शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

दोन अपघातांत तीन ठार

By admin | Updated: May 16, 2016 23:38 IST

भोकरदन : भोकरदन तालुक्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. भोकरदन - सिल्लोड रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला.

भोकरदन : भोकरदन तालुक्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. भोकरदन - सिल्लोड रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला.या बाबतची माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान संतोष भगवान पवार (१८) व संगीता भगवान पवार (४६, रा़ वजीरखेडा ता. भोकरदन) हे दुचाकीने (एमएच २१ डब्ल्यू ६७९१) सिल्लोडकडे जात होते. दरम्यान सिल्लोडकडून भोकरदनकडे येणाऱ्या बस (एमएच २० डी ९८८१) ने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील संतोष पवार व त्याची आई संगीता भगवान पवार हे गंभीर जखमी झाले. याच वेळी भोकरदनकडून सिल्लोडकडे जाणाऱ्या दुचाकीने (एमएच २१- २५७४) सुध्दा हुल दिल्याची माहिती समोर आली आहे़ यावेळी विजय चिंंचपुरे व इतरांनी जखमीना भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी दोघांनाही मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या सदस्या शिलाताई फुके, माजी सभापती गणेश फुके, अशोक पवार, पंढरीनाथ पवार यांच्यासह अनेकांनी रूग्णालयात येऊन मृताच्या नातेवाईकाचे सांत्वन केले. या प्रकरणात बसचालका विरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ दरम्यान, गत काही दिवसांपासून भोकरदन ते सिल्लोड हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. (वार्ताहर)भोकरदन : खराब रस्त्त्यामुळे घेतला बळीभोकरदन ते पिंपळगाव रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडलेले आहे. दानापूर ते सुरंगळी फाटा हा रस्ता तीन महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर आता पर्यन्त पाच ते सहा अपघात झाले आहेत़ १६ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान प्रकाश जाधव (४०) व पंचफुलाबाई प्रकाश जाधव (३८) हे दोघे पती- पत्नी दुचाकीवर पिंपळगाव रेणुकाईकडे जात असताना पाण्याच्या पाटाजवळ या रस्त्याच्या कामावरील टिप्परने या दुचाकीला धडक दिली.या अपघातात पंचफुलाबाई प्रकाश जाधव (३८) ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पंचफुलाई जाधव यांचे निधन झाले. त्यानंतर दानापूर, भायडी येथील ग्रामस्थांनी संबंधित गुत्तेदारा विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. टिप्पर चालकाला अटक करण्यासाठी पंचफुलाबाई जाधव यांचा मृतदेह भोकरदन पोलिस ठाण्यात आणला होता. त्यानंतर टिप्पर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.