शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

कोरोनाला न घाबरता वर्धेकरांनी बालकांचे केले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

उल्लेखनीय म्हणजे, ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानंतर पुढे आली असून, तशी नोंद जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. गर्भवती महिलेची नोंदणी होताच गरोदर महिलेला ‘टीडी’च्या लसीची पहिली मात्रा दिली जाते. त्यानंतर, एक महिन्यांच्या अंतराने  ‘टीडी’च्या लसीची दुसरी मात्रा दिली जाते. तर नवजात बालकाला २४ तासांच्या आत शून्य एचबी, ओपीव्ही, बीसीजीची लस दिली जाते.

ठळक मुद्देमुलींचा जन्मदर वाढला : शासकीय रुग्णालयांत नॉर्मल प्रसूतीवर दिला जातोय भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : १० मे रोजी वर्ध्यात कोविडचा पहिला रुग्ण सापडला असला, तरी मार्च महिन्यात कोरोना आजाराची दहशत प्रचंड होती. इतकेच नव्हे, तर नेहमी वर्दळ राहणारे रस्ते निर्मनुष्य होती. असे असले, तरी जिल्हा सामान्य याच संकट काळात ८९३ प्रसूती झाल्यात. कोरोनायनात वर्ध्याकर इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून नवजात बालकांना वेळोवेळी लसीकरण करून घेतल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला असून, शासकीय रुग्णालयांत नॉर्मल प्रसूतीवर भर दिला जात आहे.प्राप्त माहितीनुसार २०१५-१६ मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९४७ होता, तर सन २०१९-२० मध्ये एक हजार मुलांमागे तो ९७९ झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानंतर पुढे आली असून, तशी नोंद जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. गर्भवती महिलेची नोंदणी होताच गरोदर महिलेला ‘टीडी’च्या लसीची पहिली मात्रा दिली जाते. त्यानंतर, एक महिन्यांच्या अंतराने  ‘टीडी’च्या लसीची दुसरी मात्रा दिली जाते. तर नवजात बालकाला २४ तासांच्या आत शून्य एचबी, ओपीव्ही, बीसीजीची लस दिली जाते. बालक दीड महिन्यांचा झाल्यावर पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरस, आयटीव्ही लसीची पहिली मात्रा दिली जाते. अडीच महिन्यांनंतर बालकास पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरस लसीची दुसरी मात्रा दिली जाते, तर बालक साडेतीन महिन्यांचे झाल्यावर पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरसची तिसरी मात्रा दिली जाते. बालक नऊ महिन्यांचे झाल्यावर एमआर आणि व्हिटॅमिनची लस दिली जाते. या लसी बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने, वर्ध्याकरांनीही कोरोना संकटाच्या काळात मनात कुठलीही भीती न बाळगता  आणि न चुकता आपल्या बालकांना लसी दिल्या आहेत.राज्यात पहिल्या पाचमध्ये वर्ध्याचा समावेशकोरोनाची लस आली असली, तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. असे असले, तरी कोविड संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी सातत्याने कार्यरत राहून सेवा देत आहेत. कोरोना काळात बालकांना लस देण्याच्या मोहिमेत राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यात लसीकरणाचे आकडे वेगवेगळे असतात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांनी सांगितले.

बालकाच्या निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या लहान मुलांना न चुकता नियोजित वेळी लसीकरण केले पाहिजे. शासकीय रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. - डॉ.प्रभाकर नाईक, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या