शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

खते शेतकऱ्यांच्या बांधावर योजना ठरली पांढरा हत्ती

By admin | Updated: September 5, 2014 00:00 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा केल्या जातो. पण या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना कुठेच आढळत नाही. खते बांधावर तर सोडाच

रोहणा : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा केल्या जातो. पण या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना कुठेच आढळत नाही. खते बांधावर तर सोडाच पण अलीकडे आवश्यक रासायनिक खते सहकारी संस्थाच्या व खाजगी कृषी केंद्रात देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे. यावरुन शासनाची ही योजना केवळ कागदावर असून ती पांढरा हत्ती ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरच रासायनिक खताचे वितरण करण्याची अभिनव योजना मागील दोन वर्षांपासून राज्यशासनाच्या कृषी विभागाने सुरू केली. पण या योजनेंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांच्या बांधावर खत शासनाने पोहचवून दिले याचा शोध घेतला तर एकही उदाहरण रोहण्यात शोधून सापडत नाही. सहकारी संस्थांच्या तसेच खाजगी कृषी केंद्रात जावून या याजनेबाबत चौकशी केली असता त्याबाबत अनभिज्ञताच व्यक्त केल्या जाते. अशीच स्थिती सात बारा योजनेची आहे. सात बाराचा दाखला पटवारी घरी तर आणून देतच नाही पण त्याच्या कार्यालयात सात बारा साठी बरा चकरा माराव्या लागतात. त्यामुळे या योजना शेतकऱ्यांसाठी पंढरा हत्ती ठरत आहे. योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासन यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)