शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहे होणार बंद

By admin | Updated: April 7, 2017 01:53 IST

महाराष्ट्र शासन आदिवासी विद्यार्थी वसतिगृहे बंद करून आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकारच हिरावून घेत आहे.

चारूलता टोकस यांची माहिती : भाजपाचा महिला काँग्रेसकडून निषेध वर्धा : महाराष्ट्र शासन आदिवासी विद्यार्थी वसतिगृहे बंद करून आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकारच हिरावून घेत आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा भाजप सरकारचा घाट असल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी पत्रकातून केला आहे. घेण्यात येत असलेल्या या निर्णयाचा काँग्रेसकडून एका पत्रकाद्वारे निषेधही नोंदविण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यकाळापासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या योजना राबविल्या आहे. त्या अविरत सुरू ठेवल्या आहे. त्याच योजना आज हे भाजप शासन बंद पाडू पाहत असल्याचा आरोपही टोकस यांनी केला आहे. आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वसतीगृहे व आश्रमशाळांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. खासकरून उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी वसतीगृह व्यवस्था अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आदिवासी समाजातील बहुतांशी उच्चपदस्थ अधिकारी, नोकरदार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी वसतिगृहामध्ये राहून शिक्षण पूर्ण केले आहे. नव्हे वसतिगृहांशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वसतीगृह व्यवस्था अनिवार्य आहे; परंतु वसतिगृहे बंद करून शासन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर ढकलण्याचे षडयंत्र रचत आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर विरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याबाबतची माहिती महिला काँग्रेसने एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.(प्रतिनिधी)