शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

तूर डाळ २० हजार रूपये क्विंटल, तरी तुरीचे भाव पडले

By admin | Updated: July 17, 2016 00:32 IST

गत काही दिवसांपासून बाजारातील तूर डाळीचे भाव २०० रुपये किलो म्हणजेच २० हजार रुपये प्रति क्विंटल झाल्याची ओरड होत आहे.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम : तुरीला मिळतात आठ ते साडे आठ हजार रुपये भाव रोहणा : गत काही दिवसांपासून बाजारातील तूर डाळीचे भाव २०० रुपये किलो म्हणजेच २० हजार रुपये प्रति क्विंटल झाल्याची ओरड होत आहे. मग, तुरीला केवळ आठ ते साडे आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव का, असा संतप्त सवाल तूर उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत. शासनाने व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या या लुटीकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. एक क्विंटल तुरीपासून ७० किलो स्वच्छ तूर डाळ तयार होते तर ३० किलो कळणा, कोंडा व दुय्यम प्रतिची डाळ (चूरी) निघते. आज २०० रुपये किलो डाळीचा भाव विचारात घेता व्यापाऱ्याला ७० किलो डाळीचे १४ हजार रुपये मिळतात. व्यापारी कळणा, कोंडा, डाळीची चूरी गोपालकांना जनावरांच्या वैरणासाठी ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे विकतात. यातून मिलधारक व्यापाऱ्यांना एक हजार रुपये मिळतात. यावरून एक क्विंटल तुरीतून व्यापाऱ्यांना १५ हजार रुपये मिळतात. तुरीचे डाळीत रूपांतर करण्यासाठी एक हजार रुपये खर्च येत असल्याचे मान्य केले तरी व्यापाऱ्यांना १४ हजार रुपये शिल्लक राहतात. आठ ते साडे आठ हजार रुपये क्विंटल भावाने खरेदी केलेल्या तुरीचे व्यापारी १४ हजार रुपये करतात म्हणजे सहा हजार रुपये कमवितात. यात व्यापारी ७५ टक्के नफा कमवितात. केवळ कच्चा माल पक्का करून विकताना व्यापारी मालामाल होतो आणि उन्ह, वारा व पाऊस या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत जून ते फेबु्रवारी आठ महिने जोपासणा करून आलेल्या पिकातून अनेकदा खर्चही निघत नाही. गतवर्षीपासून तुरीला बऱ्यापैकी भाव आहे; पण सर्वत्र ओरड होत आहे. परिणामी, शासन परेदशातून तुरी आयात करून स्वस्त धान्य दुकानातून १२० रुपये किलो भावाने डाळ ग्राहकांना उपलब्ध करून देते. शिवाय तूर व तूर डाळीची साठेबाजी करणाऱ्यांवर कार्यवाही करू, अशा घोषणा करते. या घोषणा अंमलात येत नाही; पण याचा हवाला देत व्यापारी तुरीचे भाव पाडतात. तुरीचे भाव घटले तर तूर डाळीचे भाव कमी होणे क्रमप्राप्त आहे; पण बाजारात असे होत नाही. या घोषणाबाजीत मागील महिन्यात १० हजारांच्या वर गेलेले तुरीचे भाव आठ हजारांवर आले; पण तूर डाळीचा भाव जैसे थे आहे. वास्तविक, तूर डाळ जर २० हजार रुपये क्विंटलने खपत असेल तर तुरीचा भाव किमान १२ हजार रुपये क्विंटल असणे गरजेचे आहे. एका फोनवर भाव पाडणारे व्यापारी संघटीत आहे. यात शेतकऱ्यांची लुट होत आहे. शासन कोणतेही असले तरी घोषणाबाजीच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. याचा अनुभव आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लुटीचा मार सहन करावा लागत आहे. हे चित्र पालटणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर) १२ हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तूर खरेदी करून व्यापारी डाळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा कमवितात. सध्या तूर डाळ २०० रुपये किलो असताना तुरीचे भाव मात्र पाडले गेले आहेत. केवळ आठ ते साडे आड हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना किमान १२ हजार रुपये क्विंटल तुरीचे भाव अपेक्षित आहेत; पण असे झाल्यास व्यापाऱ्यांचा नफा कमी होतो. यामुळे तुरीच्या भावाबद्दल कुणीही बोलायला तयार नसल्याचेच दिसते. मागील महिन्यात १० हजार रुपयांपर्यंत गेलेल्या तुरी आता डाळ महाग असतानाही आठ हजारांवर आल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या लुटीकडे लक्ष देत व्यांपाऱ्यांवर अंकूश कसण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे.