शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

हजारो वृक्षांचा जातोय बळी

By admin | Updated: May 29, 2015 01:52 IST

सामाजिक वनीकरण विभाग देवळीअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली.

धुरे जाळणे झाडांच्या मूळावर : लागवड योजनेतील वृक्षांवर संक्रांतविजयगोपाल : सामाजिक वनीकरण विभाग देवळीअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. यातील काही झाडे दोन ते तीन फुट उंच झाली आहेत; पण ही झाडे आगीत भस्मसात होत असल्याचे दिसते. यामुळे शासनाचे लाखो रुपये व्यर्थ जात असून योजनेचा बट्याबोळ होत आहे.केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाच्यावतीने शतकोटी वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देत आहे. सामाजिक वनीकरण विभाग देवळीतर्फे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जून २०१४ मध्ये कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. यात सप्तपर्णी, गुलमोहर, कशिया, पिंपळ आदी प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. सध्या लागवड केलेली रोपे तीन ते चार फुट उंच झाली आहेत. संबंधित विभागाने या झाडांचे संरक्षण करता यावे म्हणून कठडे लावणे गरजेचे होते. सध्या शेतशिवारात आंतर मशागत व काडी कचरा पेटविण्याची कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी शेतातील धुरे पेटवून देतात. ही आग पसयरून रस्त्यापर्यंत येत असल्याने झाडे जळत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या झाडांचे आयुष्य धोक्यात आले आहे. या झाडांना उन्हाळ्यात नियमित पाणी देणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसन नाही. पाणी मिळत नसल्याने अनेक झाडांनी माना टाकल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा बट्याबोळ होत आहे. यात लाखो रुपयांचा निधीही व्यर्थ खर्च होत असल्याचे दिसते. ग्रामपंचायत अंतर्गत लावलेल्या झाडांचीही तशीच अवस्था आहे. झाडांना कठडेच नसल्याने अनेक झाडे गुरांनी फस्त केली आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)