शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

महिनाभरातच सिमेंट बंधाऱ्याला तडा

By admin | Updated: August 26, 2015 02:13 IST

तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला विस्तारीकरण व खोलीकरण करण्यात आले.

जलयुक्त शिवार योजना : निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा शेतकऱ्याचा आरोपरूपेश मस्के  कारंजा (घा.)तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला विस्तारीकरण व खोलीकरण करण्यात आले. त्यावर सिमेंट बांध बांधण्याची कामे करण्यात आली; पण यातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झालीत. यामुळेच एक महिन्याच्या आतच बंधाऱ्यांना तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. या कामांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.जलयुक्त शिवार अभियानात तालुक्यात बऱ्याच ठिकाणी केवळ खोदकाम करून निधीची उचल करण्यात आली. नाला विस्तारीकरण व शिवारातील पाणी शिवारात अडविणार असल्याने शिवार जलयुक्त होणे, शिवारातील विहिरींच्या जलस्त्रोतात वाढ होणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. शिवारातील शेतात बंधाऱ्याचे पाणी शिरल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. तालुक्यातील उमरी या गावात बारंगे यांचे शेत आहे. त्यांच्या शेताला लागून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला खोलीकरण व सिमेंट बंधारा बांधण्यात आला. या सिमेंट बंधाऱ्याला लगेच तडे गेले आहेत. तांत्रिकदृष्ट्या याचे बांधकाम न झाल्याने बारंगे यांच्याा शेतात बंधाऱ्याचे पाणी शिरले. यामुळे संपूर्ण शेत खरडून गेले असून त्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाला निकृष्ट दर्जाचे व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य झालेले काम पर्यायाने कृषी विभाग जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नुकसान भरपाई द्यावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.योग्यरीत्या खोदकाम न केल्याने शेती गेली खरडूनशिवाय जलयुक्त करणे, मृत जलस्त्रोत पुनर्जीवित करणे व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी या उद्देशाने शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. वर्धा जिल्ह्यातही या योजनेंतर्गत कामे सुरू झाली. काही ठिकाणी योग्य कामे होत असली तरी कारंजा तालुक्यात निकृष्ट कामे झाल्याचे दिसून येत आहे. योग्यरित्या खोदकाम व बांधकाम न केल्याने उमरी येथील शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. शेतीच खरडून निघाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या संपूर्ण कामांची चौकशी करून कारवाई करणे गरजेचे झाले आहे.