शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्वच्छता अभियानाचे तीनतेरा

By admin | Updated: May 27, 2015 01:57 IST

शासनाने सुंदर व स्वच्छ देशाची कल्पना डोळ्यासमोर ठेवून स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. नगर परिषद, शासकीय, निमशासकीय, संस्थांसह शाळा, महाविद्यालयांनीही ...

पुलगाव : शासनाने सुंदर व स्वच्छ देशाची कल्पना डोळ्यासमोर ठेवून स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. नगर परिषद, शासकीय, निमशासकीय, संस्थांसह शाळा, महाविद्यालयांनीही स्वच्छतेच्या यज्ञात उडी घेतली; पण गत काही महिन्यात या अभियानाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. नगर परिषदेने सुंदर शहर, स्वच्छ शहर कल्पना साकारण्यासाठी अभियानास प्रारंभ केला. शाळा महाविद्यालयांनीही परिसरासह मोठे चौक स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. इतर संस्थांनीही या मोहिमेत सहभाग घेतला; पण गत काही महिन्यांपासून पालिकेचे या मोहिमेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. मुख्य बाजारपेठ गांधी चौक, धर्मशाळा, पं. दिनदयाल चौक, राठी मार्ग ज्ञानभारती विद्यालय आदी महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागल्याचे दिसते. गांधी चौक व स्टेशन चौकातील भाजी मंडईत सडक्या भाजीपाल्याच्या दुर्गंधीमुळे सार्वजनिक आरोग्यास धोका होण्याची शक्यता आहे.पालिकेत पूर्वी गल्ली-बोळातील नाल्यातील गाळ वा केरकचरा वाहून नेण्यासाठी एक चाकी लहान गाड्या होत्या. त्या भंगारात गेल्यानंतर आवश्यक ठिकाणी लोखंडी ढोले आले; पण या ढोल्यातच कचरा जाळला जात असल्याने तेही निकामी झाले. यानंतर स्वच्छता मोहिमेंतर्गत लावलेल्या लोखंडी कचराकुंड्याही लंपास झाल्या. प्रत्येक वॉर्डात घंटागाड्या फिरत होत्या. त्याच्या आर्थिक खर्चास शासनाची मंजुरी मिळण्यात तांत्रिक अडचणी येत आहे. पालिकेत सफाई कामगार आहे, ते ही नेत्यांच्या वा नगरसेवकांपलिकडे जात नाही. परिणामी, शहरात कचरा, नाल्यातील घाणीचे ढीग पडलेले दिसतात. महात्मा गांधी स्वच्छता अभियानात अनेकांनी छायाचित्रे काढून घेतली; पण आता तेही दिसत नाही. पावसाळा तोंडावर असल्याने पालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)