शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
3
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा
4
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
5
गुंतवणूकदारांसाठी 'डिव्हिडंड'चा डबल धमाका! BEL, DLF सह 'या' कंपन्या देणार छप्परफाड लाभांश
6
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
7
इस्रायलचे गाझावर हल्ले, विरोधात 22 देश एकवटले; पण एकाही मुस्लिम देशाचा पाठिंबा नाही...
8
Mumbai Local Train: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंब्रा- कळवा मार्गावर लोकलची बैलाला धडक
9
अफगाणिस्तानातील रशियाच्या एन्ट्रीनं चीन दहशतीत; तालिबान-पाकिस्तानात करतोय मैत्रीचा प्रयत्न?
10
पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये
11
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
12
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
13
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
14
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
15
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
16
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
17
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
18
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
19
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
20
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story

युवकांनी व्यसनापासून दूर राहावे

By admin | Updated: October 20, 2015 02:50 IST

व्यसन प्रत्येकासाठी घातकच असते. व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगा केला

वर्धा : व्यसन प्रत्येकासाठी घातकच असते. व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगा केला पाहिजे. मानसिक ताणतणाव हेच व्यसनाचे मुख्य कारण आहे. युवा वर्गही व्यसनाकडे वळतो. व्यसनामुळे स्व-शरीरासह समाजमनावरही त्याचा विपरित परिणाम होतो. व्यसनामुळे मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक हानी होते. यामुळे सर्वांनीच व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जि.प. समाज कल्याण विभागच्यावतीने तसेच नशाबंदी मंडळ यांच्या सहकार्याने महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह घेण्यात आला. सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके तर अतिथी म्हणून विशेष अधिकारी दीपा हेराळे, ज्ञानेश्वर येवतकर, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य बाबा शंभरकर आदी उपस्थित होते. कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी रूपाली कोरडे, रोशनी मडावी, रोहन पिंपळकर, आशिष अंबुलकर, अमोल, महिंद्र, प्रांजल, नेहा तसेच अ‍ॅड. पूजा जाधव, विशाल उराडे, तुकाराम घोडे महाराज, नितेश कराळे, अविनाश सोमनाथे, प्रज्ञा ब्राह्मणकर, मयूर धरणे, दौलत पवार, डॉ. सागरसिंह कच्छवाह, आशिष कुबडे, रामेश्वर सदाफळे आदींनी पथनाट्याद्वारे व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. जि.प. समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके यांनी व्यसनापासून सर्वांनी दूर राहणार आणि इतरांनाही व्यसन करू देणार नाही, याबाबत सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा ब्राह्मणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरेश कोंडे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून करण्यात आली. व्यसनमुक्ती सप्तामध्ये जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात पोहोचून जनजागृती करण्याचा प्रयत्न जि.प. समाज कल्याण विभागाकडून करण्यात आला. यास युवकांचाही प्रतिसाद लाभला.(स्थानिक प्रतिनिधी)जि.प. समाज कल्याण विभाग, नशाबंदी मंडळ आणि समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातही व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. युवकांनीच पुढाकार घेतल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनीही यातून व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला. महाविद्यालयातील युवक-युवतींनी पथनाट्याच्या माध्यमातून कुठलेही व्यसन व्यक्तीला कसे लाचार करते, हे ग्रामस्थांना समजावून सांगितले. दारू ही सर्वात वाईट असून ती कशी जीवनाचा नाश करते, यावरही पथनाट्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.