शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळ २० हजार रूपये क्विंटल, तरी तुरीचे भाव पडले

By admin | Updated: July 17, 2016 00:32 IST

गत काही दिवसांपासून बाजारातील तूर डाळीचे भाव २०० रुपये किलो म्हणजेच २० हजार रुपये प्रति क्विंटल झाल्याची ओरड होत आहे.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम : तुरीला मिळतात आठ ते साडे आठ हजार रुपये भाव रोहणा : गत काही दिवसांपासून बाजारातील तूर डाळीचे भाव २०० रुपये किलो म्हणजेच २० हजार रुपये प्रति क्विंटल झाल्याची ओरड होत आहे. मग, तुरीला केवळ आठ ते साडे आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव का, असा संतप्त सवाल तूर उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत. शासनाने व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या या लुटीकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. एक क्विंटल तुरीपासून ७० किलो स्वच्छ तूर डाळ तयार होते तर ३० किलो कळणा, कोंडा व दुय्यम प्रतिची डाळ (चूरी) निघते. आज २०० रुपये किलो डाळीचा भाव विचारात घेता व्यापाऱ्याला ७० किलो डाळीचे १४ हजार रुपये मिळतात. व्यापारी कळणा, कोंडा, डाळीची चूरी गोपालकांना जनावरांच्या वैरणासाठी ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे विकतात. यातून मिलधारक व्यापाऱ्यांना एक हजार रुपये मिळतात. यावरून एक क्विंटल तुरीतून व्यापाऱ्यांना १५ हजार रुपये मिळतात. तुरीचे डाळीत रूपांतर करण्यासाठी एक हजार रुपये खर्च येत असल्याचे मान्य केले तरी व्यापाऱ्यांना १४ हजार रुपये शिल्लक राहतात. आठ ते साडे आठ हजार रुपये क्विंटल भावाने खरेदी केलेल्या तुरीचे व्यापारी १४ हजार रुपये करतात म्हणजे सहा हजार रुपये कमवितात. यात व्यापारी ७५ टक्के नफा कमवितात. केवळ कच्चा माल पक्का करून विकताना व्यापारी मालामाल होतो आणि उन्ह, वारा व पाऊस या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत जून ते फेबु्रवारी आठ महिने जोपासणा करून आलेल्या पिकातून अनेकदा खर्चही निघत नाही. गतवर्षीपासून तुरीला बऱ्यापैकी भाव आहे; पण सर्वत्र ओरड होत आहे. परिणामी, शासन परेदशातून तुरी आयात करून स्वस्त धान्य दुकानातून १२० रुपये किलो भावाने डाळ ग्राहकांना उपलब्ध करून देते. शिवाय तूर व तूर डाळीची साठेबाजी करणाऱ्यांवर कार्यवाही करू, अशा घोषणा करते. या घोषणा अंमलात येत नाही; पण याचा हवाला देत व्यापारी तुरीचे भाव पाडतात. तुरीचे भाव घटले तर तूर डाळीचे भाव कमी होणे क्रमप्राप्त आहे; पण बाजारात असे होत नाही. या घोषणाबाजीत मागील महिन्यात १० हजारांच्या वर गेलेले तुरीचे भाव आठ हजारांवर आले; पण तूर डाळीचा भाव जैसे थे आहे. वास्तविक, तूर डाळ जर २० हजार रुपये क्विंटलने खपत असेल तर तुरीचा भाव किमान १२ हजार रुपये क्विंटल असणे गरजेचे आहे. एका फोनवर भाव पाडणारे व्यापारी संघटीत आहे. यात शेतकऱ्यांची लुट होत आहे. शासन कोणतेही असले तरी घोषणाबाजीच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. याचा अनुभव आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लुटीचा मार सहन करावा लागत आहे. हे चित्र पालटणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर) १२ हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तूर खरेदी करून व्यापारी डाळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा कमवितात. सध्या तूर डाळ २०० रुपये किलो असताना तुरीचे भाव मात्र पाडले गेले आहेत. केवळ आठ ते साडे आड हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना किमान १२ हजार रुपये क्विंटल तुरीचे भाव अपेक्षित आहेत; पण असे झाल्यास व्यापाऱ्यांचा नफा कमी होतो. यामुळे तुरीच्या भावाबद्दल कुणीही बोलायला तयार नसल्याचेच दिसते. मागील महिन्यात १० हजार रुपयांपर्यंत गेलेल्या तुरी आता डाळ महाग असतानाही आठ हजारांवर आल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या लुटीकडे लक्ष देत व्यांपाऱ्यांवर अंकूश कसण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे.