शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

सैनिकांना पाठविल्या अडीच हजार राख्या

By admin | Updated: August 27, 2015 02:19 IST

स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या पर्वावर गत २० वर्षापासून राख्या पाठविण्यात येतात.

२० वर्षांची परंपरा : रोव्हर्स, रेंजर्स, एन.सी.सी. छात्र सैनिकांचा उपक्रमवर्धा : स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या पर्वावर गत २० वर्षापासून राख्या पाठविण्यात येतात. याच उपक्रमात रोव्हर पथक, राणी लक्ष्मीबाई रेंजर युनिट व एन.सी.सी. छात्रसैनिकांनी सहभाग दर्शवित या वर्षीही अडीच हजार राख्या तयार करून पाठविण्यात आल्या. सीमेवर रक्षण करीत असलेल्या सैनिकांप्रती या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. देवळी येथील एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस रोव्हर पथक, प्रहार संस्थेतर्फे आर्मी युनिट्सकडे राख्या सुपूर्द केल्या. या राख्या चीन सीमा, भारत-पाक सीमा व भारत-तिबेट सीमेवर असलेल्या आर्मी युनिट्सना रवाना करण्यात आल्या आहेत. राख्या पाठविण्याचा कृतज्ञता कार्यक्रम देवळी येथे स्कॉऊट भवनात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोव्हर लिडर लेफ्टनंट प्रा. मोहन गुजरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दीपक साखरे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक साखरे म्हणाले, देशाच्या सीमेवरील सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावित असतात. कर्तव्यापूढे सण, उत्सव व वैयक्तिक कार्यक्रमांना ते दुय्यम स्थान देतात. देशाला सैनिकांसारखीच मानसिकता असलेल्या तरूणांची नितांत गरज आहे. या उपक्रमात अत्यंत प्रशंसनीय असून त्यात सहभागी रोव्हर्स, रेंजर्स व एन.सी.सी. छात्र सैनिकांची कृतज्ञता खरच इतरांना प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी सार्जेट उमा मसराम, स्मिता सुरजूसे, दिनेश रामगडे, रेंजर कंपनी सार्जेट मेजर सुरज पोटफोडे, वैभव भोयर, आशिष परचाके, साकिब पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक लेफ्टनंट प्रा. गुजरकर यांनी केले. संचालन सहाय्यक रेंजर लिडर अश्विनी घोडखांदे हिने केले तर आभार अंडर आॅफिसर रवी बकाले यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)