शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण

By admin | Updated: May 18, 2014 23:51 IST

येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांची पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळत नाही.

 गिरड : येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांची पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळत नाही. याला स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. निधी उपलब्ध असतानाही काम होत नाही, यामुळे असंतोष आहे. ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. याबाबत वृत्त असे की, १२ मे ला ग्रामसभा झाली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रा. प. प्रशासनासमोर प्रामुख्याने ही समस्या मांडली. गत पाच वर्षापूर्वी फिल्टर प्लॉन्ट पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. यानंतर बांधकाम सुरू झाले. मात्र हे काम कासवगतीने सुरू असल्याने अद्याप नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होत नाही. जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी कामाची पाहणी करुन काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. परंतु या आदेशाला स्थानिक प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जाते. काम अपूर्ण असल्याने अजुनही पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. येथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे फिल्टर प्लॉन्टचे काम कधी पूर्ण होईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)