शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
2
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
3
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
4
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
5
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
6
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
7
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
8
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
9
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
10
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
11
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
12
"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश
13
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
14
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
15
येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
16
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
17
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
18
लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
19
ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?
20
"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा

दुचाकी, चारचाकी वाहनांना मुख्य बाजारपेठेत ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

केंद्र व राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी एक आदेश निर्गमित करून बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तर या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्गमित केलेल्या आदेशानुसार आळीपाळीने दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचा निर्णय। नागरिकांची गर्दी टाळण्यावर दिला जातोय भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. याचाच फायदा काही व्यक्ती घेत बाजारपेठेत विनाकारण गर्दी करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना वर्धा बाजारपेठेत पोलिसांच्यावतीने प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सदर निर्णय गर्दी टाळण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.केंद्र व राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी एक आदेश निर्गमित करून बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तर या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्गमित केलेल्या आदेशानुसार आळीपाळीने दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी मिळताच सध्या नागरिकांकडून बाजारपेठेत विनाकारण गर्दी केल्या जात असल्याचे आणि सदर प्रकार कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे अधिकाºयांच्या निदर्शनास आल्यावर शनिवारी वर्धा शहर व वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांच्यावतीने बाजारपेठेत जाणारे ठिकठिकाणचे रस्ते बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले आहे. शिवाय बाजारपेठेत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी राहणार असल्याची सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.मुख्य मार्गावर वाहन उभे करून करावी लागेल साहित्य खरेदीविविध साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जाऊ इच्छिणाºया व्यक्तींना वर्धा शहरातील मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेला इतरांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने वाहने उभी करून पायदळ बाजारपेठेत जावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर जो व्यक्ती बाजारपेठेत वाहन नेईल त्याच्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.प्रमुख मार्गाचा वापर ठरेल फायद्याचाशिवाजी चौकातून बाजारपेठेत न येऊ इच्छिणाऱ्यांनी तसेच बजाज चौक, डॉ. आंबेडकर चौक, इतवारा चौक भागात जाऊ इच्छिणाºयांना प्रमुख मार्ग असलेल्या जेलरोड मार्गे या परिसरात जावे लागणार आहे. तसेच वर्धा रेल्वे स्थानकाकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना वंजारी चौक, शास्त्री चौक होत जाता येणार आहे. एकूणच पुढील आदेशापर्यंत दररोज दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठेत वाहनांचा प्रवेश बंदी राहणार आहे.वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते अरुंद आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार आळीपाळीने काही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय बाजारपेठ क्षेत्र गर्दीचे ठिकाण म्हणून घोषित झालेले आहे. सदर भागात गर्दी वाढल्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. या भागात गर्दी नियंत्रित करण्यासाठी दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठेत दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहन नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याकरिता सदर भागात जाणारे रस्ते तात्पूर्ते स्वरूपात बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले आहे. इतर सर्व रस्ते पूर्वीप्रमाणे सुरू आहेत.- योगेश पारधी, ठाणेदार, शहर पोलीस ठाणे, वर्धा

टॅग्स :MarketबाजारTrafficवाहतूक कोंडी