शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

VIDEO- प्रशासनाचे काम अन् बारा महिने थांब

By admin | Updated: May 16, 2017 21:01 IST

ऑनलाइन लोकमत वर्धा, दि. 16 - शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या या मागणीचे निवेदन स्थानिक नगर पालिका ...

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 16 - शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या या मागणीचे निवेदन स्थानिक नगर पालिका प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी देण्यात आले. परंतु, सदर निवेदनाला केराची टापलीच दाखविण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मानल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या दुर्लक्षी कारभाराच्या निषेधार्थ व शहरातील नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या या मागणीसाठी युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्या नेतृत्त्वात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे काम अन् बारा महिने थांब असे नाव दिले होते.आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.  आंदोलनकत्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी स्विकारले. विविध शासकीय कार्यालयात नागरिकांना साध्या-साध्या कामासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागतात. साधी शिधा पत्रिका प्राप्त करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागत आहे. सर्वसामान्यांच्या कामांना होणारा विलंब ही बाब नित्याचीच झाली आहे. प्रशासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत कामचुकारीपणाच करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता नागरिकांची विविध कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावी, वर्धा शहरात ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, कारला चौक ते आर्वी नाका या मार्गाचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांना त्वरीत घरपट्टे देण्यात यावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्याही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व निहाल पांडे यांनी केले. आंदोलनात जयंती मिश्रा, अनुराधा वडाळकर, अंकिता थुल, समिक्षा सुरभी चनाप, स्नेहा चनाप, प्रिती घंगाळ, नयना गुंडनवार, सोनाली डायरकर, शिवानी बोरकर, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, गौरव वानखेडे, अभिषेक बाळबुधे, अरहान शेख, सुरज गायकवाड, ऋषिकेश बुटले आदी सहभागी झाले होते.अनोख्या स्टाईलने नोंदविला निषेधयुवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या तरुण-तरुणींनी शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांना कसा त्रास होतो. सर्वसामान्यांच्या समस्या निकाली काढणारे कर्मचारी नागरिकांसोबत कसे वागतात. तसेच कार्यालयातील इतर अधिकारी त्याकडे कसे डोळेझाक करतात याची हुबेहू झाकी तयार केली होती. या झाकीच्या माध्यमातून तसेच जोरदार नारोबाजी करून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या जनसामान्यविरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. झाकीत शासकीय कार्यालयातील साहेबाची भुमिका सोहम बिरंगे, प्रशासनाच्या पीडिताची भुमिका मयुर तिवारी तर डोळे बंद करून, तोंड बंद करून व कान बंद करून गांधीजींच्या तीन बंदराची भूमिका जयंती मिश्रा, तेजस्वीनी मोहोड, समिक्षा संगितवार यांनी निभविली.

https://www.dailymotion.com/video/x844z5y