शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आठ कोटी खर्चूनही गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:29 IST

यशोदा नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन दिवसांआड पाणी पुरवठा मुख्य गावात होत असून उर्वरित ले-आऊट परिसरात तथा भवानी वॉर्डाच्या काही भागात जीवन प्राधिकरण योजना वर्धा येथून थोड्याफार प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दृश्य आहे.

ठळक मुद्देदोन दिवसाआड पाणीपुरवठा : ग्रामपंचायतीचा नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : यशोदा नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन दिवसांआड पाणी पुरवठा मुख्य गावात होत असून उर्वरित ले-आऊट परिसरात तथा भवानी वॉर्डाच्या काही भागात जीवन प्राधिकरण योजना वर्धा येथून थोड्याफार प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दृश्य आहे.८ कोटी ४६ लाख रुपये खर्चून २०११ मध्ये वर्धा नदी येथून काचनगाव, भगवा, सोनेगाव, मनसावळी, पवणी, अलमडोह, अल्लीपूर या सात गावांसाठी जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजना करण्यात आली; पण सात वर्षांतही ही योजना पूर्णपणे सक्षम होऊ शकली नाही. परिणामी, अल्लीपूरवासीयांवर ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ओढवली आहे. उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.यशोदा नदीला पाणी आहे. यावर पाणी पुरवठा योजना असल्याने ग्रा.पं. ने पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी करणे गरजेचे होते; पण अद्याप मागणी केली नाही. ग्रा.पं. चे नियोजन नसल्याने पाणी समस्या उग्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात जि.प. अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. जीवन प्राधिकरण योजनेबाबत यात चर्चा करून उर्वरित कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याची हमी अध्यक्ष नितीन मडावी यांनी दिली; पण जीवन प्राधिकरण कुणाचेच ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने पाणी समस्या कायम आहे.अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी व गावातील पाईपलाईन, व्हॉल्व्हची कामे २० ते २५ वर्षांपूर्वीची असल्याने नव्याने संपूर्ण पाईपलाईन करणे गरजेचे आहे. याकडे जीवन प्राधिकरण दुुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ग्रा.पं. ने निवेदनातून केली होती; पण उपयोग झाला नाही. ग्रा.पं. प्रशासन, प्राधिकरण, पाटबंधारे विभाग यांच्या कचाट्यात अल्लीपूरचे ग्रामस्थ भरडले जात असून आता पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भगवा गावात कृत्रिम पाणीटंचाईकानगाव सर्कलमधील चानकी (कोरडे) या ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या भगवा या गावात नियोजनाच्या अभावामुळे भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.२०१४ ते २०२० या कालावधीसाठी कानगाव सर्कमधील जि.प. साठी चानकी या गावाची निवड असून पंचायत समिती उपसभापतीही याच गावातून निवडले गेले आहे. या गावांत येत असलेल्या भगवा गावाची लोकसंख्या २०० च्या घरात आहे. या गावातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची ओरड होत आहे. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.ग्रामीण रुग्णालयात कृत्रिम पाणीटंचाईसमुद्रपूर - स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दोन विंधन विहिरी व एक विहीर असून त्यापैकी एक विधन विहीर बंद आहे. २०१६ मध्ये या रुग्णालयात पाणीटंचाई उद्भावली असता मानवीय दृष्टीकोनातून पि.व्ही. टेक्सटाईल्स जाम यांनी ााणी टंचाईचे वृत्त वाचून या रुग्णालयात मे २०१६ मध्ये विंधन विहीर तयार करून दिली होती. त्या बोअरला चांगल्या प्रकारे पाणी लागले. यामुळे एक वर्ष पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर झाली होती; पण १८ महिन्यांपासून या विंधन विहिरीत बिघाड आला असून रुग्णालय प्रशासनाने विंधन विहिरीच्या दुरूस्तीची उपाययोजना केली नाही. शिवाय दुसऱ्या बंद असलेल्या विंधन विहिरीची दखल घेण्यात आली नाही. यामुळे रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वर्भे हिंगणघाट येथे राहत असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही; पण ग्रामीण भागातून रुग्णालयात येणाºया रुग्णांचे व त्यांच्या नातलगांचे हाल होत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई