शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
5
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
6
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
7
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
8
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
9
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
10
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
11
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
12
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
13
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
15
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
16
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
17
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
18
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
19
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
20
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...

जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण

By admin | Updated: May 18, 2014 23:51 IST

येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांची पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळत नाही.

 गिरड : येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम कासवगतीने सुरु असल्याने नागरिकांची पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळत नाही. याला स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. निधी उपलब्ध असतानाही काम होत नाही, यामुळे असंतोष आहे. ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. याबाबत वृत्त असे की, १२ मे ला ग्रामसभा झाली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रा. प. प्रशासनासमोर प्रामुख्याने ही समस्या मांडली. गत पाच वर्षापूर्वी फिल्टर प्लॉन्ट पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. यानंतर बांधकाम सुरू झाले. मात्र हे काम कासवगतीने सुरू असल्याने अद्याप नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होत नाही. जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी कामाची पाहणी करुन काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. परंतु या आदेशाला स्थानिक प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जाते. काम अपूर्ण असल्याने अजुनही पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. येथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे फिल्टर प्लॉन्टचे काम कधी पूर्ण होईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)