शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

पिढीजात शेतकर्‍यांवर आली मजुरीची वेळ

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

सध्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीचे चित्रच पालटल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस तोट्यात जात असलेली पारंपरिक शेती शेतकर्‍यांना

नंदोरी : सध्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीचे चित्रच पालटल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस तोट्यात जात असलेली पारंपरिक शेती शेतकर्‍यांना आर्थिक गर्तेत लोटत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात श्रीमंत व्यक्ती शेतकरी झाल्याचे दिसतात तर पिढीजात शेतकरी आपल्या शेतजमिनी मक्त्याने देत दुसर्‍याच्या शेतावर शेतमजुरी करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील हे विदारक वास्तव आहे.

प्रत्येक हंगामात जीवाचे रान करून कुटुंकबाचा उदरनिर्वाह करणे आता शेतकर्‍यांना पवडण्यासारखे राहिले नाही. शेती व्यवसाय म्हणजे डोक्यावर कर्जाचे ओझे वाढविण्याची एक परंपराच झाली आहे. असे असताना गरीब शेतकरी न परवडणार्‍या व्यवसायापासून दुरावत आहे. ज्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात पैसा आहे, असे धनिक, व्यापारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी व राजकीय पुढारी शेती खरेदी करून शेतकरी बनण्याच्या नादात आहे. हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. सध्या तर ग्रामीण भागातील लघू शेतकर्‍यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत शिल्लक राहिली आहे. शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. वडिलोपाजिर्त असलेल्या जमिनीवर नोकरी नाही म्हणून शेती व्यवसाय करावा लागतो. शेती म्हणजे डोक्यावर कर्जाचा डोंगर, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

शेतकरी मे महिन्यापासून शेती व्यवसायात कुटुंबासह स्वत:ला झोकून देतो. जवळपास चार महिने जीवाचे रान करतो; पण शेतीस लागणारा खर्च व शेतीतून मिळणारे उत्पन्न या दोन्हीमध्ये तफावत असते. यामुळे शेतकरी या व्यवसायातून कुटुबांचा उदरनिर्वाह करू शकत नाही. या स्थितीमुळे शेतकर्‍याला कर्जाच्या ओझ्याखाली खितपत जगावे लागते. शेतकर्‍यांनी सध्या शेती सोडून अन्य कामाकडे वळण्याचा नवीन पर्याय शोधल्याचेच शेतीच्या व्यवहारांवरून दिसून येते.(वार्ताहर)