शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून १३ गावांतील बत्ती गुल

By admin | Updated: June 1, 2017 00:37 IST

अल्लीपूरसह परिसरातील १२ गावांतील विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे.

पाणी पुरवठा विस्कळीत : गर्मीमुळे नागरिकांचे हाल लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : अल्लीपूरसह परिसरातील १२ गावांतील विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे. परिणामी, पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना काळोखात खितपत राहावे लागत आहे. गर्मीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. येथील वीज कार्यलयात आठ कर्मचारी असून एक कनिष्ठ अभियंता आहे. असे असताना दोन दिवसांपासून दररोज रात्री ७ वाजतापासून वीज पुरवठा थोड्याही वादळामुळे खंडित होत आहे. यामुळे उकाड्याच्या दिवसांत व रात्रीही गर्मी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. १३ गावांतील जनतेला असह्य वेदना सोसून रात्र काढावी लागत असल्याने वीज वितरण कंपनीप्रती रोष व्यक्त होत आहे. कर्मचारी हजर राहत नसल्याने व कंत्राटी कामगार सुटीवर गेल्याने विद्युत दुरूस्तीची कामे ठप्प आहेत. तीन दिवसांपासून काळोख नारायणपूर - गणेशपूर, नारायणपूर, गोविंदपूर, डोंगरगाव, बल्लारपूर आदी गावांना नंदोरी येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो; पण ७ मे रोजी वादळी पावसाने नारायणपूर फिडरचे खांब व तारा तुटल्या. तेव्हापासून सावली फीडरवरून वीज पुरवठा केला जात आहे; पण बिघाड आल्याने तो अनियमित आहे. मागील तीन दिवसांपासून नारायणपूर परिसरातील वीज खंडित आहे. सुमारे २० दिवसांपासून तुटलेल्या खांबाची दुरूस्ती झाली नाही. तीन दिवसांपासून वीज नसल्याने पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंचन खोळंबले आहे. याबाबत नंदोरी येथील कनिष्ठ अभियंंता डोंगरे यांना विचारणा केली असता ७ मे रोजी वादळी पावसाने नारायणपूर फिडरचे खांब व तारा तुटल्या. सदर काम स्थानिक कंत्राटदाराकडून करून घेतले जात आहे. येत्या एक-दोन दिवसांत पुरवठा नियमित होईल, असे सांगण्यात आले.