शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

परिवहनच्या ‘यशवंती’ला प्रवाशांकडून ‘दे धक्का’

By admin | Updated: June 20, 2014 00:02 IST

वर्धा-राळेगाव मार्गे जाणारी बस ‘यशवंती’ अचानक रस्त्यात बंद पडली. यामुळे बसला सुरु करण्यासाठी प्रवाशांना गाडीखाली ऊतरुन धक्का द्यावा लागला. वर्धा आगाराची ही बसगाडी रस्त्यात बंद झाल्याने प्रवाशांना

वायगाव(नि.) : वर्धा-राळेगाव मार्गे जाणारी बस ‘यशवंती’ अचानक रस्त्यात बंद पडली. यामुळे बसला सुरु करण्यासाठी प्रवाशांना गाडीखाली ऊतरुन धक्का द्यावा लागला. वर्धा आगाराची ही बसगाडी रस्त्यात बंद झाल्याने प्रवाशांना सुखमय प्रवासाऐवजी धक्कामय प्रवासाचा अनुभव आला.वायगाव(नि.)कडे जाणारी बस क्रमांक एमएच०६-५७७५ यात वायगावसह परिसरातील नागरिक प्रवास करीत होते. वायगाव बसस्थानकाजवळ एकाएकी बस बंद पडल्याने सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. वाहक व चालकांनी बस सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न व्यर्थ ठरल्याने प्रवाशांना धक्का देण्याचे सांगण्यात आले. एकीकडे उकाडा आणि त्यात बंद झालेली बस असा दुहेरी त्रास सहन करीत प्रवाशांनी बसला धक्का दिला. परिवहन महामंडळ एकीकडे प्रवासी भाड्यात भरमसाठ वाढ करते. मात्र प्रवाशांना सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना सुखकारक ऐवजी यातनामय प्रवासाचा अनुभव घ्यावा लागतो. ग्रामीण भागातील प्रवाशांचा नाईलाज असल्याने बसने प्रवास करण्याखेरीज पर्याय नसतो. परिवहन मंडळाकडूनही ग्रामीण भागात नादुरुस्त बसेस दिल्या जातात. यामुळे बरेचदा ग्रामस्थांना बसखाली उतरून धक्का मारण्याची वेळ येते. परिवहन मंडळातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वारंवार रस्त्यात गाड्या बंद पडणे यासारख्या घटना घडतात. याचा नाहक त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागतो. याची दखल घेणे गरजेचे आहे.(वार्ताहर)