शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पाटचऱ्या बांधकामाअभावी हजारो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय

By admin | Updated: January 25, 2016 03:28 IST

उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे भूमिपूजन १८ डिसेंबर १९७६ मध्ये झाले. यानंतर तब्बल १७ वर्षांनी जून १९९३ रोजी बांधकाम पूर्ण

आष्टी (श.) : उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे भूमिपूजन १८ डिसेंबर १९७६ मध्ये झाले. यानंतर तब्बल १७ वर्षांनी जून १९९३ रोजी बांधकाम पूर्ण झाले. डाव्या कालव्याचे बांधकाम ४ आॅक्टोबर १९९५ मध्ये पूर्ण झाले. या कालव्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून पाटचऱ्यांचे बांधकामही झाले नाही. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. डागडूजी व दुरूस्तीसाठी निधी मिळत नसल्याने अधिकाऱ्यांना सर्व समस्यांना तोंड देत रोष सहन करावा लागत आहे.सध्या रबी हंगाम सुरू असून धरण विभागाने सिंचनासाठी कालव्यातून पाणी सोडले. यातून पाटचऱ्यांद्वारे शेतात पाणी पोहोचले; पण मातीच्या पाटचऱ्या जागोजागी फुटल्याने शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. ओरड केल्यावर उलट उत्तरे दिली जातात. मौजा चेकबंदीमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर लालजी मेंढे यांच्या अर्ध्या शेतातून पाणी पाझरत असल्याने पीक वाया जात आहे. दीड एकर शेती त्यांनी पाण्यामुळे पडिक ठेवली आहे. ओलितासाठी पाणी मिळत नाही; पण रस्त्यालगत पाण्याचे लोट वाहतात. आष्टी ते किन्हाळा रस्त्याचे भविष्य पाण्यामुळे बिकट आहे. काळ्या मातीचा भाग असल्याने रस्त्याच्या मधोमध कधी भगदाड पडेल, याचा भरवसा नाही. अधिकाऱ्यांना सांगितल्यावर कर्मचारी पाठवितात. हे कर्मचारी काम सोडून श्ेतकऱ्यांनाच सुनावतात. अप्पर वर्धा धरणाची साठवण क्षमता ६७८.२७ दलघमी आहे; पण त्या ताकदीने सिंचन होत नाही. तालुक्यात अनेक पाटचऱ्या अपूर्ण आहे. सद्यस्थितीत २५० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे.तालुक्यातील पाटचऱ्यांचे अद्यापही काँक्रीटीकरण झाले नाही. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. शेती पडिक राहत आहे. धरणे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.- ज्ञानेश्वर मेंढे, शेतकरी, लहानआर्वी.आष्टी तालुक्यातील कालवे व पाटचऱ्या बांधकामासाठी सर्व प्रस्ताव शासनाला पाठविले आहे. पाठपुरावा सुरू आहे. अनेक पाटचऱ्यांचे बांधकाम मार्गी लागले आहे.- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी.