शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपाचा वीजप्रवाह पूर्ववत करा

By admin | Updated: June 19, 2014 00:12 IST

शेतकऱ्याच्या कृषीपंपाचा वीजप्रवाह खंडीत करण्यात आल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपली. वीजप्रवाह पूर्ववत करण्याची मागणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनातून केली

वर्धा : शेतकऱ्याच्या कृषीपंपाचा वीजप्रवाह खंडीत करण्यात आल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपली. वीजप्रवाह पूर्ववत करण्याची मागणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनातून केली असता शेतकऱ्याला अपमानास्पद वागणुक मिळाली. शिवाय खंडित केलेला वीजप्रवाह पूर्ववत न केल्याने निकसान सहन करावे लागले. या प्रकरणाची चौकशी करुन कृषीपंपाचा वीजप्रवाह पूर्ववत करण्याची मागणी निवेदनातून देवळी येथील अभियंत्या यांच्याकडे शेतकरी अब्दूल रशीद हबिबउल्लाह खान यांनी केली आहे.निवेदनानुसार, अर्जदार खान यांची शेती मौजा अडेगाव येथे आहे. त्यांच्या शेतात दोन विहिरी असून सदर विहिरींवर विद्युत मिटर बसविण्यात आहे़ त्याचा ग्राहक क्रमांक अनुक्रमे ३९२२४०००३०४५ आणि ३९२२४७०००३८६ असा आहे़ या मिटरला नजीकचे शेतकरी नाकट व देवराव वैद्य यांच्या शेतातील डि़पी़ वरून विद्युत प्रवाहाची जोडणी केलेली आहे़ नाकट यांच्या शेतातील डि.पी जवळील विहिर उपसन्याचे काम सुरू आहे़ खान यांनी शेतात भाजीपाला व पराटीची पिके आहेत. अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. विहिरीवर पंप आहे पण विद्युत पुरवठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. यातच लगतच्या शेतातील शेतकऱ्यांकडून पाणी पुरवठा करणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने पाण्याअभावी पिके वाळण्याच्या मार्गावर आहे. तसेच शेतात धुळ पेरणी केली असल्याने शेतकऱ्यास विद्युत प्रवाहाची आवश्यकता आहे़ अर्जदार शेतकऱ्याने नियमीत विद्युत देयकाचा भरणा केला आहे. यामुळे कोणतेच देयक शिल्लक नसताना या ग्राहकाला वीज वितरण कंपनीकडून नाहक त्रास दिला जात आहे. मागील काही दिवसांपासून सदर डि़पी़ वरून दोन्ही विहिरींवरील विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे. याचे काहीच कारण दिले जात नसल्याने संभ्रम आहे. तसेच पोलवरून वीज तारा शॉट असल्याने हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची मागणी आहे. याची तक्रार नोंद नसल्याने हा बिघाड कायम आहे.(स्थानिक प्रतिनिधी)