शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या छायेत बळीराजाचा बळी

By admin | Updated: December 22, 2014 22:51 IST

कधी पावसाचा मारा, तर कधी पावसाची पाठ. कधी गारपिटीचा फटका तर कधी वादळाचा तडाखा. या नैसर्गिक आपत्तीतून कधी बचावला तर वन्य प्राण्याचा हैदोस. या परिस्थितीत राज्यकर्त्ये पाठीशी

वर्धा : कधी पावसाचा मारा, तर कधी पावसाची पाठ. कधी गारपिटीचा फटका तर कधी वादळाचा तडाखा. या नैसर्गिक आपत्तीतून कधी बचावला तर वन्य प्राण्याचा हैदोस. या परिस्थितीत राज्यकर्त्ये पाठीशी राहतील अशी आस धरणाऱ्या बळीराजाच्या वाट्याला निराशाच आली. या साऱ्या दु:खाच्या छायेत जीवन जगतानाच बळीराजाचा बळी जात आहे. या बळीराजाच्या उपकाराचे पांग फेडण्याकरिता कधी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते; मात्र आजच्या परिस्थितीत बळीराजाच ‘दीन’ झाल्याने या दिनाकडे त्याने पाठ असल्याचे वास्तव आहे.कृषी प्रधान देशाचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या बळीराजाचा दिवस म्हणून २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. यंदा मात्र या दिनाला जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाची झालर राहणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत जगत आहे. या परिस्थितीत कुठला शेतकरी दिन आणि कुठला उत्सव असे चित्र ग्रामीण भागात आहे.राज्यात नवे सरकार आले. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना शेतीखर्चावर ५० टक्के नफा धरत हमीभाव देण्यात येईल असे त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यांची सत्ता आली असली तरी यानुसार शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची होणारी थट्टा इथेच थांबली नाही, तर त्याच्या उत्पन्नाला व्यापाऱ्यांकडूनच नव्हे, तर बाजारात शासनाचे हस्तक म्हणून ओळख असलेल्या काही एजन्सीकडूनही किमान दरापेक्षा कमी दर दिला. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे. या अडचणीत त्याला त्याच्याकरिता असलेल्या शेतकरी दिनाची आठवण राहिल अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे.(प्रतिनिधी)