शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

खुबगावात पाणी प्रश्न बिकट

By admin | Updated: April 5, 2017 00:34 IST

तालुक्यातील खुबगाव येथील गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांची भटकंती : प्रशासनाने उपाययोजना आखण्याची मागणी आर्वी : तालुक्यातील खुबगाव येथील गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात नळयोजनेचा पाणी पुरवठा आहे. परंतु तोही सातत्याने बंद राहत आहे. या तीव्र पाणी टंचाई संदर्भात गावकऱ्यांत प्रचंड रोष आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून यावर अद्याप तोडगा निघाला नाही. १५०० लोकवस्तीच्या गावात नळयोजनेचा वॉर्ड क्रं. ३ मध्ये पाणी पुरवठा गत दोन वर्षांपासून सुरळीत झाला नाही. सध्या उन्हाळा तीव्र झाला असून यातच खुबगाव येथे पाणी टंचाईने गावकरी त्रस्त आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी नळयोजनेसाठी मोटारपंप बसविले; परंतु पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतल्या गेली नाही. गावात चार विहिरी आहेत; परंतु या विहिरीचे अद्यापही खोलीकरण करण्यात आले नाही. ग्रामपंचायतीला आम्ही नियमित पाणी पट्टी टॅक्स भरुनही नळयोजनेचा फायदा होत नाही, खुबगाव गावातील डॉ. प्रल्हाद फेदेवार यांच्याकडील पाणीपुरवठा २०१२ पासून सतत बंद आहे. ही तीव्र पाणी टंचाईची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी रामेश्वर राऊत, ज्ञानेश्वर चौधरी, शरद कुटे, सचिन माहोरे, प्रदीप राऊत, डॉ. प्रल्हाद फेदेवार यांनी निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)