शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

दुष्काळाच्या छायेत बळीराजाचा बळी

By admin | Updated: December 22, 2014 22:51 IST

कधी पावसाचा मारा, तर कधी पावसाची पाठ. कधी गारपिटीचा फटका तर कधी वादळाचा तडाखा. या नैसर्गिक आपत्तीतून कधी बचावला तर वन्य प्राण्याचा हैदोस. या परिस्थितीत राज्यकर्त्ये पाठीशी

वर्धा : कधी पावसाचा मारा, तर कधी पावसाची पाठ. कधी गारपिटीचा फटका तर कधी वादळाचा तडाखा. या नैसर्गिक आपत्तीतून कधी बचावला तर वन्य प्राण्याचा हैदोस. या परिस्थितीत राज्यकर्त्ये पाठीशी राहतील अशी आस धरणाऱ्या बळीराजाच्या वाट्याला निराशाच आली. या साऱ्या दु:खाच्या छायेत जीवन जगतानाच बळीराजाचा बळी जात आहे. या बळीराजाच्या उपकाराचे पांग फेडण्याकरिता कधी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते; मात्र आजच्या परिस्थितीत बळीराजाच ‘दीन’ झाल्याने या दिनाकडे त्याने पाठ असल्याचे वास्तव आहे.कृषी प्रधान देशाचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या बळीराजाचा दिवस म्हणून २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. यंदा मात्र या दिनाला जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाची झालर राहणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत जगत आहे. या परिस्थितीत कुठला शेतकरी दिन आणि कुठला उत्सव असे चित्र ग्रामीण भागात आहे.राज्यात नवे सरकार आले. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना शेतीखर्चावर ५० टक्के नफा धरत हमीभाव देण्यात येईल असे त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यांची सत्ता आली असली तरी यानुसार शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची होणारी थट्टा इथेच थांबली नाही, तर त्याच्या उत्पन्नाला व्यापाऱ्यांकडूनच नव्हे, तर बाजारात शासनाचे हस्तक म्हणून ओळख असलेल्या काही एजन्सीकडूनही किमान दरापेक्षा कमी दर दिला. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे. या अडचणीत त्याला त्याच्याकरिता असलेल्या शेतकरी दिनाची आठवण राहिल अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे.(प्रतिनिधी)