शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

संविधानातील मूल्ये अंगिकारावी

By admin | Updated: November 27, 2015 02:18 IST

भारतीय संविधानातील प्रत्येक मुल्यांची जपणूक करून सर्वांनीच त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.

आशुतोष सलील : संविधान जनजागरण रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद वर्धा : भारतीय संविधानातील प्रत्येक मुल्यांची जपणूक करून सर्वांनीच त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. गुरुवारी भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. भारतीय संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सामूहिकपणे प्रास्ताविकेचे वाचन केले. तसेच भारतीय संविधानातील मूल्यांचे जतन करतानाच ते अंगिकारण्याचा संकल्प केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित संविधान दिनाच्या मुख्य समारंभास खा. रामदास तडस, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, समाज कल्याण सभापती वसंत पाचोडे उपस्थित होते. भारतीय संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथून संविधान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. खासदार रामदास तडस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करून जनजागरण रॅलीस हिरवी झेंडी दाखवितली. प्रारंभी सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी स्वागत करून प्रमुख पाहुण्यांना भारतीय संविधानाची प्रत दिली. यावेळी समाज कल्याण विभागाचे दीपा हेरोळे, समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबा शंभरकर, अनिल वाळके इतर सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांची विशेष उपस्थिती होती. या रॅलीत विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.