शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी व्यसनापासून दूर राहावे

By admin | Updated: October 20, 2015 02:50 IST

व्यसन प्रत्येकासाठी घातकच असते. व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगा केला

वर्धा : व्यसन प्रत्येकासाठी घातकच असते. व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगा केला पाहिजे. मानसिक ताणतणाव हेच व्यसनाचे मुख्य कारण आहे. युवा वर्गही व्यसनाकडे वळतो. व्यसनामुळे स्व-शरीरासह समाजमनावरही त्याचा विपरित परिणाम होतो. व्यसनामुळे मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक हानी होते. यामुळे सर्वांनीच व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जि.प. समाज कल्याण विभागच्यावतीने तसेच नशाबंदी मंडळ यांच्या सहकार्याने महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह घेण्यात आला. सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके तर अतिथी म्हणून विशेष अधिकारी दीपा हेराळे, ज्ञानेश्वर येवतकर, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य बाबा शंभरकर आदी उपस्थित होते. कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी रूपाली कोरडे, रोशनी मडावी, रोहन पिंपळकर, आशिष अंबुलकर, अमोल, महिंद्र, प्रांजल, नेहा तसेच अ‍ॅड. पूजा जाधव, विशाल उराडे, तुकाराम घोडे महाराज, नितेश कराळे, अविनाश सोमनाथे, प्रज्ञा ब्राह्मणकर, मयूर धरणे, दौलत पवार, डॉ. सागरसिंह कच्छवाह, आशिष कुबडे, रामेश्वर सदाफळे आदींनी पथनाट्याद्वारे व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. जि.प. समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके यांनी व्यसनापासून सर्वांनी दूर राहणार आणि इतरांनाही व्यसन करू देणार नाही, याबाबत सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा ब्राह्मणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरेश कोंडे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून करण्यात आली. व्यसनमुक्ती सप्तामध्ये जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात पोहोचून जनजागृती करण्याचा प्रयत्न जि.प. समाज कल्याण विभागाकडून करण्यात आला. यास युवकांचाही प्रतिसाद लाभला.(स्थानिक प्रतिनिधी)जि.प. समाज कल्याण विभाग, नशाबंदी मंडळ आणि समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातही व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. युवकांनीच पुढाकार घेतल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनीही यातून व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला. महाविद्यालयातील युवक-युवतींनी पथनाट्याच्या माध्यमातून कुठलेही व्यसन व्यक्तीला कसे लाचार करते, हे ग्रामस्थांना समजावून सांगितले. दारू ही सर्वात वाईट असून ती कशी जीवनाचा नाश करते, यावरही पथनाट्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.