शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: July 1, 2014 01:38 IST

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात; मात्र हा पोशिंदा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. कधी निसर्गाचा कहर तर कधी राज्यकर्त्यांची उदासिनता. यात चौफेर फसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कार्याची

वर्धा : शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात; मात्र हा पोशिंदा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. कधी निसर्गाचा कहर तर कधी राज्यकर्त्यांची उदासिनता. यात चौफेर फसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कार्याची ओळख देण्याकरिता राज्य शासनाने कृषी दिन निर्मित केला आहे. या दिवशी त्याचा कुठे सत्कार व्हावा, त्याची एक ओळख निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश. असे असले तरी तो सफल होताना दिसत नाही. मंगळवारी कृषी दिन असताना यंदा निसर्गाची साथ मिळत नसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जात आहे. त्याकरिता मोठा निधी खर्च केला जातो. शेतकऱ्यांकरिता असलेल्या या योजनांचा लाभ त्यांना कमी तर इतरांना अधिक झाल्याचे आजपर्यंत समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या भल्याकरिता असलेल्या योजना राबविताना त्या जर अधिकाऱ्यांनी योग्य रित्या राबविल्या तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. मग शेतकऱ्यांची ओळख निर्माण करण्याकरिता शासनाला कृषी दिनाचीही गरज भासणार नाही अशा प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात गत वर्षासह यंदाचे वर्षही शेतकऱ्यांकरिता संकटाचे ठरत आहे. गत वर्षी आलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी आणले. डोळ्यातले पाणी डोळ्यात लपवून शेतकरी नव्या हंगामाकरिता सज्ज झाला; मात्र निसर्गाच्या लहरी पणाचा फटका त्याला पुन्हा बसला. यंदा पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांनी डोळ्यात दडवून ठेवलेले अश्रू पुन्हा बाहेर निघणे सुरू झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत त्याच्या डोळ्यातील पाणी आता वाहू लागले आहे. नेहमी शेतीचा हंगाम साधण्याच्या दिवसात येत असलेला कृषी दिन यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेल्या पाण्याच्या साक्षीनेच साजरा होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे यंदाचा कृषी दिन शेतकऱ्यांना काय देवून जाईल अशी चर्चा आहे. या कृषी दिनी शासनाने शेतकऱ्यांनाकरिता काहीतरी विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)