शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

चंद्रपूर-हिंगणघाट इंटरसिटी एक्सप्रेसकरिता प्रतीक्षाच

By admin | Updated: December 28, 2016 00:43 IST

चंद्रपुर-हिंगणघाट-नागपूर या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

हिंगणघाट : चंद्रपुर-हिंगणघाट-नागपूर या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. जलद गाड्यांना या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हिंगणघाट, वरोरा, भद्रावती येथील प्रवाशांना नागपूर किंवा वर्धा येथे जाण्याकरिता मोजक्याच गाड्या असल्याने त्यांची तारांबळ उडते. अनेक वर्षापासून इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बल्लारशाह, वर्धा, नागपूर या शहरादरम्यान इंटरसिटी चेअर कार ट्रेन सुरू करावी अशीही मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली. या गाडीची सोय उपलब्ध झाल्यास पासधारक प्रवासी तसेच विद्यार्थी व व्यापारीवर्गाला मोठा दिलासा मिळेल. इंटरसिटी एक्सप्रेसमुळे नागपूर ते चंद्रपूर दरम्यान ये-जा करणाऱ्यांना सुविधा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. या मार्गावर गाड्यांच्या फेऱ्या अधिक असल्या तरी काही गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची ताटकळ होते. त्यामुळे अनेकजण बसगाडीने जाणे पसंत करतात. इंटरसिटी एक्सप्रेसमुळे हे प्रवासी रेल्वेकडे वळण्याची शक्यता आहे. बल्लारशाह, चंद्रपुर, वरोरा, हिंगणघाट, वर्धा येथून कार्यालयीन कामकाजाकरिता, शिक्षणाकरिता तसेच व्यावसायिक कारणांनी दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. याशिवाय वर्धा किंवा नागपूर येथून पुढे रेल्वे प्रवास करण्याकरिता जाणारे प्रवासी असतात. त्यांना या रेल्वेगाडीमुळे आधार होईल. चंद्रपूर ते नागपूर दरम्यान इंटरसिटीसारख्या रेल्वेगाड्या सुरू केल्यास प्रवाशांना गंतव्य स्थळी वेळेवर पोहचण्यास मदत होईल. प्रवाशांच्या त्रास कमी होईल. शिवाय प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ होऊन रेल्वे प्रशासनाला आर्थिक नफा होईल. रेल्वेने प्रवास करणे कमी खर्चाचे असल्याने प्रवाशांच्या खिशावरील ताण कमी होऊ शकतो.(स्थानिक प्रतिनिधी) इंटरसिटी गाडीमुळे प्रवाशांच्या वेळेची होईल बचत बल्लारशाह, चंद्रपुर, हिंगणघाट या भागातील प्रवाशांना अमरावती, मुंबईकडे तसेच नागपूर, दिल्ली, कोलकाता या मार्गावर प्रवास करायचा असल्यास वर्धा किंवा नागपूर येथून गाड्या बदलवाव्या लागतात. इंटरसिटी गाडी सुरू केल्यास सुविधा होईल. या भागातील प्रवाशांकरिता रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने त्यांची बराच वेळ ताटकळ होते. अमरावती किंवा हावडा मार्गावरील गाडी घ्यायची असल्यास बराच वेळ घरुन निघुन गाडी पकडावी लागते. प्रवाशांची यात ताटकळ होते.