शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: July 1, 2014 01:38 IST

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात; मात्र हा पोशिंदा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. कधी निसर्गाचा कहर तर कधी राज्यकर्त्यांची उदासिनता. यात चौफेर फसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कार्याची

वर्धा : शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात; मात्र हा पोशिंदा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. कधी निसर्गाचा कहर तर कधी राज्यकर्त्यांची उदासिनता. यात चौफेर फसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कार्याची ओळख देण्याकरिता राज्य शासनाने कृषी दिन निर्मित केला आहे. या दिवशी त्याचा कुठे सत्कार व्हावा, त्याची एक ओळख निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश. असे असले तरी तो सफल होताना दिसत नाही. मंगळवारी कृषी दिन असताना यंदा निसर्गाची साथ मिळत नसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जात आहे. त्याकरिता मोठा निधी खर्च केला जातो. शेतकऱ्यांकरिता असलेल्या या योजनांचा लाभ त्यांना कमी तर इतरांना अधिक झाल्याचे आजपर्यंत समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या भल्याकरिता असलेल्या योजना राबविताना त्या जर अधिकाऱ्यांनी योग्य रित्या राबविल्या तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. मग शेतकऱ्यांची ओळख निर्माण करण्याकरिता शासनाला कृषी दिनाचीही गरज भासणार नाही अशा प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात गत वर्षासह यंदाचे वर्षही शेतकऱ्यांकरिता संकटाचे ठरत आहे. गत वर्षी आलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी आणले. डोळ्यातले पाणी डोळ्यात लपवून शेतकरी नव्या हंगामाकरिता सज्ज झाला; मात्र निसर्गाच्या लहरी पणाचा फटका त्याला पुन्हा बसला. यंदा पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांनी डोळ्यात दडवून ठेवलेले अश्रू पुन्हा बाहेर निघणे सुरू झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत त्याच्या डोळ्यातील पाणी आता वाहू लागले आहे. नेहमी शेतीचा हंगाम साधण्याच्या दिवसात येत असलेला कृषी दिन यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेल्या पाण्याच्या साक्षीनेच साजरा होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे यंदाचा कृषी दिन शेतकऱ्यांना काय देवून जाईल अशी चर्चा आहे. या कृषी दिनी शासनाने शेतकऱ्यांनाकरिता काहीतरी विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)