शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाटचऱ्या बांधकामाअभावी हजारो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय

By admin | Updated: January 25, 2016 03:28 IST

उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे भूमिपूजन १८ डिसेंबर १९७६ मध्ये झाले. यानंतर तब्बल १७ वर्षांनी जून १९९३ रोजी बांधकाम पूर्ण

आष्टी (श.) : उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे भूमिपूजन १८ डिसेंबर १९७६ मध्ये झाले. यानंतर तब्बल १७ वर्षांनी जून १९९३ रोजी बांधकाम पूर्ण झाले. डाव्या कालव्याचे बांधकाम ४ आॅक्टोबर १९९५ मध्ये पूर्ण झाले. या कालव्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून पाटचऱ्यांचे बांधकामही झाले नाही. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. डागडूजी व दुरूस्तीसाठी निधी मिळत नसल्याने अधिकाऱ्यांना सर्व समस्यांना तोंड देत रोष सहन करावा लागत आहे.सध्या रबी हंगाम सुरू असून धरण विभागाने सिंचनासाठी कालव्यातून पाणी सोडले. यातून पाटचऱ्यांद्वारे शेतात पाणी पोहोचले; पण मातीच्या पाटचऱ्या जागोजागी फुटल्याने शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. ओरड केल्यावर उलट उत्तरे दिली जातात. मौजा चेकबंदीमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर लालजी मेंढे यांच्या अर्ध्या शेतातून पाणी पाझरत असल्याने पीक वाया जात आहे. दीड एकर शेती त्यांनी पाण्यामुळे पडिक ठेवली आहे. ओलितासाठी पाणी मिळत नाही; पण रस्त्यालगत पाण्याचे लोट वाहतात. आष्टी ते किन्हाळा रस्त्याचे भविष्य पाण्यामुळे बिकट आहे. काळ्या मातीचा भाग असल्याने रस्त्याच्या मधोमध कधी भगदाड पडेल, याचा भरवसा नाही. अधिकाऱ्यांना सांगितल्यावर कर्मचारी पाठवितात. हे कर्मचारी काम सोडून श्ेतकऱ्यांनाच सुनावतात. अप्पर वर्धा धरणाची साठवण क्षमता ६७८.२७ दलघमी आहे; पण त्या ताकदीने सिंचन होत नाही. तालुक्यात अनेक पाटचऱ्या अपूर्ण आहे. सद्यस्थितीत २५० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे.तालुक्यातील पाटचऱ्यांचे अद्यापही काँक्रीटीकरण झाले नाही. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. शेती पडिक राहत आहे. धरणे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.- ज्ञानेश्वर मेंढे, शेतकरी, लहानआर्वी.आष्टी तालुक्यातील कालवे व पाटचऱ्या बांधकामासाठी सर्व प्रस्ताव शासनाला पाठविले आहे. पाठपुरावा सुरू आहे. अनेक पाटचऱ्यांचे बांधकाम मार्गी लागले आहे.- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी.