शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तूर पावसात भिजली

By admin | Updated: June 1, 2017 00:35 IST

शासनाच्या अस्पष्ट धोरणामुळे तूर खरेदी रखडत सुरू आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर खरेदी सुरू आहे;

बाजार समितीतील प्रकार : १५ दिवसांपासून शेतकऱ्यांचा वर्धेत मुक्काम लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शासनाच्या अस्पष्ट धोरणामुळे तूर खरेदी रखडत सुरू आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर खरेदी सुरू आहे; पण तोकड्या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना १० ते १५ दिवस मुक्काम करावा लागत आहे. यातच बुधवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने सुमारे दोन ते तीन हजार क्विंटल तूर भिजली. टोकण दिलेले असल्याने यात शासनाचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाने तूर खरेदीला मुदतवाढ दिली होती. यामुळे प्रथम २७ मे पर्यंत व नंतर ३१ मे पर्यंत तूर खरेदीचे धोरण होते. आता मुदतवाढ दिल्याची माहिती आहे; पण बाजार समितीला अधिकृत सूचना नाहीत. सध्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत महाराष्ट्र पणन महासंघाकडून तूर खरेदी केली जात आहे. वर्धा बाजार समितीमध्ये ३१ मे पर्यंत सुमारे ७ ते ८ हजार क्विंटल तुरीची नोंदणी झाली असून ती तूर बाजार यार्डवर खरेदी केली जात आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ताडपत्री व अन्य व्यवस्था करून तूर सुरक्षित केली आहे; पण पोत्यांमध्ये भरून खरेदीसाठी दोन ते तीन हजार क्विंटल तूर उघड्यावर ठेवलेली आहे. आज पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक पाऊस आल्याने पोत्यांतील अंदाजे दोन ते तीन हजार क्विंटल तूर भिजली आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २७ मे पासून आजपर्यंत सुमारे ३७५ शेतकऱ्यांना टोकण देण्यात आले आहे. तो माल शेतकऱ्यांच्या घरीच असून बाजार यार्ड आणि शेड रिकामे झाल्यानंतर तथा बाजारात आलेल्या तुरीची खरेदी झाल्यानंतर बोलविला जाणार आहे. शेतकऱ्यांकडे असलेला मालही तब्बल ८ ते ९ हजार क्विंटल असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बाजार समितीचे ४० आणि व्यापाऱ्यांच्या १५ ते २० हमालांच्या माध्यमातून तूर खरेदी सुरू आहे. यासाठी सात काट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे; पण बुधवारी प्रत्यक्षात तीनच काट्यांद्वारे तुरीचे मोजमाप केले जात असल्याचे दिसून आले. परिणामी, तूर खरेदीला विलंब होत आहे. ग्रेडरकडूनही मनमानी कारभार सुरू असल्याने शेतकरी वैतागले आहेत. बाजार समितीचे सभापती व सचिवांनी अनेकदा सूचना देऊनही सुरळीत तूर खरेदी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बाजार समिती प्रशासनाने तूर खरेदीचा वेग वाढविणे गरजेचे झाले आहे. गोदाम रिकामे नसल्याने सहा हजार क्विंटल तूर शेडमध्येच पडून वर्धा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली तूर ब्रह्मपूरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात साठविला जातो. केवळ कारंजा (घा.) बाजार समितीतील तूर वाडी (नागपूर) येथील गोदामात पाठविली जाते. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली सुमारे ६ ते ७ हजार क्विंटल तूर बाजार समितीच्या शेडमध्येच पडून आहे. एक ट्रक गोदामात पोहोचण्यास दोन दिवस लागतात. गोदामात जागा नसल्याने तूर ठेवायची कुठे, हा प्रश्नच आहे. हेक्टरी १० क्ंिवटलची मर्यादा सध्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शेतक्यांकडून तूर खरेदी केली जात आहे. यासाठी टोकण दिले जात असून प्रती शेतकरी प्रती हेक्टरी १० क्ंिवटल व अधिकाधिक प्रती शेतकरी २५ क्विंटल तूर खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ९० हजार क्विंटल तूर घरीच नाफेड, एफसीआयने २२ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १.२० लाख क्विंटल तूर खरेदी केली. यानंतरही १६ ते ३१ मे दरम्यान ४८ हजार क्विंटल तूर खरेदी केली. आता बाजार हस्तक्षेप योजनेत पणन महामंडळाने ३३ हजार तूर खरेदी केली. ४ हजार शेतकऱ्यांना टोकण दिले असून अंदाजे ९० हजार क्विंटल तूर खरेदी व्हायची आहे. ३८०० क्विंटल तूर खरेदी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत पणन महासंघाच्यावतीने आजपर्यंत ३ हजार ८०० क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. सदर माल अद्यापही बाजार समितीच्या शेडमध्ये पडून असल्याने यानंतर खरेदी केलेली तूर ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून आले. तत्पूर्वी एफसीआयमार्फत १२ हजार २७० क्विंटल, नाफेडमार्फत ९ हजार ६३४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.