शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धाम ते पवनारपर्यंतची ‘गुरुत्व वाहिनी’ भागविणार वर्ध्यासह २८ गावांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

महाकाळी येथील धाम प्रकल्पातून धामनदीद्वारे वाहणाऱ्या पाण्यातूनच पात्रा लगतच्या काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावद, मजरा, कामठी, खैरी, आंजी (मोठी), डोरली, धुळवा, सुकळी व खेरडा या गावांसह वर्धाशहर व लगतच्या १४ गावांना दररोज पाणी पुरवठा होत आहे. गेल्यावर्षी धाम प्रकल्पाच्या मृत जलसाठ्यातून पाणी उचलण्याची वेळ आली होती

ठळक मुद्देमहाकाळीच्या प्रकल्पातून शहरासह लगतच्या गावांना होतोय पाणीपुरवठा

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह लगतच्या १४ गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता सध्या धामनदीपात्रातूनच पाण्याची उचल केली जात आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या पाणीबाणीमुळे पाण्याचा होणारा अपव्यय टाळून गावांना मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महाकाळीच्या धाम प्रकल्पापासून पवनारपर्यंत जवळपास ३६ किलोमीटरची गुरुत्व वाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.महाकाळी येथील धाम प्रकल्पातून धामनदीद्वारे वाहणाऱ्या पाण्यातूनच पात्रा लगतच्या काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावद, मजरा, कामठी, खैरी, आंजी (मोठी), डोरली, धुळवा, सुकळी व खेरडा या गावांसह वर्धाशहर व लगतच्या १४ गावांना दररोज पाणी पुरवठा होत आहे. गेल्यावर्षी धाम प्रकल्पाच्या मृत जलसाठ्यातून पाणी उचलण्याची वेळ आली होती. पाण्याची ही भीषणता लक्षात घेता नदीपात्राव्दारे वाहणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे जवळपास ७० टक्के पाणी वाया जाते. भूगर्भातील जलपातळी लक्षात घेता आता धामप्रकल्पातून पवनारपर्यंत गुरुत्व वाहिनी टाकून पात्रालगतचे १३ गावे, शहरालगतसह लगतची १४ आणि पवनार या २८ गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. जलशुद्धीकेंद्रापर्यंत पाईपलाईनचे काम प्रस्तावित असल्याने पाण्याची गळती थांबणार आहे. असे असले तरीही या पाइपलाईनच्या शेजारी असणाºया गावांना या गुरुत्व वाहिनीमुळे मोठा फटका बसणार असल्याचेही मत नदीपात्रालगतच्या गावातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.या जलवाहिनीचा नदीपात्रालगतच्या व आजुबाजुच्या परिसरातील शेतकरी, नागरिक व गोपालकांना मोठा फटका बसणार आहे. दुष्काळ काही वांरवार पडत नाही. शहराची तहाण भागविण्यासाठी ग्रामीण भागावर हा अन्याय आहे. याकरिता वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करु.- राजश्री राठीजि.प.सदस्य मोरांगणावर्ध्यासह लगतच्या १४ गावांना उन्हाळ्यात पाण्याची संमस्या जाणवतात. आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. गेल्या उन्हाळ्यात १५ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला. भीषणता लक्षात घेऊन पाणी बचतीकरिता ही वाहिनी महत्वाची ठरेल.- अजय गौळकरसरपंच, पिपरी(मेघे)गेल्या उन्हाळ्यात धाम प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर येळाकेळी व पवनारपर्यंत केवळ ४० टक्केच पाणी पोहोचत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने टंचाई जाणवली. आता या वाहिनीमुळे कुणाचेही नुकसान होणार नाही. यात फायदाच आहे.- अतुल तराळेनगराध्यक्ष, वर्धाधाम ही बारमाही वाहणारी नदी आहे. या जलवाहिनीमुळे नदीपात्रालगतच्या गावांना मुळीच नुकसान होणार नाही. वाहिनी टाकतानाच धाम प्रकल्पाच्या उपपाणलोटाचा विकास महत्वाचा आहे. त्यामुळे नदी पुनर्जीवित होईल.- माधव कोटस्थाने , जलतज्ज्ञ, वर्धा.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण