शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

‘थैलीवाल्या’ दारूविक्रेत्यांचा वायफड मार्गावर धुमाकूळ

By admin | Updated: April 8, 2015 01:51 IST

शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या वायफड मार्गावर सध्या ‘थैलीवाल्या’ दारूविक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे़

वर्धा : शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या वायफड मार्गावर सध्या ‘थैलीवाल्या’ दारूविक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे़ बस थांब्यावरच दारूची विक्री केली जात असल्याने प्रवाशांसह महिला, विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे़ पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़तिगाव येथे गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. गावासह बस थांब्यावर दारूविक्रेते पिशवीमध्ये दारूच्या बाटल्या भरून प्रवाश्यांना विकतात. प्रवासी असल्याचे भासवून दारूविक्रेते हातात पिशवी घेऊन बस थांब्यावर उभे राहतात. थांबलेल्या वाहनातून प्रवासी खाली उतरले की, हे विक्रेते त्या प्रवाश्यांना दारूची शिशी काढून देतात़ ‘थैलेवाला’ दारूविक्रेता हा प्रकार या परिसरात नव्यानेच उदयास आला आहे़ यामुळे तिगाव येथील बस थांब्यावर असलेल्या विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात अनेक दारूविक्रेते धुमाकूळ घालून नागरिकांना त्रास देत आहेत. विद्यार्थी, विद्यार्थिनी बसने शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. या बस थांब्यांवरच खुलेआम दारूविक्री होत असून सट्टा व जुगारही चालतो. यामुळे सध्या बसस्थानक दारू, सट्टा व जुगाऱ्यांचा अड्डा बनले आहे. यात विद्यार्थ्यांचा बळी जात आहे. आई-वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे विद्यार्थी सट्टा व जुगारात घालवत असल्याच्या तक्रारी आहेत़ अनेक विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत शाळा बस थांब्यावरच भरवित असल्याचे दिसते़ आठ-दहा गावांतील मद्यपी तिगाव येथे दारू पिण्याकरिता येतात. दिवसभर सट्टा व जुगार खेळत असून मद्याच्या नशेत गावातच मुक्काम ठोकतात. आपल्या घराच्या बाजूला मद्यधुंद अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीचे काही बरेवाईट तर होणार नाही ना, या भीतीने त्या घरचे लोक रात्रभर जागे असतात़ तिगाव या गावात दारूविक्री, सट्टा व जुगार खुलेआम सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे़ शिवाय सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिगाव येथील सावित्रीबाई दारूबंदी महिला मंडळ व ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे़पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देत दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी व जुगार बंद करावा, अशी मागणी सावित्रीबाई दारूबंदी महिला मंडळ, ग्राम सुरक्षा दल व ग्रामस्थांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)