शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून १३ गावांतील बत्ती गुल

By admin | Updated: June 1, 2017 00:37 IST

अल्लीपूरसह परिसरातील १२ गावांतील विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे.

पाणी पुरवठा विस्कळीत : गर्मीमुळे नागरिकांचे हाल लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : अल्लीपूरसह परिसरातील १२ गावांतील विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे. परिणामी, पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना काळोखात खितपत राहावे लागत आहे. गर्मीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. येथील वीज कार्यलयात आठ कर्मचारी असून एक कनिष्ठ अभियंता आहे. असे असताना दोन दिवसांपासून दररोज रात्री ७ वाजतापासून वीज पुरवठा थोड्याही वादळामुळे खंडित होत आहे. यामुळे उकाड्याच्या दिवसांत व रात्रीही गर्मी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. १३ गावांतील जनतेला असह्य वेदना सोसून रात्र काढावी लागत असल्याने वीज वितरण कंपनीप्रती रोष व्यक्त होत आहे. कर्मचारी हजर राहत नसल्याने व कंत्राटी कामगार सुटीवर गेल्याने विद्युत दुरूस्तीची कामे ठप्प आहेत. तीन दिवसांपासून काळोख नारायणपूर - गणेशपूर, नारायणपूर, गोविंदपूर, डोंगरगाव, बल्लारपूर आदी गावांना नंदोरी येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो; पण ७ मे रोजी वादळी पावसाने नारायणपूर फिडरचे खांब व तारा तुटल्या. तेव्हापासून सावली फीडरवरून वीज पुरवठा केला जात आहे; पण बिघाड आल्याने तो अनियमित आहे. मागील तीन दिवसांपासून नारायणपूर परिसरातील वीज खंडित आहे. सुमारे २० दिवसांपासून तुटलेल्या खांबाची दुरूस्ती झाली नाही. तीन दिवसांपासून वीज नसल्याने पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंचन खोळंबले आहे. याबाबत नंदोरी येथील कनिष्ठ अभियंंता डोंगरे यांना विचारणा केली असता ७ मे रोजी वादळी पावसाने नारायणपूर फिडरचे खांब व तारा तुटल्या. सदर काम स्थानिक कंत्राटदाराकडून करून घेतले जात आहे. येत्या एक-दोन दिवसांत पुरवठा नियमित होईल, असे सांगण्यात आले.