शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

संपाने तरी कर्जमुक्ती होईल का?

By admin | Updated: June 1, 2017 00:44 IST

शेतकरी आजपासून संपावर जात आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी निर्धार जाहीर केला आहे.

संपाने तरी कर्जमुक्ती होईल का? अभिनय खोपडे । लोकमत न्यूज नेटवर्क शेतकरी आजपासून संपावर जात आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी निर्धार जाहीर केला आहे. शेतकरी शेतात पेरणी करणार नाही व शासनाच्या धोरणाचा निषेध करणार आहे. सातबारा कोरा करा म्हणजेच कर्जमुक्ती करा, शेतमालाला हमीभाव द्या या प्रमुख मागण्या आहेत.. केंद्रातील पतंप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नुकतेच तीन वर्ष पूर्ण केले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार लवकरच तीन वर्ष पूर्ण करणार आहे. भाजप विरोधी बाकावर असताना कर्जमाफीची मागणी करीत होता. आता सत्तेवर आल्यानंतर अभ्यास करू म्हणत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने राज्यातील भाजप वगळता सर्वच पक्ष उभे असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र कर्जमुक्तीचा मामला काही निकाली निघाला नाही. सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली. सिंचनाची सोय यातून होणार आहे. तुरीच्या खरेदीला मुदतवाढ दिली. शेवटचा दाणा खरेदी करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पहिल्याच पावसात मार्केट यार्डात अनेक शेतकऱ्यांच्या तुरी भिजल्या. शेतकऱ्याच्या मुद्दयावर विरोधकांत दम दिसत नाही. अन्यथा संघर्ष यात्रेनंतर शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली असती. नोटबंदीनंतर बँकाच्या एटीएममध्ये खणखणाट असल्याने शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसत आहे. पीक कर्जाचे आपलेच पैसे मिळविण्यासाठी काम सोडून बांधावरचा शेतकरी बँकेच्या रांगेत उभा आहे. तरीही सरकारविषयीचा असंतोष दिसून येत नाहीे.परवा वर्ध्यात सहकार नेत्यांनी ही खंत बोलून दाखविली. विरोधकात दम नाही म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी ‘योग्यवेळी’ देऊ असे सांगून लांबणीवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळेच आता संपाचे हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. हे आंदोलन प्रतिनिधीक असले तरी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी संपावर आहे. आजवर वर्धा जिल्ह्याने अनेक शेतकरी आंदोलने पाहिलीत. दिवगंत शेतकरी नेते शरद जोशी साहेबांनी १८ तासापेक्षा अधिक काळ सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखल्या होत्या. सरकार हादरले होते. १९८० च्या दशकात केंद्रीय मंत्र्यांना गावात फिरणे शेतकऱ्यांनी कठीण केले होते. हा या जिल्हयातील शेतकऱ्यांचा दरारा होता. आज शेतकऱ्यांचे अनेक नेते व संघटना झाल्या मात्र न्याय मिळत नाही. असे चित्र आहे. त्यामुळे आता १ जून पासून संपाचे हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. भाजपला आता शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे लागेल. कर्जमाफी, वीजबिल माफीचे पोकळ आश्वासन देऊन काम भागणार नाही कृती करावी लागेल तेव्हाच शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढेल. अन्यथा पुढच्या काळात शेतकऱ्यांचा रोष शासनाप्रती वाढलेला असेल. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनेक संस्था मोडीत निघाल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा उभी करुन देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. ते हवेतच आहे. एकूणच शेतकऱ्यांची दैनाच त्यांना संपापर्यंत घेऊन येण्यास कारणीभूत ठरली आहे, यांचा विचार शासनकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.