शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

मत्स्य उत्पादकांनी हजारो मासे नदीत फेकले

By admin | Updated: September 15, 2016 01:08 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेचा फिल्टर प्लॅन्ट द्रुगवाडा गावानजीक वर्धा नदीवर आहे.

दोषींवर कार्यवाहीची मागणी : तहसीलदारांना साकडे आष्टी (शहीद) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेचा फिल्टर प्लॅन्ट द्रुगवाडा गावानजीक वर्धा नदीवर आहे. येथून साहूर, सावंगा (पुनर्वसन), धाडी या तीन गावांना पाणीपुरवठा होतो. नदीपात्रात मत्स उत्पादक संस्थेने मृत मासे फेकले. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी पसरली असून याच दुर्गंधीयुक्त पाण्याचा ग्रामस्थांना पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणाऱ्या या मत्स्य उत्पादकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. नलदमयंती सागर मत्स्य उत्पादक तथा व्यवसाय मच्छिमार सहकारी संस्था, राजुराबाजार, जि. अमरावती यांनी येथे ८ सप्टेंबर ला हजारो मृत मासे पाण्यात फेकले. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. फेकलेल्या मृत माशांना पाहण्याकरिता येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नदीच्या पात्रात झुडुपे व शेवाळ वाढल्याने आधीच पाण्याला दुर्गंधी येते. त्यात मृत मासे टाकल्याने पाणी अधिक दूषित होत आहे.या नदीच्या पात्रातील दूषित पाणी नागरिकांना पाणी पुरवठा योजनेमार्फत देण्यात आले. हे पाणी पिण्यात आल्याने काहींचे आरोग्य बिघडले आहे. सदरया मत्स्य उत्पादा संस्थेने स्वत:च्या स्वार्थापायी मनमानी कारभार केला असून नागरिकांच्या जीवावर उठली आहे. याकरिता कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन भोरे यांनी निवेदनातून केली आहे. तहसीलदार सीमा गजभिये यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी राजेश ठाकरे, निरज भार्गव, आवेश खान, अजय लेकुरवाळे, सुरेश खवशी आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)