी सलील यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा युवा सल्लागार समितीचे हेमचंद्र वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे प्रा. मोहन गुजरकर यावेळी उपस्थिती होते.(प्रतिनिधी)