शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहे होणार बंद

By admin | Updated: April 7, 2017 01:53 IST

महाराष्ट्र शासन आदिवासी विद्यार्थी वसतिगृहे बंद करून आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकारच हिरावून घेत आहे.

चारूलता टोकस यांची माहिती : भाजपाचा महिला काँग्रेसकडून निषेध वर्धा : महाराष्ट्र शासन आदिवासी विद्यार्थी वसतिगृहे बंद करून आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकारच हिरावून घेत आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा भाजप सरकारचा घाट असल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी पत्रकातून केला आहे. घेण्यात येत असलेल्या या निर्णयाचा काँग्रेसकडून एका पत्रकाद्वारे निषेधही नोंदविण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यकाळापासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या योजना राबविल्या आहे. त्या अविरत सुरू ठेवल्या आहे. त्याच योजना आज हे भाजप शासन बंद पाडू पाहत असल्याचा आरोपही टोकस यांनी केला आहे. आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वसतीगृहे व आश्रमशाळांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. खासकरून उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी वसतीगृह व्यवस्था अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आदिवासी समाजातील बहुतांशी उच्चपदस्थ अधिकारी, नोकरदार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी वसतिगृहामध्ये राहून शिक्षण पूर्ण केले आहे. नव्हे वसतिगृहांशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वसतीगृह व्यवस्था अनिवार्य आहे; परंतु वसतिगृहे बंद करून शासन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर ढकलण्याचे षडयंत्र रचत आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर विरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याबाबतची माहिती महिला काँग्रेसने एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.(प्रतिनिधी)