शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पिढीजात शेतकर्‍यांवर आली मजुरीची वेळ

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

सध्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीचे चित्रच पालटल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस तोट्यात जात असलेली पारंपरिक शेती शेतकर्‍यांना

नंदोरी : सध्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीचे चित्रच पालटल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस तोट्यात जात असलेली पारंपरिक शेती शेतकर्‍यांना आर्थिक गर्तेत लोटत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात श्रीमंत व्यक्ती शेतकरी झाल्याचे दिसतात तर पिढीजात शेतकरी आपल्या शेतजमिनी मक्त्याने देत दुसर्‍याच्या शेतावर शेतमजुरी करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील हे विदारक वास्तव आहे.

प्रत्येक हंगामात जीवाचे रान करून कुटुंकबाचा उदरनिर्वाह करणे आता शेतकर्‍यांना पवडण्यासारखे राहिले नाही. शेती व्यवसाय म्हणजे डोक्यावर कर्जाचे ओझे वाढविण्याची एक परंपराच झाली आहे. असे असताना गरीब शेतकरी न परवडणार्‍या व्यवसायापासून दुरावत आहे. ज्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात पैसा आहे, असे धनिक, व्यापारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी व राजकीय पुढारी शेती खरेदी करून शेतकरी बनण्याच्या नादात आहे. हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. सध्या तर ग्रामीण भागातील लघू शेतकर्‍यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत शिल्लक राहिली आहे. शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. वडिलोपाजिर्त असलेल्या जमिनीवर नोकरी नाही म्हणून शेती व्यवसाय करावा लागतो. शेती म्हणजे डोक्यावर कर्जाचा डोंगर, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

शेतकरी मे महिन्यापासून शेती व्यवसायात कुटुंबासह स्वत:ला झोकून देतो. जवळपास चार महिने जीवाचे रान करतो; पण शेतीस लागणारा खर्च व शेतीतून मिळणारे उत्पन्न या दोन्हीमध्ये तफावत असते. यामुळे शेतकरी या व्यवसायातून कुटुबांचा उदरनिर्वाह करू शकत नाही. या स्थितीमुळे शेतकर्‍याला कर्जाच्या ओझ्याखाली खितपत जगावे लागते. शेतकर्‍यांनी सध्या शेती सोडून अन्य कामाकडे वळण्याचा नवीन पर्याय शोधल्याचेच शेतीच्या व्यवहारांवरून दिसून येते.(वार्ताहर)