शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वादग्रस्त मिर्झांसह तीन ठाणेदारांच्या बदल्या

By admin | Updated: August 5, 2014 23:49 IST

जिल्ह्यातील तीन ठाणेदारांच्या बदल्या झाल्या. यामध्ये वादग्रस्त ठरलेले खरांगणाचे ठाणेदार करीम मिर्झांसह आर्वीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे व अल्लीपूरचे सुभाष काळे यांचा समावेश आहे.

वर्धा : जिल्ह्यातील तीन ठाणेदारांच्या बदल्या झाल्या. यामध्ये वादग्रस्त ठरलेले खरांगणाचे ठाणेदार करीम मिर्झांसह आर्वीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे व अल्लीपूरचे सुभाष काळे यांचा समावेश आहे.पोलीस महासंचालकांच्या स्वाक्षरीने हे बदल्याचे आदेश मंगळवारी जिल्ह्यात धडकले. आगामी विधानसभा निवडणुपूर्वी मागील चार वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच जिल्ह्यात कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले होते. सदर आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आर्वीचे ठाणेदार चकाटे हे मागील चार वर्षांपेक्षा अधिक जिल्ह्यात कर्तव्यावर होते. त्याची बदली पोलीस प्रशिक्षण विद्यालय नागपूर येथे करण्यात आली आहे. खरांगणाचे ठाणेदार करीम मिर्झा यांची बदली नागपूर शहर येथे करण्यात आली आहे, तर अल्लीपूरचे ठाणेदार सुभाष काळे यांची बदली नागपूर ग्रामीण येथे करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कालावधी ठाणेदार करीम मिर्झा यांनी जिल्ह्यात घालवला आहे. त्यांच्या काळात सेवाग्राम ठाण्यात एका महिलेच्या कथित आत्महत्येचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोपही झाले. यामुळे त्यांचे पोलीस मुख्यालयात स्थानांतर करण्यात आले होते. या शिवाय इतर कारणानेही ते वादग्रस्त ठरले होते. पोलीस अधीक्षक म्हणून अनिल पारस्कर यांनी पदभार सांभाळल्यानंतर अल्पावधीतच मिर्झा यांना खरांगणा ठाणे देण्यात आले. आता त्यांची येथूनही जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)