शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
5
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
6
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
7
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
8
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
9
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
10
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
11
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
12
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
13
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
14
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
15
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
16
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
17
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
18
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
19
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
20
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

आठ कोटी खर्चूनही गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:29 IST

यशोदा नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन दिवसांआड पाणी पुरवठा मुख्य गावात होत असून उर्वरित ले-आऊट परिसरात तथा भवानी वॉर्डाच्या काही भागात जीवन प्राधिकरण योजना वर्धा येथून थोड्याफार प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दृश्य आहे.

ठळक मुद्देदोन दिवसाआड पाणीपुरवठा : ग्रामपंचायतीचा नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : यशोदा नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन दिवसांआड पाणी पुरवठा मुख्य गावात होत असून उर्वरित ले-आऊट परिसरात तथा भवानी वॉर्डाच्या काही भागात जीवन प्राधिकरण योजना वर्धा येथून थोड्याफार प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दृश्य आहे.८ कोटी ४६ लाख रुपये खर्चून २०११ मध्ये वर्धा नदी येथून काचनगाव, भगवा, सोनेगाव, मनसावळी, पवणी, अलमडोह, अल्लीपूर या सात गावांसाठी जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजना करण्यात आली; पण सात वर्षांतही ही योजना पूर्णपणे सक्षम होऊ शकली नाही. परिणामी, अल्लीपूरवासीयांवर ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ओढवली आहे. उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.यशोदा नदीला पाणी आहे. यावर पाणी पुरवठा योजना असल्याने ग्रा.पं. ने पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी करणे गरजेचे होते; पण अद्याप मागणी केली नाही. ग्रा.पं. चे नियोजन नसल्याने पाणी समस्या उग्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात जि.प. अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. जीवन प्राधिकरण योजनेबाबत यात चर्चा करून उर्वरित कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याची हमी अध्यक्ष नितीन मडावी यांनी दिली; पण जीवन प्राधिकरण कुणाचेच ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने पाणी समस्या कायम आहे.अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी व गावातील पाईपलाईन, व्हॉल्व्हची कामे २० ते २५ वर्षांपूर्वीची असल्याने नव्याने संपूर्ण पाईपलाईन करणे गरजेचे आहे. याकडे जीवन प्राधिकरण दुुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ग्रा.पं. ने निवेदनातून केली होती; पण उपयोग झाला नाही. ग्रा.पं. प्रशासन, प्राधिकरण, पाटबंधारे विभाग यांच्या कचाट्यात अल्लीपूरचे ग्रामस्थ भरडले जात असून आता पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भगवा गावात कृत्रिम पाणीटंचाईकानगाव सर्कलमधील चानकी (कोरडे) या ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या भगवा या गावात नियोजनाच्या अभावामुळे भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.२०१४ ते २०२० या कालावधीसाठी कानगाव सर्कमधील जि.प. साठी चानकी या गावाची निवड असून पंचायत समिती उपसभापतीही याच गावातून निवडले गेले आहे. या गावांत येत असलेल्या भगवा गावाची लोकसंख्या २०० च्या घरात आहे. या गावातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची ओरड होत आहे. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.ग्रामीण रुग्णालयात कृत्रिम पाणीटंचाईसमुद्रपूर - स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दोन विंधन विहिरी व एक विहीर असून त्यापैकी एक विधन विहीर बंद आहे. २०१६ मध्ये या रुग्णालयात पाणीटंचाई उद्भावली असता मानवीय दृष्टीकोनातून पि.व्ही. टेक्सटाईल्स जाम यांनी ााणी टंचाईचे वृत्त वाचून या रुग्णालयात मे २०१६ मध्ये विंधन विहीर तयार करून दिली होती. त्या बोअरला चांगल्या प्रकारे पाणी लागले. यामुळे एक वर्ष पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर झाली होती; पण १८ महिन्यांपासून या विंधन विहिरीत बिघाड आला असून रुग्णालय प्रशासनाने विंधन विहिरीच्या दुरूस्तीची उपाययोजना केली नाही. शिवाय दुसऱ्या बंद असलेल्या विंधन विहिरीची दखल घेण्यात आली नाही. यामुळे रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वर्भे हिंगणघाट येथे राहत असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही; पण ग्रामीण भागातून रुग्णालयात येणाºया रुग्णांचे व त्यांच्या नातलगांचे हाल होत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई