शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

पाणीटंचाईचे भाजीपाल्यालाही चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:04 IST

जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. अनेकांकडे सिंचनसुविधा उपलब्ध असली तरी उन्हामुळे पाणीपातळी खालावल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी भाजीपाला पीक कोमजत आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी कोमेजतेय पीक : उत्पादक शेतकरी चिंतित; लागवड खर्चही निघण्याची शक्यता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. अनेकांकडे सिंचनसुविधा उपलब्ध असली तरी उन्हामुळे पाणीपातळी खालावल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी भाजीपाला पीक कोमजत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला लागवड केल्यापासीन निघेपर्यंत त्याची काळजी घेत वेळोवेळी पाणी पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागते. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. याचाच परिणाम म्हणून भूगर्भातील जलाशयाची पातळी खालावल्याने शेतातील विहिरींनीही तळ गाठल्याचे चित्र आहे. यामुळे भाजीपाला पिकाला ओलित करणे कठीण झाले असून पीक कोमेजून जात आहे. पिकांना देण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने भाजीपाला पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघतो की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.भाजीपाला पिकाचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत कसरत करावी लागत आहे. अनेक शेतकºयांनी पिकाच्या संरक्षणाकरिता शेतीला तारेचे कुंपण घातले आहे. असे असले तरी श्वापदांचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. कित्येक शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी बुजगावण्याचा आधार घेतला आहे.भाववाढीचा शेतकऱ्यांना मात्र लाभ नाहीदरवर्षी उन्हाळ्यात आवक घटत असल्याने भाजीपाल्याचे भाव वधारतात. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे सर्वच ठिकाणी भाजीपाल्याचे पीक संकटात आले आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आवक मंदावली, तर जिल्ह्यातील भाजीपाला पीक सिंचनाअभावी धोक्यात आले. याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेत सर्वच भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. कांदे, बटाटे, टमाटर यांचे भाव वगळता मिरची, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी, गवार, कारले, भेंडी, कोथिंबीर, यांचे भाव गगनाला भिडले आहेत. या भाववाढीचा शेतकऱ्यांचा मात्र फायदा नाही. यात दलाल मालामाल होत आहे. तर सर्वसामान्यांचे भाजीपाल्याच्या दरवाढीमुळे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र आहे.नदीपात्राला कोरड; जलसंकटाची चाहूललोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : एप्रिल महिन्यातच तीव्र सूर्यप्रहार होत असल्यामुळे तापमानात कमालीची वाढ होऊन पारा ४३ अंशांवर पोहोचला आहे. मागील दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अल्प प्रमाणात झाल्यामुळे चिकणी, जामणी, निमगाव, सोनेगाव (आबाजी), पढेगाव व परिसरातील गावांमध्ये जलसंकट गडद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.चिकणी, जामणी, निमगाव, पढेगाव ही चारही गावे भदाडी नदीतीरावर वसले असून सोनेगाव (आबाजी) यशोदा नदीतीरावर आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे अल्पावधीतच नदीपात्र कोरडे झाले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. हल्ली नदीपात्रात जनावरांना तर सोडा; पण पशुपक्ष्यांना सुद्धा पिण्यास पाणी राहिले नाही. याकरिता जनावरांना तथा पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामध्ये कित्येक जनावरे व पशुपक्षी मृत्युमुखी पडत आहेत.जंगलव्याप्त भागात बरेच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. शेतकरी तथा गोपालक या शिवारामध्ये कृत्रिम पाणवठ्याची शासन दरबारी मागणी करीत आहे. चारही गावांच्या नळयोजनेच्या विहिरी भदाडी नदीपात्रात करण्यात आल्या आहेत. परंतु पढेगाव येथील विहिरीच्या पाण्याची पातळी जास्तच खोल गेल्यामुळे येथे एक दिवसाआड नळाला पाणी येते. मागच्यावर्षी पर्यंत पाणी मुबलक मिळत असे; परंतु यावर्षी मात्र नळयोजनेच्या विहिरीला अपुरे पाणी असल्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो, असे गावकरी सांगतात.