शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पिढीजात शेतकर्‍यांवर आली मजुरीची वेळ

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

सध्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीचे चित्रच पालटल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस तोट्यात जात असलेली पारंपरिक शेती शेतकर्‍यांना

नंदोरी : सध्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीचे चित्रच पालटल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस तोट्यात जात असलेली पारंपरिक शेती शेतकर्‍यांना आर्थिक गर्तेत लोटत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात श्रीमंत व्यक्ती शेतकरी झाल्याचे दिसतात तर पिढीजात शेतकरी आपल्या शेतजमिनी मक्त्याने देत दुसर्‍याच्या शेतावर शेतमजुरी करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील हे विदारक वास्तव आहे.

प्रत्येक हंगामात जीवाचे रान करून कुटुंकबाचा उदरनिर्वाह करणे आता शेतकर्‍यांना पवडण्यासारखे राहिले नाही. शेती व्यवसाय म्हणजे डोक्यावर कर्जाचे ओझे वाढविण्याची एक परंपराच झाली आहे. असे असताना गरीब शेतकरी न परवडणार्‍या व्यवसायापासून दुरावत आहे. ज्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात पैसा आहे, असे धनिक, व्यापारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी व राजकीय पुढारी शेती खरेदी करून शेतकरी बनण्याच्या नादात आहे. हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. सध्या तर ग्रामीण भागातील लघू शेतकर्‍यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत शिल्लक राहिली आहे. शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. वडिलोपाजिर्त असलेल्या जमिनीवर नोकरी नाही म्हणून शेती व्यवसाय करावा लागतो. शेती म्हणजे डोक्यावर कर्जाचा डोंगर, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

शेतकरी मे महिन्यापासून शेती व्यवसायात कुटुंबासह स्वत:ला झोकून देतो. जवळपास चार महिने जीवाचे रान करतो; पण शेतीस लागणारा खर्च व शेतीतून मिळणारे उत्पन्न या दोन्हीमध्ये तफावत असते. यामुळे शेतकरी या व्यवसायातून कुटुबांचा उदरनिर्वाह करू शकत नाही. या स्थितीमुळे शेतकर्‍याला कर्जाच्या ओझ्याखाली खितपत जगावे लागते. शेतकर्‍यांनी सध्या शेती सोडून अन्य कामाकडे वळण्याचा नवीन पर्याय शोधल्याचेच शेतीच्या व्यवहारांवरून दिसून येते.(वार्ताहर)