शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

दोन दिवसांपासून १३ गावांतील बत्ती गुल

By admin | Updated: June 1, 2017 00:37 IST

अल्लीपूरसह परिसरातील १२ गावांतील विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे.

पाणी पुरवठा विस्कळीत : गर्मीमुळे नागरिकांचे हाल लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : अल्लीपूरसह परिसरातील १२ गावांतील विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे. परिणामी, पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना काळोखात खितपत राहावे लागत आहे. गर्मीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. येथील वीज कार्यलयात आठ कर्मचारी असून एक कनिष्ठ अभियंता आहे. असे असताना दोन दिवसांपासून दररोज रात्री ७ वाजतापासून वीज पुरवठा थोड्याही वादळामुळे खंडित होत आहे. यामुळे उकाड्याच्या दिवसांत व रात्रीही गर्मी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. १३ गावांतील जनतेला असह्य वेदना सोसून रात्र काढावी लागत असल्याने वीज वितरण कंपनीप्रती रोष व्यक्त होत आहे. कर्मचारी हजर राहत नसल्याने व कंत्राटी कामगार सुटीवर गेल्याने विद्युत दुरूस्तीची कामे ठप्प आहेत. तीन दिवसांपासून काळोख नारायणपूर - गणेशपूर, नारायणपूर, गोविंदपूर, डोंगरगाव, बल्लारपूर आदी गावांना नंदोरी येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो; पण ७ मे रोजी वादळी पावसाने नारायणपूर फिडरचे खांब व तारा तुटल्या. तेव्हापासून सावली फीडरवरून वीज पुरवठा केला जात आहे; पण बिघाड आल्याने तो अनियमित आहे. मागील तीन दिवसांपासून नारायणपूर परिसरातील वीज खंडित आहे. सुमारे २० दिवसांपासून तुटलेल्या खांबाची दुरूस्ती झाली नाही. तीन दिवसांपासून वीज नसल्याने पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंचन खोळंबले आहे. याबाबत नंदोरी येथील कनिष्ठ अभियंंता डोंगरे यांना विचारणा केली असता ७ मे रोजी वादळी पावसाने नारायणपूर फिडरचे खांब व तारा तुटल्या. सदर काम स्थानिक कंत्राटदाराकडून करून घेतले जात आहे. येत्या एक-दोन दिवसांत पुरवठा नियमित होईल, असे सांगण्यात आले.