शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी, चारचाकी वाहनांना मुख्य बाजारपेठेत ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

केंद्र व राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी एक आदेश निर्गमित करून बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तर या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्गमित केलेल्या आदेशानुसार आळीपाळीने दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचा निर्णय। नागरिकांची गर्दी टाळण्यावर दिला जातोय भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. याचाच फायदा काही व्यक्ती घेत बाजारपेठेत विनाकारण गर्दी करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना वर्धा बाजारपेठेत पोलिसांच्यावतीने प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सदर निर्णय गर्दी टाळण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.केंद्र व राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी एक आदेश निर्गमित करून बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तर या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्गमित केलेल्या आदेशानुसार आळीपाळीने दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी मिळताच सध्या नागरिकांकडून बाजारपेठेत विनाकारण गर्दी केल्या जात असल्याचे आणि सदर प्रकार कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे अधिकाºयांच्या निदर्शनास आल्यावर शनिवारी वर्धा शहर व वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांच्यावतीने बाजारपेठेत जाणारे ठिकठिकाणचे रस्ते बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले आहे. शिवाय बाजारपेठेत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी राहणार असल्याची सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.मुख्य मार्गावर वाहन उभे करून करावी लागेल साहित्य खरेदीविविध साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जाऊ इच्छिणाºया व्यक्तींना वर्धा शहरातील मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेला इतरांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने वाहने उभी करून पायदळ बाजारपेठेत जावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर जो व्यक्ती बाजारपेठेत वाहन नेईल त्याच्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.प्रमुख मार्गाचा वापर ठरेल फायद्याचाशिवाजी चौकातून बाजारपेठेत न येऊ इच्छिणाऱ्यांनी तसेच बजाज चौक, डॉ. आंबेडकर चौक, इतवारा चौक भागात जाऊ इच्छिणाºयांना प्रमुख मार्ग असलेल्या जेलरोड मार्गे या परिसरात जावे लागणार आहे. तसेच वर्धा रेल्वे स्थानकाकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना वंजारी चौक, शास्त्री चौक होत जाता येणार आहे. एकूणच पुढील आदेशापर्यंत दररोज दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठेत वाहनांचा प्रवेश बंदी राहणार आहे.वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते अरुंद आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार आळीपाळीने काही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय बाजारपेठ क्षेत्र गर्दीचे ठिकाण म्हणून घोषित झालेले आहे. सदर भागात गर्दी वाढल्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. या भागात गर्दी नियंत्रित करण्यासाठी दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठेत दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहन नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याकरिता सदर भागात जाणारे रस्ते तात्पूर्ते स्वरूपात बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले आहे. इतर सर्व रस्ते पूर्वीप्रमाणे सुरू आहेत.- योगेश पारधी, ठाणेदार, शहर पोलीस ठाणे, वर्धा

टॅग्स :MarketबाजारTrafficवाहतूक कोंडी