शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

पाणीटंचाईचे भाजीपाल्यालाही चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:04 IST

जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. अनेकांकडे सिंचनसुविधा उपलब्ध असली तरी उन्हामुळे पाणीपातळी खालावल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी भाजीपाला पीक कोमजत आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी कोमेजतेय पीक : उत्पादक शेतकरी चिंतित; लागवड खर्चही निघण्याची शक्यता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. अनेकांकडे सिंचनसुविधा उपलब्ध असली तरी उन्हामुळे पाणीपातळी खालावल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी भाजीपाला पीक कोमजत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला लागवड केल्यापासीन निघेपर्यंत त्याची काळजी घेत वेळोवेळी पाणी पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागते. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. याचाच परिणाम म्हणून भूगर्भातील जलाशयाची पातळी खालावल्याने शेतातील विहिरींनीही तळ गाठल्याचे चित्र आहे. यामुळे भाजीपाला पिकाला ओलित करणे कठीण झाले असून पीक कोमेजून जात आहे. पिकांना देण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने भाजीपाला पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघतो की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.भाजीपाला पिकाचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत कसरत करावी लागत आहे. अनेक शेतकºयांनी पिकाच्या संरक्षणाकरिता शेतीला तारेचे कुंपण घातले आहे. असे असले तरी श्वापदांचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. कित्येक शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी बुजगावण्याचा आधार घेतला आहे.भाववाढीचा शेतकऱ्यांना मात्र लाभ नाहीदरवर्षी उन्हाळ्यात आवक घटत असल्याने भाजीपाल्याचे भाव वधारतात. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे सर्वच ठिकाणी भाजीपाल्याचे पीक संकटात आले आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आवक मंदावली, तर जिल्ह्यातील भाजीपाला पीक सिंचनाअभावी धोक्यात आले. याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेत सर्वच भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. कांदे, बटाटे, टमाटर यांचे भाव वगळता मिरची, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी, गवार, कारले, भेंडी, कोथिंबीर, यांचे भाव गगनाला भिडले आहेत. या भाववाढीचा शेतकऱ्यांचा मात्र फायदा नाही. यात दलाल मालामाल होत आहे. तर सर्वसामान्यांचे भाजीपाल्याच्या दरवाढीमुळे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र आहे.नदीपात्राला कोरड; जलसंकटाची चाहूललोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : एप्रिल महिन्यातच तीव्र सूर्यप्रहार होत असल्यामुळे तापमानात कमालीची वाढ होऊन पारा ४३ अंशांवर पोहोचला आहे. मागील दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अल्प प्रमाणात झाल्यामुळे चिकणी, जामणी, निमगाव, सोनेगाव (आबाजी), पढेगाव व परिसरातील गावांमध्ये जलसंकट गडद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.चिकणी, जामणी, निमगाव, पढेगाव ही चारही गावे भदाडी नदीतीरावर वसले असून सोनेगाव (आबाजी) यशोदा नदीतीरावर आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे अल्पावधीतच नदीपात्र कोरडे झाले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. हल्ली नदीपात्रात जनावरांना तर सोडा; पण पशुपक्ष्यांना सुद्धा पिण्यास पाणी राहिले नाही. याकरिता जनावरांना तथा पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामध्ये कित्येक जनावरे व पशुपक्षी मृत्युमुखी पडत आहेत.जंगलव्याप्त भागात बरेच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. शेतकरी तथा गोपालक या शिवारामध्ये कृत्रिम पाणवठ्याची शासन दरबारी मागणी करीत आहे. चारही गावांच्या नळयोजनेच्या विहिरी भदाडी नदीपात्रात करण्यात आल्या आहेत. परंतु पढेगाव येथील विहिरीच्या पाण्याची पातळी जास्तच खोल गेल्यामुळे येथे एक दिवसाआड नळाला पाणी येते. मागच्यावर्षी पर्यंत पाणी मुबलक मिळत असे; परंतु यावर्षी मात्र नळयोजनेच्या विहिरीला अपुरे पाणी असल्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो, असे गावकरी सांगतात.