शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

तीन वर्षांपासून वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: January 17, 2017 01:10 IST

कर्ज न घेता स्व-कष्टाने खोदलेल्या विहिरीवरील पंपाला वीज जोडणी देण्यास तीन वर्षांपासून वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत आहे.

आदिवासी शेतकरी मारतोय विद्युत कार्यालयाच्या चकरावर्धा : कर्ज न घेता स्व-कष्टाने खोदलेल्या विहिरीवरील पंपाला वीज जोडणी देण्यास तीन वर्षांपासून वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत आहे. यामुळे वडदचे आदिवासी शेतकरी माणिक राजाराम गेडाम यांची कोंडी झाली आहे. याकडे लक्ष देत वीज जोडणी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.शेतकरी गेडाम यांनी ‘डिमांड नोट’नुसार वीज जोडणी मिळावी म्हणून देवळीच्या विद्युत कार्यालयाकडे २४ फेब्रुवारी २०१४ रोजी रकमेचा भरणा केला. त्यांच्या मालकीचे वडद शिवारात सर्व्हे क्र. २७९/१ मध्ये १ हेक्टर ०८ शेत आहे. त्यांनी २०११ आणि २०१२ या दोन वर्षात स्व-कष्टाने शेतात विहीर खोदली. सुमारे १७ फुट गोटा फोडून त्यांनी ही विहीर केली. यानंतर विहिरीवर मोटारपंप बसविण्यासाठी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला. विद्युत कंपनीने त्यांना ५ हजार १०० रुपयांची डिमांडनोट दिली. त्यांनी ही रक्कम भरली; पण त्यांना वीज जोडणी अद्यापही देण्यात आली नाही. विविध कारणे सांगून दोन वर्षांपासून जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार फेऱ्या मारून गेडाम त्रस्त झाले आहेत. शेतातील काम बंद ठेवून त्यांना वीज जोडणी कधी मिळेल, हे विचारण्याकरिता विद्युत कार्यालयात जावे लागते; पण चकरा संपत नाही. वीज जोडणी न मिळाल्याने ५०० रुपये दररोजप्रमाणे खर्च करून त्यांना डिझेल पंपाद्वारे शेतात ओलीत करावे लागत आहे; पण हा खर्च त्यांना शक्य नाही. वीज जोडणी न मिळाल्याने या शेतकऱ्याला शेतात दोन पिके घेता येत नाही. याकडे लक्ष देत त्वरित वीज जोडणी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)